शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

आडमुठेपणा! भारतीय खलाशी असलेल्या जहाजांना चीनमध्ये प्रवेश नाही; कोट्यवधीचा व्यापार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 09:15 IST

शिपिंग कंपन्यांसह २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांपुढे पेच

सुहास शेलार

मुंबई : कोरोना विषाणूचा जनक असलेल्या चीनने पुन्हा एकदा भारताविरोधात मोहीम उघडली आहे. भारतीय खलाशी असलेल्या जहाजांना प्रवेश न देण्याचे फर्मान चिनी सरकारने काढल्यामुळे कोट्यवधींचा व्यापार ठप्प झाल्याची माहिती एका शिपिंग कंपनीशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. चीनच्या या आडमुठेपणामुळे शिपिंग कंपन्यांसह २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

लसीकरण पूर्ण न झाल्याने आधीच भारतीय खलाशांना परदेशी जहाजावर घेतले जात नाही. तर जे खलाशी दुसऱ्या लाटेआधी रुजू झाले त्यांच्यासमोर चीनने अडचणी निर्माण केल्या आहेत. ज्या भारतीय खलाशाचे लसीकरण पूर्ण झालेले नसेल, त्यांना चीनमध्ये प्रवेश न देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. असे खलाशी आढळल्यास जहाजाला चीनमधील कोणत्याही बंदरावर प्रवेश दिला जात नसल्याने शिपिंग कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. यामुळे कोट्यवधींचा व्यापार ठप्प होण्याबरोबरच भारतीय खलाशांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची माहिती ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी दिली.

दुसऱ्या लाटेआधी जहाजांवर रुजू झालेल्या बहुतांश भारतीय खलाशांचे लसीकरण झालेले नाही. परंतु, हे खलाशी जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नाहीत. त्याच जहाजावर असलेल्या अन्य देशांतील खलाशांना लसीकरणाची अट चीनने घातलेली नाही. त्यामुळे भारताची व्यापारकोंडी करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका सांगळे यांनी व्यक्त केली.

अशी होते अडवणूक... सागरी व्यापार क्षेत्रात सेवा देणाऱ्या भारतीय खलाशांची संख्या सर्वाधिक म्हणजे ८० टक्के इतकी असली तरी जागतिक बाजारपेठेवर चीनची हुकूमत आहे. कच्च्या किंवा तयार मालाच्या वाहतुकीच्या माध्यमातून शिपिंग कंपन्यांना सर्वाधिक व्यवसाय तेथूनच मिळतो. त्यामुळे चिनी सरकाच्या आदेशाचे पालन केल्यावाचून कंपन्यांसमोर पर्याय नाही. त्यामुळे बहुतांश कंपन्यांनी भारतीय खलाशांची चीनमधील सेवा स्थगित केली आहे. काहींनी तर त्यांना पुन्हा मायदेशी पाठविण्यास सुरुवात केली असून, नव्याने रुजू होणाऱ्यांना काही महिने वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे.

चीनच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात आम्ही डी.जी. शिपिंग, नौवहनमंत्री, तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन तोडगा काढावा. अन्यथा भारतीय खलाशांना नोकऱ्या गमावाव्या लागतीलच, शिवाय सागरी व्यापार क्षेत्रातील आपले महत्त्व कमी होईल. - अभिजित सांगळे, कार्याध्यक्ष, ऑल इंडिया सिफेरर्स युनियन

टॅग्स :chinaचीनIndiaभारत