शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'अशा घटना थांबणार नाहीत, भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा...', बलुच मानवाधिकार परिषदेची पाकिस्तानला उघड धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 10:00 IST

लंडनमधील बलुच मानवाधिकार परिषदेच्या माहिती सचिवांनी ट्रेन हायजॅकवर प्रतिक्रिया दिली. या घटनेवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, या घटनेवरून पाकिस्तान कमकुवत होत चालला आहे हे दिसून येते.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानातील दहशतवादग्रस्त बलुचिस्तानमध्ये रेल्वे अपहरणाची घटना घडली. जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण बलुच बंडखोरांनी केले होते. ट्रेनमध्ये ४४० प्रवासी होते. एकीकडे पाकिस्तानी लष्कराने सर्व अपहरणकर्त्यांच्या सुटकेसह ऑपरेशन पूर्ण झाल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने वेगळाच दावा केला आहे.  अनेक पाकिस्तानी सैनिक अजूनही त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा बलुचने केला. या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तानकडे वेधले आहे.

ट्रम्प यांचे आश्वासनही कामी आले नाही; सुनीता विल्यम्स अंतराळात पुन्हा अडकल्या, क्रू-10 लाँच झाले नाही

लंडनमधील बलुच मानवाधिकार परिषदेचे माहिती सचिव खुर्शीद अहमद यांनी ट्रेन अपहरणाबद्दल भाष्य केले. या घटनेवर चिंता व्यक्त ते म्हणाले, या घटनेवरून पाकिस्तान कमकुवत होत चालला आहे हे दिसून येते. तर बलुचिस्तानमध्ये बलुच स्वातंत्र्यसैनिक अधिक बळकट होत आहेत.

खुर्शीद अहमद यांनीही बंडखोरांचे कौतुक केले. "अशा कठोर परिस्थितीतही, बलुच स्वातंत्र्यसैनिकांनी मानवी हक्कांचे मानके पाळली आणि वृद्ध, महिला आणि कुटुंबांना क्वेट्टाला परतण्याची परवानगी दिली", असंही अहमद म्हणाले.  त्यांनी अनेक लष्करी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आणि बेपत्ता बलुच लोकांच्या सुटकेची मागणी केली. आम्हाला विश्वास आहे की अशा घटना भविष्यात थांबणार नाहीत.

ते पुढे म्हणाले, "आपण बलुचिस्तानमधील पाकिस्तान-चीन प्रकल्पांवर बलुचिस्तान स्वातंत्र्यसैनिक, बीएलए हल्ला करताना पाहत आहोत. बीएलए आपल्या मातृभूमीचे रक्षण करत आहे. बलुचिस्तानमधील परिस्थिती अशी आहे की भारत आणि पाश्चात्य शक्तींनी बलुचिस्तानच्या राष्ट्रीय संघर्षाला पाठिंबा द्यावा, असंही ते म्हणाले. 

पाकिस्तान रेल्वेने रेल्वे अपहरणाबद्दल निवेदन दिले

रेल्वे अपहरणावर पाकिस्तानच्या रेल्वे विभागाचे रेल्वे नियंत्रक मुहम्मद काशिफ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नऊ डब्यांची ही ट्रेन बोगदा क्रमांक ८ मध्ये सशस्त्र लोकांनी थांबवली. पाकिस्तान रेल्वेच्या मते, या मार्गावर १७ बोगदे आहेत आणि कठीण भूप्रदेशामुळे गाड्या अनेकदा मंद गतीने जातात. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी या घटनेचा निषेध केला आणि म्हटले की, "निरपराध प्रवाशांवर गोळीबार करणाऱ्या क्रूरांना कोणत्याही प्रकारची दया दाखवता येणार नाही."

टॅग्स :Pakistanपाकिस्तान