शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाच जणांच्या कुटुंबाने केला आत्मघाती हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:47 IST

इंडोनेशियातील दुसरे सर्वात मोठे शहर सुराबाया स्थित पोलीस मुख्यालयावर पाच जणांच्या एका कुटुंबाने आत्मघाती हल्ला केला.

सुराबाया : इंडोनेशियातील दुसरे सर्वात मोठे शहर सुराबाया स्थित पोलीस मुख्यालयावर पाच जणांच्या एका कुटुंबाने आत्मघाती हल्ला केला. यात एका मुलाचाही समावेश आहे. एका अन्य कुटुंबाने चर्चेवर केलेल्या हल्ल्याला काही तास उलटत नाहीत तोच हा दुसरा हल्ला झाल्याने इंडोनेशिया हादरले आहे.चर्चवरील हल्ल्यांची जबाबदारी इसिसने घेतली आहे. यामुळे या संघटनेचा दक्षिणपूर्व आशियात प्रभाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आगामी तीन महिन्यात इंडोनेशियात आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत.या देशावर दीर्घ काळापासून अतिरेक्यांचा प्रभाव राहिलेला आहे. २००२ मध्ये बालीमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यात २०० जण मृत्युमुखी पडले होते. यात बहुतांश विदेशी पर्यटक होते. त्यानंतर सुरक्षा दलाने अतिरेक्यांविरुद्ध मोहिम उघडली होती. शेकडो अतिरेक्यांना अटक केली होती. अनेक अतिरेकी नेटवर्क उद्ध्वस्त केले होते. अलीकडच्या हल्ल्यात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र, रविवारी दोन मुलांसह सहा जणांच्या एका कुटुंबाने सुराबायामध्ये सकाळच्या प्रार्थनेनंतर चर्चवर आत्मघातकी हल्ला केला. यात हल्लेखोरांसह १८ जण मारले गेले. चर्चवरील हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. या हल्ल्यात सहभागी व्यक्ती जेएडीचा स्थानिक नेता आहे. हा समूह इसिसचा समर्थक आहे. दुसरे आत्मघाती कुटुंबही या समूहाशी जोडलेले आहे. कार्नावियान म्हणाले की, जेएडीच्या नेतृत्वाला झालेली अटक हे हल्ल्याचे कारण असू शकते. (वृत्तसंस्था)।नेमके काय झाले?येथे सोमवारी एका अन्य कुटुंबाने शहरातील पोलीस ठाण्याच्या परिसरात स्वत:ला उडवून दिले. यात १० जखमी झाले आहेत. राष्ट्रीय पोलीस प्रमुख टीटो कार्नावियान म्हणाले की, दोन दुचाकींवर पाच लोक आले होते. यात एक लहान मुलगाही होता.या हल्लेखोर कुटुंबातील एक ८ वर्षांची मुलगी बचावली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, पण तिची आई, वडील आणि दोन भाऊ यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद