शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 09:38 IST

गेल्या काही महिन्यांपासून उष्णतेने भारतीय उपखंडाला हैराण केले आहे. आता उत्तर भारतात पाकिस्तानातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी तापविले आहे. घामही ...

गेल्या काही महिन्यांपासून उष्णतेने भारतीय उपखंडाला हैराण केले आहे. आता उत्तर भारतात पाकिस्तानातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी तापविले आहे. घामही सुकून जाईल अशी उष्णता लोकांना सहन करावी लागत आहे. अनेक शहरांचे तापमान ४८ अंश सेल्सिअसवर गेले आहे. यात आता पाकिस्तानातून खळबळजनक बातमी येत आहे. 

भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक असलेल्या मोहेंजोदडोमध्ये सूर्य तापला आहे. मोहेंजोदडोसह दादूमध्ये या सीझनमधील सर्वाधिक तापमान नोंद झाले आहे. या ठिकाणी पारा ५० डिग्री सेल्सिअसवर गेला आहे. तर पाकिस्तानातील अन्य शहरांत ४६ डिग्रीवर तापमान नोंद झाले आहे. 

एकीकडे पश्चिम भारतात पावसाने दार ठोठावण्यास सुरुवात केलेली असताना उत्तर भारतात सूर्य आग ओकत आहे. पाकिस्तानच्या हवामान विभागाने ही उष्णतेची लाट आणखी आठवडाभर कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. बुधवारी मोहेंजोदडोतील तापमान ४८ डिग्री सेल्सिअस नोंदविले गेले होते. 

महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेचा इशाराराज्यात एकीकडे वादळी वाऱ्यांचा पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज पुण्यासह सहा जिल्ह्यांमध्ये नागरिकांना उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागणार आहे. तर विदर्भात वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यासह लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या चक्राकार वारे वायव्य इशान्य राजस्थान आणि पश्चिम विदर्भावर सक्रीय आहेत. परिणामी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. २३ ते २६ मेपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज विदर्भात तर २३ ते २५ पर्यंत मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचा इशाराही देण्यात आला आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. परंतु पाऊस काही पडत नाही. तर कोकणात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. कोकणात मान्सूनची चाहूल लागली असून लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.   

टॅग्स :Heat Strokeउष्माघातTemperatureतापमानPakistanपाकिस्तान