शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
2
राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 
3
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
4
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
5
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
6
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल
7
ऑपरेशन सिंदूरदरम्यान कुणाचं झालं सर्वाधिक नुकसान? अमेरिकन रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
8
ट्रम्प-मस्क वादात नवा ट्विस्ट; आता टेस्ला प्रमुखांना होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले...
9
Sonam Raghuwanshi: हत्या होण्यापूर्वी राजा रघुवंशी सोनमसोबत इथे थांबला होता, पहा व्हिडीओ
10
राजाच्या रक्तानं माखलेलं जॅकेट फेकलं अन् आकाशला...; 'बेवफा' सोनमनं काय काय केलं?
11
Raja Raghuvanshi Murder: कोण आहे अल्बर्ट पीडी? ज्याच्या एका जबाबामुळे सोनम रघुवंशीचा खरा चेहरा जगासमोर आला
12
स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी?
14
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान
15
Sonam Raghuvanshi : "मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज
16
डिलिव्हरी फ्री, पॅकेजिंग फ्री फक्त... रॅपिडोची फूड डिलिव्हरी बाजारात एन्ट्री! झोमॅटो-स्विगी टेन्शनमध्ये?
17
Vastu Tips: आर्थिक संकट असो वा जुना आजार; झोपण्यापूर्वी 'या' उपायाने मिळेल समाधान!
18
राजा रघुवंशी हत्याकांडावर सीमा हैदरच्या वकिलांचं मोठं विधान, म्हणाले - 'इस्लाम धर्मात...!'
19
महाराष्ट्रात मद्याच्या किंमतीत वाढ; दारूचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आपटले
20
सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिली दोन खास पुस्तकं, काय आहेत नावं?

जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:40 IST

भारतात एकीकडे गरीबी वेगाने कमी झालेली असताना पाकिस्तानात ती प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. हे वास्तव आज वर्ल्ड बँकेने जाहीर केले आहे. एवढे माहित असूनही दहशतवाद्यांच्या जन्मदात्याला हीच वर्ल्ड बँक बेलआऊट पॅकेज देत बसली आहे. 

पाकिस्ताना किती कंगाल झाला आहे हे वर्ल्ड बँकेनेच आज जाहीर केले आहे. जग पाकिस्तानला बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देत सुटले आहे, परंतू ते सर्व पैसे पाकिस्तानी लष्कराच्या घशात जात आहेत. या पैशांतून पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांची फौज तयार करत आहे. भारतात एकीकडे गरीबी वेगाने कमी झालेली असताना पाकिस्तानात ती प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. हे वास्तव आज वर्ल्ड बँकेने जाहीर केले आहे. एवढे माहित असूनही दहशतवाद्यांच्या जन्मदात्याला हीच वर्ल्ड बँक बेलआऊट पॅकेज देत बसली आहे. 

२०१२ ते २०२२ दरम्यान, भारतातील अति गरिबी २७.१% वरून ५.३% पर्यंत कमी झाली. या काळात २६.९ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. पण त्याउलट पाकिस्तानात घडले आहे. पाकिस्तानमधील अति गरिबी ४.९% वरून १६.५% पर्यंत वाढली आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार गरिबी मोजण्यासाठी एक नवीन स्केल निश्चित करण्यात आला आहे. प्रति व्यक्ती प्रतिदिन $3 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना 'अत्यंत गरीब' मानले जाईल. म्हणजेच जवळपास दिवसाला २५६ भारतीय रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असले तरच तो अति गरीबच्या बाहेर असेल. 

२०२२-२३ मध्ये, भारतात ७.५२ कोटी लोक अत्यंत गरिबीत राहत होते. तर २०११-१२ मध्ये ही संख्या ३४.४४ कोटी एवढी प्रचंड होती. २६.९ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. ही लोकसंख्या पाकिस्तानी लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. हे पाकिस्तान पूर्णपणे कर्जावर अवलंबून आहे. त्यांची अर्थव्यवस्था एवढी डबघाईला आली आहे की कितीही कर वाढविला तरी या कर्जाचे हप्ते फेडू शकणार नाही. 

एकट्या आयएमएफकडूनच त्यांनी ४४.५७ अब्ज डॉलर्सची २५ बेलआउट पॅकेजेस घेतले आहेत. जागतिक बँक, आशियाई विकास बँक (एडीबी) आणि इस्लामिक विकास बँकेकडून ३८.८ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे ते वेगळेच. चीनकडून २५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त तर युरोबाँडकडून ७.८ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतलेले आहे. अरब राष्ट्रांनीही पाकिस्तानला कर्जे दिलेली आहेत. यापैकी बरेच देश आणि संस्था हे कर्ज बुडीत खात्यातच मानत आहेत. 

भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्यानुसार कोणतेही बेलआऊट पॅकेज आले की पाकिस्तानी सैन्य त्यात हस्तक्षेप करून त्याची वाटणी करते. मोठा भाग आपल्याला घेते आणि सरकारला थोडा भाग देते. कर्जातील बहुतांश पैसा हा सैन्यालाच जातो. ते त्याचा वापर दहशतवाद्यांसाठी, सैन्याची शस्त्रे घेण्यासाठी करतात आणि देशातील जनतेला वाऱ्यावर सोडतात. बिसारिया यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWorld Bankवर्ल्ड बँक