शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! मुंबईतील बायकोला भेटण्यासाठी 'त्याने' जे केले त्यामुळं ३ देशाचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 12:24 IST

होआंग, थायलँडच्या ८० किलोमीटर अंतरावरील सिमिलन द्विप बेटावर पोहचला होता. त्याठिकाणी काही मच्छिमारांनी त्याला पाहिले

एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडलं तर ती व्यक्ती प्रेमात काहीही करू शकतात. प्रेम म्हणजे दोन नात्यांमधील जिव्हाळा. याच प्रेमासाठी भारतापासून शेकडो मैल दूर राहणाऱ्या एका परदेशी व्यक्तीनं जे केले ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. भारतात राहणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी थायलँडहून तो थेट रबरी बोट घेऊन निघाला. मागील २ आठवडे समुद्रात प्रवास करत होता. थायलँडच्या किनारपट्टीपासून तो ५० मैल अंतरावर आला होता.

या व्यक्तीचं नाव होआंग हुंग असं आहे. तो व्हिएतनामला राहतो. फुकेत द्विप ते थाई हॉलिडे आयलँडपासून त्याने प्रवासाला सुरुवात केली. प्रेमासाठी त्याने समुद्रात २००० किमी अंतर कापण्याचं ठरवलं. मुंबईत राहणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी त्याने मनाशी ठरवलं होतं. त्यासाठी कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्याची त्याची तयारी होती. अथांग समुद्राच्या लाटांशी झुंज देण्याची जिद्द उराशी बाळगली होती. तो रबरी बोटीनं पाण्यात उतरला आणि केवळ सोबतीला काही अन्नपदार्थ ठेवले. परंतु समुद्रातून प्रवास करण्यासाठी त्याच्याकडे नेव्हिगेशन सिस्टम नव्हती.

होआंग, थायलँडच्या ८० किलोमीटर अंतरावरील सिमिलन द्विप बेटावर पोहचला होता. त्याठिकाणी काही मच्छिमारांनी त्याला पाहिले आणि समुद्रात सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या नौदलाला माहिती दिली. त्यानंतर नेव्हीच्या जवानांनी होआंगला पकडलं. थाय मेरिटाइम इंफोर्समेंट कमांड सेंटरचे कॅप्टन पिचेट सोंगटान यांच्यानुसार, हुंगने सांगितले की, तो त्याच्या पत्नीजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याची पत्नी मुंबईत काम करते. कोविड १९ मुळे गेल्या २ वर्षापासून तो पत्नीपासून लांब राहतोय.

इतकेच नाही तर त्या व्यक्तीकडे कुठलाही मॅप, जीपीएस अथवा कपडे आढळले नाही. केवळ मर्यादित पाणीसाठा होता. होआंग सुरुवातीला बँकॉकला गेला होता. परंतु विना व्हिसा तो भारतात जाऊ शकत नाही हे त्याला कळालं. त्यानंतर तो फुकेतला पोहचला त्याने एक नौका खरेदी केली. होआंग फुकेत किनाऱ्याहून ५ मार्चला निघाला होता. परंतु समुद्रातील बदलत्या हवेमुळे तो मध्यभागी भरकटला. त्यामुळे गेल्या २ आठवड्यात कमी अंतर पार केले आणि त्यामुळे तो आम्हाला सापडला असं कॅप्टन यांनी सांगितले. थाय अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी त्याला फुकेतला नेले आहे. आम्ही व्हिएतनाम आणि भारताच्या राजदूत कार्यालयाशी संपर्क साधला आहे. परंतु अद्याप काहीही उत्तर आले नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Indiaभारत