शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

आडमुठेपणा! भारतीय खलाशी असलेल्या जहाजांना चीनमध्ये प्रवेश नाही; कोट्यवधीचा व्यापार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 09:15 IST

शिपिंग कंपन्यांसह २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांपुढे पेच

सुहास शेलार

मुंबई : कोरोना विषाणूचा जनक असलेल्या चीनने पुन्हा एकदा भारताविरोधात मोहीम उघडली आहे. भारतीय खलाशी असलेल्या जहाजांना प्रवेश न देण्याचे फर्मान चिनी सरकारने काढल्यामुळे कोट्यवधींचा व्यापार ठप्प झाल्याची माहिती एका शिपिंग कंपनीशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. चीनच्या या आडमुठेपणामुळे शिपिंग कंपन्यांसह २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

लसीकरण पूर्ण न झाल्याने आधीच भारतीय खलाशांना परदेशी जहाजावर घेतले जात नाही. तर जे खलाशी दुसऱ्या लाटेआधी रुजू झाले त्यांच्यासमोर चीनने अडचणी निर्माण केल्या आहेत. ज्या भारतीय खलाशाचे लसीकरण पूर्ण झालेले नसेल, त्यांना चीनमध्ये प्रवेश न देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. असे खलाशी आढळल्यास जहाजाला चीनमधील कोणत्याही बंदरावर प्रवेश दिला जात नसल्याने शिपिंग कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. यामुळे कोट्यवधींचा व्यापार ठप्प होण्याबरोबरच भारतीय खलाशांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची माहिती ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी दिली.

दुसऱ्या लाटेआधी जहाजांवर रुजू झालेल्या बहुतांश भारतीय खलाशांचे लसीकरण झालेले नाही. परंतु, हे खलाशी जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नाहीत. त्याच जहाजावर असलेल्या अन्य देशांतील खलाशांना लसीकरणाची अट चीनने घातलेली नाही. त्यामुळे भारताची व्यापारकोंडी करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका सांगळे यांनी व्यक्त केली.

अशी होते अडवणूक... सागरी व्यापार क्षेत्रात सेवा देणाऱ्या भारतीय खलाशांची संख्या सर्वाधिक म्हणजे ८० टक्के इतकी असली तरी जागतिक बाजारपेठेवर चीनची हुकूमत आहे. कच्च्या किंवा तयार मालाच्या वाहतुकीच्या माध्यमातून शिपिंग कंपन्यांना सर्वाधिक व्यवसाय तेथूनच मिळतो. त्यामुळे चिनी सरकाच्या आदेशाचे पालन केल्यावाचून कंपन्यांसमोर पर्याय नाही. त्यामुळे बहुतांश कंपन्यांनी भारतीय खलाशांची चीनमधील सेवा स्थगित केली आहे. काहींनी तर त्यांना पुन्हा मायदेशी पाठविण्यास सुरुवात केली असून, नव्याने रुजू होणाऱ्यांना काही महिने वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे.

चीनच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात आम्ही डी.जी. शिपिंग, नौवहनमंत्री, तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन तोडगा काढावा. अन्यथा भारतीय खलाशांना नोकऱ्या गमावाव्या लागतीलच, शिवाय सागरी व्यापार क्षेत्रातील आपले महत्त्व कमी होईल. - अभिजित सांगळे, कार्याध्यक्ष, ऑल इंडिया सिफेरर्स युनियन

टॅग्स :chinaचीनIndiaभारत