शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

"जिथे विष मिसळवलं गेलंय, ती जागा दाखवा"; अरविंद केजरीवालांना निवडणूक आयोगाचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:07 IST

ECI Arvind Kejriwal: यमुनेच्या पाण्यात विष मिसळवलं जात असल्याच्या आरोपामुळे आपचे नेते अरविंद केजरीवाल अडचणीत आले आहेत. त्यांना निवडणूक आयोगाकडून विचारणा करण्यात आली आहे. 

Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या दूषित पाण्याबद्दल केलेल्या विधानाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवालांकडे याचे पुरावे मागितले असून, ज्या ठिकाणी विष पाण्यात विष मिसळवलं जात आहे, ती जागा दाखवा असे आयोगाने म्हटले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना म्हटलं आहे की, पाण्यात अमोनियाचे प्रमाण जास्त होणे आणि पाण्यात विष मिसळवणे, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दोन्ही एकत्र करू नका. पाण्यात विष मिसळवलं गेलं, याबद्दलचे ठोस पुरावे शुक्रवारी (३१ जानेवारी) सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करावेत. जर उत्तर समाधानकारक नसेल, तर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयोगाने केजरीवालांना दिला आहे. 

निवडणूक आयोगाने केजरीवालांना कोणते प्रश्न विचारले?

यमुना नदीत विष कोणी मिसळवलं आहे?

यमुना नदीत कोणते विष कालवण्यात आले आहे?

यमुना नदीत विष असल्याचा शोध कोणत्या अभियंत्याने लावला आहे?

यमुना नदीत कोणत्या ठिकाणी विष आढळून आले आहे?

पाण्यात विष पसरू नये म्हणून कशा पद्धतीने रोखले गेले आहे?

आयोगाने म्हटले आहे की, तथ्यांच्या आधारावर आणि कायदेशीर पुराव्यांसह उत्तर सादर करावे. जेणेकरून आयोग या प्रकरणाची चौकशी करेल आणि पुढील कारवाई करेल. 

केजरीवालांना दिलेल्या नोटीसमध्ये आयोगाने म्हटले आहे की, अशा आरोपाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जसे की स्थानिक गटांमध्ये, दोन्ही राज्यातील नागरिकांमध्ये वैर निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थाही बिघडू शकते. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग