शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 00:00 IST

पाकिस्तानने भारताला लागून असलेल्या सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली आहे. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानने आपल्या सैनिकांना बंकरमधूनच लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. यामुळे, भारताकडून हल्लाही होऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानी नागरिकांना सतावत आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारही सक्रिय झाले आहे. पाकिस्तानने भारताला लागून असलेल्या सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली आहे. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानने आपल्या सैनिकांना बंकरमधूनच लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता.

सीएनएन-न्यूज१८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रावळपिंडी येथे मुख्यालय असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या १० व्या कॉर्प्सला आणि सियालकोटमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी सैनिकांना सीमेजवळील बंकरमध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे, भारताचेही संपूर्ण सैन्य सतर्क आहे. दरम्यान, भारताने जी-२० देशांच्या राजदूतांना बोलावून पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात देशातील विविध राजकीय पक्षांचे मत जाणून घेण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीसाठी सर्व प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. सर्वांनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आरोग्यमंत्री जेपी नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, तसेच विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानBorderसीमारेषाSoldierसैनिक