शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:40 IST

भारतात एकीकडे गरीबी वेगाने कमी झालेली असताना पाकिस्तानात ती प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. हे वास्तव आज वर्ल्ड बँकेने जाहीर केले आहे. एवढे माहित असूनही दहशतवाद्यांच्या जन्मदात्याला हीच वर्ल्ड बँक बेलआऊट पॅकेज देत बसली आहे. 

पाकिस्ताना किती कंगाल झाला आहे हे वर्ल्ड बँकेनेच आज जाहीर केले आहे. जग पाकिस्तानला बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देत सुटले आहे, परंतू ते सर्व पैसे पाकिस्तानी लष्कराच्या घशात जात आहेत. या पैशांतून पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांची फौज तयार करत आहे. भारतात एकीकडे गरीबी वेगाने कमी झालेली असताना पाकिस्तानात ती प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. हे वास्तव आज वर्ल्ड बँकेने जाहीर केले आहे. एवढे माहित असूनही दहशतवाद्यांच्या जन्मदात्याला हीच वर्ल्ड बँक बेलआऊट पॅकेज देत बसली आहे. 

२०१२ ते २०२२ दरम्यान, भारतातील अति गरिबी २७.१% वरून ५.३% पर्यंत कमी झाली. या काळात २६.९ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. पण त्याउलट पाकिस्तानात घडले आहे. पाकिस्तानमधील अति गरिबी ४.९% वरून १६.५% पर्यंत वाढली आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार गरिबी मोजण्यासाठी एक नवीन स्केल निश्चित करण्यात आला आहे. प्रति व्यक्ती प्रतिदिन $3 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना 'अत्यंत गरीब' मानले जाईल. म्हणजेच जवळपास दिवसाला २५६ भारतीय रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असले तरच तो अति गरीबच्या बाहेर असेल. 

२०२२-२३ मध्ये, भारतात ७.५२ कोटी लोक अत्यंत गरिबीत राहत होते. तर २०११-१२ मध्ये ही संख्या ३४.४४ कोटी एवढी प्रचंड होती. २६.९ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. ही लोकसंख्या पाकिस्तानी लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. हे पाकिस्तान पूर्णपणे कर्जावर अवलंबून आहे. त्यांची अर्थव्यवस्था एवढी डबघाईला आली आहे की कितीही कर वाढविला तरी या कर्जाचे हप्ते फेडू शकणार नाही. 

एकट्या आयएमएफकडूनच त्यांनी ४४.५७ अब्ज डॉलर्सची २५ बेलआउट पॅकेजेस घेतले आहेत. जागतिक बँक, आशियाई विकास बँक (एडीबी) आणि इस्लामिक विकास बँकेकडून ३८.८ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे ते वेगळेच. चीनकडून २५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त तर युरोबाँडकडून ७.८ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतलेले आहे. अरब राष्ट्रांनीही पाकिस्तानला कर्जे दिलेली आहेत. यापैकी बरेच देश आणि संस्था हे कर्ज बुडीत खात्यातच मानत आहेत. 

भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्यानुसार कोणतेही बेलआऊट पॅकेज आले की पाकिस्तानी सैन्य त्यात हस्तक्षेप करून त्याची वाटणी करते. मोठा भाग आपल्याला घेते आणि सरकारला थोडा भाग देते. कर्जातील बहुतांश पैसा हा सैन्यालाच जातो. ते त्याचा वापर दहशतवाद्यांसाठी, सैन्याची शस्त्रे घेण्यासाठी करतात आणि देशातील जनतेला वाऱ्यावर सोडतात. बिसारिया यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWorld Bankवर्ल्ड बँक