शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

बाबो! मुंबईतील बायकोला भेटण्यासाठी 'त्याने' जे केले त्यामुळं ३ देशाचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 12:24 IST

होआंग, थायलँडच्या ८० किलोमीटर अंतरावरील सिमिलन द्विप बेटावर पोहचला होता. त्याठिकाणी काही मच्छिमारांनी त्याला पाहिले

एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडलं तर ती व्यक्ती प्रेमात काहीही करू शकतात. प्रेम म्हणजे दोन नात्यांमधील जिव्हाळा. याच प्रेमासाठी भारतापासून शेकडो मैल दूर राहणाऱ्या एका परदेशी व्यक्तीनं जे केले ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. भारतात राहणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी थायलँडहून तो थेट रबरी बोट घेऊन निघाला. मागील २ आठवडे समुद्रात प्रवास करत होता. थायलँडच्या किनारपट्टीपासून तो ५० मैल अंतरावर आला होता.

या व्यक्तीचं नाव होआंग हुंग असं आहे. तो व्हिएतनामला राहतो. फुकेत द्विप ते थाई हॉलिडे आयलँडपासून त्याने प्रवासाला सुरुवात केली. प्रेमासाठी त्याने समुद्रात २००० किमी अंतर कापण्याचं ठरवलं. मुंबईत राहणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी त्याने मनाशी ठरवलं होतं. त्यासाठी कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्याची त्याची तयारी होती. अथांग समुद्राच्या लाटांशी झुंज देण्याची जिद्द उराशी बाळगली होती. तो रबरी बोटीनं पाण्यात उतरला आणि केवळ सोबतीला काही अन्नपदार्थ ठेवले. परंतु समुद्रातून प्रवास करण्यासाठी त्याच्याकडे नेव्हिगेशन सिस्टम नव्हती.

होआंग, थायलँडच्या ८० किलोमीटर अंतरावरील सिमिलन द्विप बेटावर पोहचला होता. त्याठिकाणी काही मच्छिमारांनी त्याला पाहिले आणि समुद्रात सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या नौदलाला माहिती दिली. त्यानंतर नेव्हीच्या जवानांनी होआंगला पकडलं. थाय मेरिटाइम इंफोर्समेंट कमांड सेंटरचे कॅप्टन पिचेट सोंगटान यांच्यानुसार, हुंगने सांगितले की, तो त्याच्या पत्नीजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याची पत्नी मुंबईत काम करते. कोविड १९ मुळे गेल्या २ वर्षापासून तो पत्नीपासून लांब राहतोय.

इतकेच नाही तर त्या व्यक्तीकडे कुठलाही मॅप, जीपीएस अथवा कपडे आढळले नाही. केवळ मर्यादित पाणीसाठा होता. होआंग सुरुवातीला बँकॉकला गेला होता. परंतु विना व्हिसा तो भारतात जाऊ शकत नाही हे त्याला कळालं. त्यानंतर तो फुकेतला पोहचला त्याने एक नौका खरेदी केली. होआंग फुकेत किनाऱ्याहून ५ मार्चला निघाला होता. परंतु समुद्रातील बदलत्या हवेमुळे तो मध्यभागी भरकटला. त्यामुळे गेल्या २ आठवड्यात कमी अंतर पार केले आणि त्यामुळे तो आम्हाला सापडला असं कॅप्टन यांनी सांगितले. थाय अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी त्याला फुकेतला नेले आहे. आम्ही व्हिएतनाम आणि भारताच्या राजदूत कार्यालयाशी संपर्क साधला आहे. परंतु अद्याप काहीही उत्तर आले नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Indiaभारत