शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'अशा घटना थांबणार नाहीत, भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा...', बलुच मानवाधिकार परिषदेची पाकिस्तानला उघड धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 10:00 IST

लंडनमधील बलुच मानवाधिकार परिषदेच्या माहिती सचिवांनी ट्रेन हायजॅकवर प्रतिक्रिया दिली. या घटनेवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, या घटनेवरून पाकिस्तान कमकुवत होत चालला आहे हे दिसून येते.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानातील दहशतवादग्रस्त बलुचिस्तानमध्ये रेल्वे अपहरणाची घटना घडली. जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण बलुच बंडखोरांनी केले होते. ट्रेनमध्ये ४४० प्रवासी होते. एकीकडे पाकिस्तानी लष्कराने सर्व अपहरणकर्त्यांच्या सुटकेसह ऑपरेशन पूर्ण झाल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने वेगळाच दावा केला आहे.  अनेक पाकिस्तानी सैनिक अजूनही त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा बलुचने केला. या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तानकडे वेधले आहे.

ट्रम्प यांचे आश्वासनही कामी आले नाही; सुनीता विल्यम्स अंतराळात पुन्हा अडकल्या, क्रू-10 लाँच झाले नाही

लंडनमधील बलुच मानवाधिकार परिषदेचे माहिती सचिव खुर्शीद अहमद यांनी ट्रेन अपहरणाबद्दल भाष्य केले. या घटनेवर चिंता व्यक्त ते म्हणाले, या घटनेवरून पाकिस्तान कमकुवत होत चालला आहे हे दिसून येते. तर बलुचिस्तानमध्ये बलुच स्वातंत्र्यसैनिक अधिक बळकट होत आहेत.

खुर्शीद अहमद यांनीही बंडखोरांचे कौतुक केले. "अशा कठोर परिस्थितीतही, बलुच स्वातंत्र्यसैनिकांनी मानवी हक्कांचे मानके पाळली आणि वृद्ध, महिला आणि कुटुंबांना क्वेट्टाला परतण्याची परवानगी दिली", असंही अहमद म्हणाले.  त्यांनी अनेक लष्करी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आणि बेपत्ता बलुच लोकांच्या सुटकेची मागणी केली. आम्हाला विश्वास आहे की अशा घटना भविष्यात थांबणार नाहीत.

ते पुढे म्हणाले, "आपण बलुचिस्तानमधील पाकिस्तान-चीन प्रकल्पांवर बलुचिस्तान स्वातंत्र्यसैनिक, बीएलए हल्ला करताना पाहत आहोत. बीएलए आपल्या मातृभूमीचे रक्षण करत आहे. बलुचिस्तानमधील परिस्थिती अशी आहे की भारत आणि पाश्चात्य शक्तींनी बलुचिस्तानच्या राष्ट्रीय संघर्षाला पाठिंबा द्यावा, असंही ते म्हणाले. 

पाकिस्तान रेल्वेने रेल्वे अपहरणाबद्दल निवेदन दिले

रेल्वे अपहरणावर पाकिस्तानच्या रेल्वे विभागाचे रेल्वे नियंत्रक मुहम्मद काशिफ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नऊ डब्यांची ही ट्रेन बोगदा क्रमांक ८ मध्ये सशस्त्र लोकांनी थांबवली. पाकिस्तान रेल्वेच्या मते, या मार्गावर १७ बोगदे आहेत आणि कठीण भूप्रदेशामुळे गाड्या अनेकदा मंद गतीने जातात. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी या घटनेचा निषेध केला आणि म्हटले की, "निरपराध प्रवाशांवर गोळीबार करणाऱ्या क्रूरांना कोणत्याही प्रकारची दया दाखवता येणार नाही."

टॅग्स :Pakistanपाकिस्तान