शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चीनने वाढवले भारताचे 'टेन्शन'; श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात पाठवली हेरगिरी करणारी अवाढव्य जहाजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 12:04 IST

श्रीलंका सध्या चीनकडून घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे

China vs India, Sri Lanka Naval Field : अलीकडच्या काळात चीनच्या काही हेर जहाजांनी श्रीलंकेला भेट दिली असल्याचे वृत्त आले होते. आता ही जहाजे श्रीलंकेत पोहोचण्याचा खरा उद्देश समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. चिनी गुप्तचर जहाजांच्या श्रीलंकेला भेट देण्यामागे भारतात दडलेला खजिना कारणीभूत असून यावर चिनी ड्रॅगनची नजर आहे. ही जहाजे कोलंबोला वारंवार भेट देणे हा दक्षिण भारतातील महत्त्वाच्या धोरणात्मक मालमत्तेबद्दल आणि या प्रदेशातील भारताच्या भूमिकेबद्दल माहिती गोळा करण्याच्या व्यापक धोरणाचा भाग आहे. त्याच वेळी, चीन मुन्नारच्या आखातात असलेल्या पर्यावरणीय आणि खनिज खजिन्याबद्दल अनेक गोष्टींवर नजर ठेवून असल्याचे बोलले जात आहे.

चीनची रणनीती समजणाऱ्या तज्ञांच्या मते, श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात चीनच्या हेर जहाजांद्वारे कारवाया सुरू आहेत. श्रीलंकेने सध्या चीनकडून भरपूर प्रमाणात कर्ज घेतले आहे. त्यामुळे श्रीलंकेला त्या कर्जाच्या ओझ्याखाली राहत, काही गोष्टींना नाईलाजाने परवानगी द्यावी लागत आहे. श्रीलंकेच्या द्विपक्षीय कर्जामध्ये चीनचा वाटा 52 टक्के आहे. श्रीलंकेच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्याच्या कोणत्याही प्रयत्नासाठी चीनची मान्यता महत्त्वाची आहे. चीन आपल्या युद्धनौका आणि इतर जहाजांना इंधन भरण्यासाठी हंबनटोटा बंदराचा वापर करत आहेत. अशा स्थितीत केव्हाही ही जहाजे पश्चिम-पूर्व आणि दक्षिण हिंदी महासागराच्या प्रदेशात येतात. भारताच्या सामरिक हितांशी तडजोड होऊ देणार नाही, असा विश्वासही श्रीलंकेने व्यक्त केला आहे. तरीही चीनचा श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रातील हस्तक्षेप या प्रकरणाची भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

मुन्नारच्या आखाताला तीन भिन्न किनारी परिसंस्था, कोरल रीफ, सीग्रास आणि खारफुटी अशी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. सागरी जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून हे जगातील सर्वात श्रीमंत क्षेत्रांपैकी एक मानले जाते. हा परिसर त्याच्या अद्वितीय जैविक संपत्तीसाठी देखील प्रसिद्ध आहे. याशिवाय, येथे जागतिक महत्त्व असलेल्या सागरी विविधतेचे भांडार आहे. या खाडीत अनेक हजार वर्षांपूर्वीच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या ४२२३ प्रजाती आहेत. त्यामुळे ते भारतातील सर्वात समृद्ध किनारपट्टी क्षेत्रांपैकी एक बनले जाते. याच नैसर्गित खजिन्यावर चीनची नजर असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतSri Lankaश्रीलंका