शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

दिवसाचा कालावधी वाढणार, रात्र कमी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 13:16 IST

पृथ्वीच्या आतील गाभ्याच्या फिरण्याचा वेग कमी झाला

वॉशिंग्टन :पृथ्वी आपल्या अक्षावर जवळपास १ हजार मैल प्रतितास (१,६०० किमी प्रतितास) या वेगाने फिरते. एक वर्तुळ पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला २३ तास ५६ मिनिटे आणि ४.१ सेकंद लागतात. यामुळे पृथ्वीच्या एका भागात दिवस आणि दुसऱ्या भागात रात्र असते. पृथ्वीच्या आतील गाभ्याच्या फिरण्याचा वेग कमी झाल्याचा दावा एका नवीन संशोधनात करण्यात आला आहे. एका दशकाहून अधिक काळापासून हा वेग कमी होत आहे, असेच चालू राहिल्यास दिवसाचा कालावधी वाढू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

हे कधी सुरु झाले?

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार हा ट्रेंड २०१० च्या सुमारास सुरू झाला आहे. हे असेच सुरू राहिल्यास संपूर्ण ग्रहाच्या फिरण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवस रात्रीपेक्षा मोठे होऊ शकतात. प्रोफेसर विडेल म्हणाले की, पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते; परंतु आपल्याला ते जाणवत नाही.

येथे पोहोचणे अशक्य

- संशोधकांचे म्हणणे आहे की, मनुष्य चंद्रावर पोहोचला आहे; अंतर्भागापर्यंत पोहोचणे अशक्य परंतु पृथ्वीच्या अं आहे. भूकंपाच्या लहरींच्या माध्यमातून या गाभ्याचा अभ्यास करता येतो.

- गाभ्यामध्ये हालचालीमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीचे हानिकारक सौर विकिरण आणि वैश्विक कणांपासून संरक्षण करते.

आपल्या ग्रहाचा सर्वांत उष्ण भाग

शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या आतील गाभ्याच्या फिरण्याच्या गतीचे निरीक्षण केले. आतील गाभा घन असून, तो लोखंड आणि निकेलचा बनलेला आहे. हा आपल्या ग्रहाचा सर्वात उष्ण भाग आहे, जेथे तापमान ५,५०० अंश सेल्सिअस आहे. आतील गाभा चंद्राच्या आकाराचा आहे आणि आपल्या पायाखाली ३,००० मैलांपेक्षा अधिक दूर आहे.

टॅग्स :scienceविज्ञानEarthपृथ्वी