शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आता चीन म्हातारा होणार! एका अहवालानं चिंता वाढली; जिनपिंग यांची झोप उडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 10:51 IST

एका अहवालानं चीन सरकारची झोप उडवली; आकडेवारी पाहून जिनपिंग चिंतेत

बीजिंग: कोरोना संकटामुळे संपूर्ण जगाला संकटात टाकणारा चीन आता नव्या अडचणीत सापडला आहे. लोकसंख्येच्या जोरावर चीननं उत्पादन केंद्र अशी ओळख जगभरात निर्माण केली. मात्र आता याच लोकसंख्येमुळे चीनसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. चीनमधील वृद्धांचं प्रमाण वाढत आहे. अधिक अपत्यांना जन्म देण्यासाठी तयार करण्यात आलेलं धोरण अपयशी ठरलं आहे. विवाह दरात सातत्यानं घट होत आहे. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत नवदाम्पत्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे.

चीन सरकारच्या नागरी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या आकड्यांची तुलना केल्यास, तिसऱ्या तिमाहीत १७ लाख जोडपी विवाह बंधनात अडकली. केवळ कोविड-१९ महामारीमुळेच लग्नसंख्येत घट झालेली नाही. सरकारकडून देण्यात आलेली आश्वासनं अपूर्ण राहिल्यानंदेखील अनेकजण विवाहाचा निर्णय टाळत आहेत. चायनीज कम्युनिस्ट पक्षाच्या यूथ विंगनं नुकतंच एक सर्वेक्षण केलं. त्यात सहभागी झालेल्या जवळपास ३००० जणांनी आता आपल्याला आयुष्यात जोडीदाराची गरज नसल्याचं मत मांडलं.

आपल्याला लग्न करायचं नसल्याचं, आपण याबद्दल विचार करत नसल्याचं मत एका सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४३ टक्के महिलांनी व्यक्त केलं. लग्नाबद्दल चिनी तरुणांच्या मनात असलेल्या अनिश्चिततेचं कारण आर्थिक स्थितीशी संबंधित आहे. श्रीमंत शहरातील तरुण वर्ग लहान शहरांच्या तुलनेत लग्नाशिवाय राहणं पसंत करतो. अर्थव्यवस्था जितकी विकसित होईल, तितकेच अधिक लोक एकटं राहणं पसंती करतील, असं अहवाल सांगतो.

देशाचा आर्थिक विकास होत आहे. अशा स्थितीत लग्न न करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. या अहवालामुळे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची चिंता वाढवली आहे. आधी चीननं लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर कायदे केले. मात्र आता नागरिकांनी अधिक अपत्यं जन्माला घालावीत यासाठी चीन सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आता सुरू असलेला ट्रेंड कायम राहिल्यास येत्या काळात चीनमधील लोकसंख्येचा आलेख वेगानं खाली येईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंग