शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

बाबो! मुंबईतील बायकोला भेटण्यासाठी 'त्याने' जे केले त्यामुळं ३ देशाचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 12:24 IST

होआंग, थायलँडच्या ८० किलोमीटर अंतरावरील सिमिलन द्विप बेटावर पोहचला होता. त्याठिकाणी काही मच्छिमारांनी त्याला पाहिले

एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडलं तर ती व्यक्ती प्रेमात काहीही करू शकतात. प्रेम म्हणजे दोन नात्यांमधील जिव्हाळा. याच प्रेमासाठी भारतापासून शेकडो मैल दूर राहणाऱ्या एका परदेशी व्यक्तीनं जे केले ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. भारतात राहणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी थायलँडहून तो थेट रबरी बोट घेऊन निघाला. मागील २ आठवडे समुद्रात प्रवास करत होता. थायलँडच्या किनारपट्टीपासून तो ५० मैल अंतरावर आला होता.

या व्यक्तीचं नाव होआंग हुंग असं आहे. तो व्हिएतनामला राहतो. फुकेत द्विप ते थाई हॉलिडे आयलँडपासून त्याने प्रवासाला सुरुवात केली. प्रेमासाठी त्याने समुद्रात २००० किमी अंतर कापण्याचं ठरवलं. मुंबईत राहणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी त्याने मनाशी ठरवलं होतं. त्यासाठी कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्याची त्याची तयारी होती. अथांग समुद्राच्या लाटांशी झुंज देण्याची जिद्द उराशी बाळगली होती. तो रबरी बोटीनं पाण्यात उतरला आणि केवळ सोबतीला काही अन्नपदार्थ ठेवले. परंतु समुद्रातून प्रवास करण्यासाठी त्याच्याकडे नेव्हिगेशन सिस्टम नव्हती.

होआंग, थायलँडच्या ८० किलोमीटर अंतरावरील सिमिलन द्विप बेटावर पोहचला होता. त्याठिकाणी काही मच्छिमारांनी त्याला पाहिले आणि समुद्रात सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या नौदलाला माहिती दिली. त्यानंतर नेव्हीच्या जवानांनी होआंगला पकडलं. थाय मेरिटाइम इंफोर्समेंट कमांड सेंटरचे कॅप्टन पिचेट सोंगटान यांच्यानुसार, हुंगने सांगितले की, तो त्याच्या पत्नीजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याची पत्नी मुंबईत काम करते. कोविड १९ मुळे गेल्या २ वर्षापासून तो पत्नीपासून लांब राहतोय.

इतकेच नाही तर त्या व्यक्तीकडे कुठलाही मॅप, जीपीएस अथवा कपडे आढळले नाही. केवळ मर्यादित पाणीसाठा होता. होआंग सुरुवातीला बँकॉकला गेला होता. परंतु विना व्हिसा तो भारतात जाऊ शकत नाही हे त्याला कळालं. त्यानंतर तो फुकेतला पोहचला त्याने एक नौका खरेदी केली. होआंग फुकेत किनाऱ्याहून ५ मार्चला निघाला होता. परंतु समुद्रातील बदलत्या हवेमुळे तो मध्यभागी भरकटला. त्यामुळे गेल्या २ आठवड्यात कमी अंतर पार केले आणि त्यामुळे तो आम्हाला सापडला असं कॅप्टन यांनी सांगितले. थाय अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी त्याला फुकेतला नेले आहे. आम्ही व्हिएतनाम आणि भारताच्या राजदूत कार्यालयाशी संपर्क साधला आहे. परंतु अद्याप काहीही उत्तर आले नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Indiaभारत