शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पाकिस्तानच्या विजयानंतर पाक चाहते 'सैराट', हवेत गोळीबार करताना 12 लोक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 18:26 IST

T20 World Cup 2021:टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला.

कराची: टी-20 विश्वचषकात रविवारी रात्री झालेल्या सामन्यात पाकिस्ताननेभारताचा पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानात जल्लोषाचे वातावरण होते. भारताविरोधातील विजय हा पाकिस्तानसाठी खूप मोठी गोष्ट आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद, कराची, रावळपिंडीसारख्या मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावर हजारोंच्या संख्येने नागरिक जल्लोष करत होते. पण, यावेळी कराचीत एक मोठी घटना घढली. या जल्लोषादरम्यान हवेत गोळीबार करत असताना 12 जण जखमी झाले आहेत. यात एका पोलिसाचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कराचीच्या ओरंगी टाऊनच्या सेक्टर-4 आणि 4K चौरंगीमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. तर, गुलशन-ए-इक्बाल येथे झालेल्या गोळीबारात एका पोलिसालाही गोळी लागली आहे. सचल गोठ, ओरंगी टाऊन, न्यू कराची, गुलशन-ए-इक्बाल आणि मालीर या विविध ठिकाणी झालेल्या गोळीबारात 12 जण जखमी झाले आहेत. 

टी-20 विश्वचषक सामन्यात काय झालं ?रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 151/7 धावा केल्या. कर्णधार कोहलीने 57 धावांची खेळी खेळली. तर, पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने 3, हसन अलीने दोन आणि हाफीज-रौफने प्रत्येकी 1 विकेट घेऊन भारताच्या टॉप ऑर्डरला माघारी पाठवले. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने एकही विकेट न गमावता 152 धावाचे लक्ष गाठले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१IndiaभारतFiringगोळीबार