शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka Crisis : श्रीलंका सोडून पळ काढण्याच्या प्रयत्नात होता राष्ट्रपतींचा भाऊ; संतप्त कर्मचाऱ्यांनी रोखलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 10:54 IST

Sri Lanka Crisis : श्रीलंका सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बासिल यांना विमानतळ कर्मचाऱ्यांनीच रोखले असल्याची घटना आता समोर आली आहे.

श्रीलंकेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याच दरम्यान राष्ट्रपती गोटाबाया यांचा लहान भाऊ बासिल राजपक्षे यांनाही याचा अनुभव आला. श्रीलंका सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बासिल यांना विमानतळ कर्मचाऱ्यांनीच रोखले असल्याची घटना आता समोर आली आहे. 

राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे भाऊ बासिल राजपक्षे हे कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. बासिल हे देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, विमानतळावर इमीग्रेशन कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला. विमानतळ कर्मचारी युनियनने बासिल राजपक्षे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. इमिग्रेसन कर्मचारी आणि युनियनने रात्रीच कामबंद आंदोलन केले. घोषणाबाजीनंतर बासिल राजपक्षे यांना माघारी जावे लागले. 

बासिल राजपक्षे हे श्रीलंकेचे माजी अर्थमंत्री आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबीयांतील अनेकजण सरकारमध्ये सहभागी होते. अनेकांकडे महत्त्वाची खाती होती. श्रीलंकेतील आर्थिक संकटासाठी राजपक्षे जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राष्ट्रपती गोटाबाया हे देश सोडून गेले असल्याचे म्हटले जात आहे. तर, गोटाबाया अद्यापही देशात असल्याचा दावा सरकारी यंत्रणांकडून करण्यात आला आहे. राष्ट्रपती गोटाबाया यांनी अजूनही औपचारिकपणे राजीनामा दिला नाही. सध्या ते कुठे आहेत, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आपल्या पदावरून येत्या बुधवारी, १३ जुलै रोजी पायउतार होण्याची तयारी दर्शविली आहे. त्या देशात सर्वपक्षीय हंगामी सरकार बनविण्यास तेथील विरोधी पक्षांनी होकार दिला आहे. श्रीलंकेत निर्माण झालेला राजकीय पेचप्रसंग शांततापूर्ण मार्गाने सोडविण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जनतेने शांतता राखावी, असे आवाहन त्या देशाचे लष्करप्रमुख जनरल शावेंद्र सिल्वा यांनी केले आहे. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका