शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भारत बांग्लादेश संबंधात तणाव, दोन्ही देशांनी एकमेकाच्या उच्चायुक्तांना बजावले समन्स! प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:36 IST

बांगलादेशने भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले होते. त्यानंतर आता भारताने बांगलादेशच्या भारतातील उप उच्चायुक्तांना समन्स बजावले आहे.

India Bangladesh Issue: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर तणावाची स्थिती असून, बांगलादेशने भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावताच भारतानेही बांगलादेशच्या उप उच्चायुक्तांना सोमवारी समन्स बजावले. एएनआय वृत्त संस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने बांगलादेशचे उप उच्चायुक्त नूरल इस्लाम यांना समन्स बजावले होते. ते सोमवारी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयातून बाहेर पडताना दिसले. बांगलादेशने भारताच्या उच्चायुक्तांना समन्स बजावल्यानंतर हा घटनाक्रम घडला आहे. 

बांगलादेशने भारतीय उच्चायुक्तांना समन्स का बजावलं?

बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने रविवारी (१२ जानेवारी) भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले होते. भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफच्या हालचालींबद्दल बांगलादेशने चिंता व्यक्त केली. दोन्ही देशात सीमावाद सुरू असतानाच हे समन्स बजावण्यात आले होते. 

बांगलादेशने म्हटले आहे की, भारत सीमेवर पाच ठिकाणी सुरक्षा कुंपण करण्याचे प्रयत्न करत आहे. हे दोन्ही देशात झालेल्या कराराचे उल्लंघन आहे. बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयातील भेटीनंतर भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी सांगितले की, या बैठकीत स्मगलिंग, गुन्हेगारी कृत्ये आणि तस्करीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. गुन्हेगारी मुक्त सीमा रेषा करण्याच्या दिशेने चर्चा झाली, अशी माहिती वर्मा यांनी दिली. 

भारत बांगलादेश सीमेवरील चपैनवाबगंज (उत्तर पश्चिम), नौगाव, लालमोनिऱ्हाट आणि तीन बिघा कॉरिडोर येथे बीएसएफच्या कामावर बांगलादेशने आक्षेप घेतला आहे. 

बांगलादेश गृह मंत्रालयाचे बैठक झाली होती. या बैठकीनंतर बांगलादेशच्या गृह मंत्रालयाचे सल्लागार सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल एमडी जहांगीर आलम चौधरी यांनी 'बांगलादेश आपल्या सीमेवर कोणालाही जागा देणार नाही', असे म्हटले होते. 

"भारत-बांगलादेश सीमेवर शून्य रेषेच्या १५० फूटाच्या आत कोणतेही लष्करी बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही", असे चौधरी यांनी म्हटले आहे. बांगलादेशच्या विरोधामुळे भारताला तीन जिल्ह्यातील पाच ठिकाणी सीमेवर काम थांबवावं लागलं आहे. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशborder disputeसीमा वादCentral Governmentकेंद्र सरकारcommissionerआयुक्त