शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान होताच तारिक रहमान यांचा मोठा मास्टरस्ट्रोक; बांगलादेशने भारतीयांसाठी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 18:45 IST

बांगलादेशचे नवनियुक्त पंतप्रधान तारिक रहमान यांनी पदभार स्वीकारताच भारतासोबतचे तणावपूर्ण संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पहिले मोठे पाऊल उचलले आहे.

बांगलादेशचे नवनियुक्त पंतप्रधान तारिक रहमान यांनी पदभार स्वीकारताच भारतासोबतचे तणावपूर्ण संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पहिले मोठे पाऊल उचलले आहे. मोहम्मद यूनुस यांच्या सरकारने दोन महिन्यांपूर्वी भारतीयांसाठी स्थगित केलेली व्हिसा सेवा तारिक रहमान यांनी पुन्हा बहाल करण्याचा आदेश दिला आहे. शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ पासून दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालय भारतीयांना सर्व श्रेणीतील व्हिसा देण्यास पुन्हा सुरुवात करणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

काय होता 'यूनुस सरकार'चा निर्णय?

डिसेंबर २०२५ मध्ये बांगलादेशातील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मोहम्मद यूनुस सरकारने भारतीयांसाठी पर्यटन आणि वैद्यकीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली होती. केवळ बिझनेस आणि वर्क व्हिसा सुरू ठेवण्यात आले होते. यामुळे दोन्ही देशांमधील पर्यटनावर आणि राजनैतिक संबंधांवर मोठा परिणाम झाला होता. मात्र, बीएनपी प्रणीत नवीन सरकार सत्तेत आल्याच्या अवघ्या तीन दिवसांत हा निर्णय बदलण्यात आला आहे.

सर्व श्रेणीतील व्हिसा सेवा बहाल

आता भारतीय नागरिकांना बांगलादेशात जाण्यासाठी पर्यटन, वैद्यकीय आणि इतर सर्व प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करता येणार आहे. शुक्रवारी सकाळपासूनच ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. तारिक रहमान यांच्या या निर्णयाकडे भारतासोबतचे संबंध पुन्हा रुळावर आणण्याचा एक सकारात्मक संकेत म्हणून पाहिले जात आहे.

भारतही व्हिसा सेवा सुरू करण्याच्या तयारीत

दुसरीकडे, बांगलादेशातील भारतीयांसाठी व्हिसा सेवा सुरू झाल्यानंतर आता भारतानेही बांगलादेशी नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यास सुरुवात केली आहे. सिलहटमधील भारताचे वरिष्ठ अधिकारी अनिरुद्ध दास यांनी स्पष्ट केले की, बांगलादेशी नागरिकांसाठी मेडिकल आणि डबल-एंट्री व्हिसा सध्या दिले जात आहेत आणि लवकरच पर्यटन व्हिसाची प्रक्रियाही सामान्य होईल. "भारत-बांगलादेश संबंध परस्पर आदर आणि सामायिक हितावर आधारित आहेत," असेही त्यांनी नमूद केले.

तणावाचे सावट दूर होणार?

डिसेंबर २०२५ मध्ये बांगलादेशात झालेल्या हिंसाचारानंतर आणि चटगाव येथील भारतीय सहायक उच्चायुक्तांवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. यामुळे दोन्ही देशांनी आपापल्या व्हिसा सेवा मर्यादित केल्या होत्या. मात्र, आता तारिक रहमान यांच्या पंतप्रधानपदी आगमनानंतर दोन्ही देशांमधील व्हिसा वॉर संपण्याची चिन्हे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahman's First Move: Bangladesh Resumes Visa Services for Indians

Web Summary : Prime Minister Rahman revived visa services for Indians, reversing the previous suspension. All visa categories will be available from February 20, 2026, signaling improved relations. India reciprocates by easing visa processes for Bangladeshis, aiming to normalize relations after recent tensions and violence.
टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय