शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

बाबो! मुंबईतील बायकोला भेटण्यासाठी 'त्याने' जे केले त्यामुळं ३ देशाचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 12:24 IST

होआंग, थायलँडच्या ८० किलोमीटर अंतरावरील सिमिलन द्विप बेटावर पोहचला होता. त्याठिकाणी काही मच्छिमारांनी त्याला पाहिले

एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडलं तर ती व्यक्ती प्रेमात काहीही करू शकतात. प्रेम म्हणजे दोन नात्यांमधील जिव्हाळा. याच प्रेमासाठी भारतापासून शेकडो मैल दूर राहणाऱ्या एका परदेशी व्यक्तीनं जे केले ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. भारतात राहणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी थायलँडहून तो थेट रबरी बोट घेऊन निघाला. मागील २ आठवडे समुद्रात प्रवास करत होता. थायलँडच्या किनारपट्टीपासून तो ५० मैल अंतरावर आला होता.

या व्यक्तीचं नाव होआंग हुंग असं आहे. तो व्हिएतनामला राहतो. फुकेत द्विप ते थाई हॉलिडे आयलँडपासून त्याने प्रवासाला सुरुवात केली. प्रेमासाठी त्याने समुद्रात २००० किमी अंतर कापण्याचं ठरवलं. मुंबईत राहणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी त्याने मनाशी ठरवलं होतं. त्यासाठी कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्याची त्याची तयारी होती. अथांग समुद्राच्या लाटांशी झुंज देण्याची जिद्द उराशी बाळगली होती. तो रबरी बोटीनं पाण्यात उतरला आणि केवळ सोबतीला काही अन्नपदार्थ ठेवले. परंतु समुद्रातून प्रवास करण्यासाठी त्याच्याकडे नेव्हिगेशन सिस्टम नव्हती.

होआंग, थायलँडच्या ८० किलोमीटर अंतरावरील सिमिलन द्विप बेटावर पोहचला होता. त्याठिकाणी काही मच्छिमारांनी त्याला पाहिले आणि समुद्रात सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या नौदलाला माहिती दिली. त्यानंतर नेव्हीच्या जवानांनी होआंगला पकडलं. थाय मेरिटाइम इंफोर्समेंट कमांड सेंटरचे कॅप्टन पिचेट सोंगटान यांच्यानुसार, हुंगने सांगितले की, तो त्याच्या पत्नीजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याची पत्नी मुंबईत काम करते. कोविड १९ मुळे गेल्या २ वर्षापासून तो पत्नीपासून लांब राहतोय.

इतकेच नाही तर त्या व्यक्तीकडे कुठलाही मॅप, जीपीएस अथवा कपडे आढळले नाही. केवळ मर्यादित पाणीसाठा होता. होआंग सुरुवातीला बँकॉकला गेला होता. परंतु विना व्हिसा तो भारतात जाऊ शकत नाही हे त्याला कळालं. त्यानंतर तो फुकेतला पोहचला त्याने एक नौका खरेदी केली. होआंग फुकेत किनाऱ्याहून ५ मार्चला निघाला होता. परंतु समुद्रातील बदलत्या हवेमुळे तो मध्यभागी भरकटला. त्यामुळे गेल्या २ आठवड्यात कमी अंतर पार केले आणि त्यामुळे तो आम्हाला सापडला असं कॅप्टन यांनी सांगितले. थाय अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी त्याला फुकेतला नेले आहे. आम्ही व्हिएतनाम आणि भारताच्या राजदूत कार्यालयाशी संपर्क साधला आहे. परंतु अद्याप काहीही उत्तर आले नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Indiaभारत