शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील आंदोलकांच्या हल्ल्यात भारतीय अधिकारी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:25 IST

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील आंदोलकांनी भारतीय हाय कमिशनमधील अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली असून, या जीवघेण्या हल्ल्यात भारतीय हाय कमिशनमधील एक ज्येष्ठ अधिकारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

कोलंबो - ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीलंकेत मोठं आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळे श्रीलंकेतील जनतेमधील असंतोष उफाळून आला असून, तिथे सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, श्रीलंकेतील आंदोलकांनी भारतीय हाय कमिशनमधील अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली असून, या जीवघेण्या हल्ल्यात भारतीय हाय कमिशनमधील एक ज्येष्ठ अधिकारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. भारतीय हायकमिशनकडून याबाबतची माहिती आज देण्यात आली. 

श्रीलंकेत घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हाय कमिशनकडून भारतीय नागरिकांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. श्रीलंकेतील घडामोडींची माहिती घेत राहा आणि त्यानुसार ये जा करा, तसेच अन्य कामांचे नियोजन करा, असा सल्ला देण्यात आला आहे. 

भारतीय हाय कमिशनने एका ट्विटमध्ये सांगितले की, भारत आणि श्रीलंकेतील जनतेचे संबंध नेहमी सौहार्दपूर्ण आणि मैत्रिपूर्ण राहिले आहेत. सद्यस्थितीत श्रीलंकेत राहत असलेल्या भारतीय नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी नवीन घडत असलेल्या घटनांबाबत सावध राहावे. तसेच परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत.

हाय कमिशनमधील अधिकाऱ्यांनी सकाळी भारतीय नागरिक आणि भारतीय व्हिसा केंद्राचे संचालक विवेक वर्मा यांची भेट घेतली. ते सोमवारी रात्री कोलंबो जवळ विनाकारण करण्यात आलेल्या हल्ल्यात जखमी झाले होते.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाIndiaभारत