शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवून आणणाऱ्या विद्यार्थी नेत्याने भारताला दिला इशारा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 17:26 IST

Nahid Islam News: बांगलादेशमधील सत्तांतरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थी नेत्यांपैकी एक असलेल्या नाहिद इस्लाम याने भारताला इशारा दिला आहे.

बांगलादेशमध्ये आरक्षणावरून पेटलेल्या आंदोलनामधून तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांना पद सोडून देशाबाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर देशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकार काम पाहत आहे. दरम्यान, बांगलादेशमधील सत्तांतरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थी नेत्यांपैकी एक असलेल्या नाहिद इस्लाम याने भारताला इशारा दिला आहे. भारत सरकारने बांगलादेशमधील कुठल्याही एका पक्षाला पाठिंबा देणे हे दोन्ही देशांमध्ये आलेल्या कटुतेमागचं एक मोठं कारण आहे, असं विधान त्यानं केलं आहे. नाहिद इस्लाम हा सध्या बांगलादेशची सत्ता चालवत असलेल्या काळजीवाहू सरकारमध्ये माहिती आणि प्रसार सल्लागार आहे. 

बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधल्यानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंधांबाबत नाहीद याने सांगितले की, भारताशी आमचे ऐतिहासिक संबंध आहेत. त्यात काही चढ उतारही येत असतात. भारत आणि बांगलादेशमधील संबंध हे दोन देशांमधील आणि दोन देशांतील लोकांमधील आहेत. मात्र भारताचे संबंध हे बांगलादेशमधील एका खास राजकीय पक्षासोबत आहेत. येथील जनतेसोबत नाही, असं आम्हाला वाटू लागलं आहे. भारताने बांगलादेशसोबत संबंध प्रस्थापित न करता अवामी लीग पक्षासोबत संबंध प्रस्थापित केलेले आहेत. ही बाब बांगलादेशसोबत भारतासाठीही समस्या वाढवणारी आहे. 

नाहिद इस्लाम याबाबत भारताला सल्ला देताना म्हणाला की, कुठल्याही एका खास पक्षासोबत नाही तर देश आणि त्या देशातील लोकांसोबत संबंध विकसित करून ते कायम ठेवले पाहिजेत, ही बाब भारताने समजून घेतली पाहिजे. राजकीय पक्ष येतात आणि जातात, सरकारं येतात आणि जातात, त्यामुळे देश आणि त्या देशामधील लोकांसोबत संबंध कायम ठेवले पाहिजेत. अवामी लीगसोबतचे संबंझ आणि त्यांच्या सत्तेला भारताचं समर्थन हे उघड गुपित आहे, त्यामुळे येथील लोकांच्या मनात, भारताबाबत संताप आहे, असेही तो म्हणाला.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय