शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवून आणणाऱ्या विद्यार्थी नेत्याने भारताला दिला इशारा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 17:26 IST

Nahid Islam News: बांगलादेशमधील सत्तांतरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थी नेत्यांपैकी एक असलेल्या नाहिद इस्लाम याने भारताला इशारा दिला आहे.

बांगलादेशमध्ये आरक्षणावरून पेटलेल्या आंदोलनामधून तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांना पद सोडून देशाबाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर देशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकार काम पाहत आहे. दरम्यान, बांगलादेशमधील सत्तांतरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थी नेत्यांपैकी एक असलेल्या नाहिद इस्लाम याने भारताला इशारा दिला आहे. भारत सरकारने बांगलादेशमधील कुठल्याही एका पक्षाला पाठिंबा देणे हे दोन्ही देशांमध्ये आलेल्या कटुतेमागचं एक मोठं कारण आहे, असं विधान त्यानं केलं आहे. नाहिद इस्लाम हा सध्या बांगलादेशची सत्ता चालवत असलेल्या काळजीवाहू सरकारमध्ये माहिती आणि प्रसार सल्लागार आहे. 

बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधल्यानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंधांबाबत नाहीद याने सांगितले की, भारताशी आमचे ऐतिहासिक संबंध आहेत. त्यात काही चढ उतारही येत असतात. भारत आणि बांगलादेशमधील संबंध हे दोन देशांमधील आणि दोन देशांतील लोकांमधील आहेत. मात्र भारताचे संबंध हे बांगलादेशमधील एका खास राजकीय पक्षासोबत आहेत. येथील जनतेसोबत नाही, असं आम्हाला वाटू लागलं आहे. भारताने बांगलादेशसोबत संबंध प्रस्थापित न करता अवामी लीग पक्षासोबत संबंध प्रस्थापित केलेले आहेत. ही बाब बांगलादेशसोबत भारतासाठीही समस्या वाढवणारी आहे. 

नाहिद इस्लाम याबाबत भारताला सल्ला देताना म्हणाला की, कुठल्याही एका खास पक्षासोबत नाही तर देश आणि त्या देशातील लोकांसोबत संबंध विकसित करून ते कायम ठेवले पाहिजेत, ही बाब भारताने समजून घेतली पाहिजे. राजकीय पक्ष येतात आणि जातात, सरकारं येतात आणि जातात, त्यामुळे देश आणि त्या देशामधील लोकांसोबत संबंध कायम ठेवले पाहिजेत. अवामी लीगसोबतचे संबंझ आणि त्यांच्या सत्तेला भारताचं समर्थन हे उघड गुपित आहे, त्यामुळे येथील लोकांच्या मनात, भारताबाबत संताप आहे, असेही तो म्हणाला.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय