शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

श्रीलंकेच्या बडतर्फ पंतप्रधानांना संसदेच्या अध्यक्षांकडून पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 05:18 IST

राष्ट्राध्यक्षांनी बडतर्फ केलेले पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या पाठीशी श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या उभे राहिल्याने भारताच्या दक्षिणेकडील शेजारी देशात दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या घटनात्मक पेचप्रसंगात नवी भर पडली.

कोलंबो : राष्ट्राध्यक्षांनी बडतर्फ केलेले पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या पाठीशी श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या उभे राहिल्याने भारताच्या दक्षिणेकडील शेजारी देशात दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या घटनात्मक पेचप्रसंगात नवी भर पडली. संसदेच्या अध्यक्षांनी बडतर्फ पंतप्रधानांनाच पंतप्रधान म्हणून मान्यता दिली, एवढेच नव्हे तर संसद येत्या १६ नोव्हेंबरपर्यंत निलंबित ठेवण्याचा राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांचा निर्णयही चुकीचा असल्याचे म्हटले.राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांनी शुक्रवारी पंतप्रधान विक्रमसिंघे यांना बडतर्फ करून त्यांच्या जागी माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना नेमले. आपल्याकडे अजूनही बहुमत असल्याने राजपक्षे यांची नेमणूक व शपथविधी घटनाबाह्य आहे, असा दावा विक्रमसिंघे यांनी केला.श्रीलंकेत लोकशाही मूल्ये आणि संवैधानिक प्रक्रियांचा आदर केला जाईल, अशी अपेक्षा भारताने रविवारी व्यक्त केली. तेथे झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, श्रीलंकेतील घटनांवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. तेथे लोकशाही मूल्यांची बूज राखली जाईल, अशी एक शेजारी व लोकशाही देश म्हणून भारताची अपेक्षा आहे. श्रीलंकेतील विकासकामांना भारताकडून यापुढेही मदत देणे सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका