शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘काश्मिरींच्या पाठीशी उभे राहणे हा जिहादच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 04:36 IST

काश्मिरी जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे जिहाद केल्यासारखेच आहे आणि जगाने जरी पाठ फिरविली तरी पाकिस्तान काश्मिरींना कायम पाठिंबा देतच राहील

इस्लामाबाद : काश्मिरी जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे जिहाद केल्यासारखेच आहे आणि जगाने जरी पाठ फिरविली तरी पाकिस्तान काश्मिरींना कायम पाठिंबा देतच राहील, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी ते अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेथून रविवारी पाकिस्तानला परतल्यानंतर इस्लामाबाद विमानतळाच्या बाहेर आपल्या पक्षकार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात त्यांनी हे उद्गार काढले. इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत शुक्रवारी केलेल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता. प्रत्येक देशाच्या प्रमुखाला आमसभेत भाषण करण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येतो. मात्र, इम्रान खान यांनी सुमारे ५० मिनिटे भाषण केले. त्यांच्या भाषणाचा अर्धा भाग हा काश्मीरशी संबंधित मुद्यांनीच व्यापलेला होता. ते म्हणाले होते की, काश्मीरमधील राजकीय बंद्यांची त्वरित मुक्तता करण्यात यावी.इम्रान खान म्हणाले की, काश्मिरी लोकांसाठी पाकिस्तान लढत राहणार आहे. सध्याचा काळ आपल्याला अनुकूल नसल्याने दु:खी व्हायचे काहीही कारण नाही. पाकिस्तानी लोकांचा पाठिंबा मिळाला तर काश्मिरी नक्की विजयी होतील.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर