शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"जिथे विष मिसळवलं गेलंय, ती जागा दाखवा"; अरविंद केजरीवालांना निवडणूक आयोगाचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:07 IST

ECI Arvind Kejriwal: यमुनेच्या पाण्यात विष मिसळवलं जात असल्याच्या आरोपामुळे आपचे नेते अरविंद केजरीवाल अडचणीत आले आहेत. त्यांना निवडणूक आयोगाकडून विचारणा करण्यात आली आहे. 

Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या दूषित पाण्याबद्दल केलेल्या विधानाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवालांकडे याचे पुरावे मागितले असून, ज्या ठिकाणी विष पाण्यात विष मिसळवलं जात आहे, ती जागा दाखवा असे आयोगाने म्हटले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना म्हटलं आहे की, पाण्यात अमोनियाचे प्रमाण जास्त होणे आणि पाण्यात विष मिसळवणे, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दोन्ही एकत्र करू नका. पाण्यात विष मिसळवलं गेलं, याबद्दलचे ठोस पुरावे शुक्रवारी (३१ जानेवारी) सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करावेत. जर उत्तर समाधानकारक नसेल, तर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयोगाने केजरीवालांना दिला आहे. 

निवडणूक आयोगाने केजरीवालांना कोणते प्रश्न विचारले?

यमुना नदीत विष कोणी मिसळवलं आहे?

यमुना नदीत कोणते विष कालवण्यात आले आहे?

यमुना नदीत विष असल्याचा शोध कोणत्या अभियंत्याने लावला आहे?

यमुना नदीत कोणत्या ठिकाणी विष आढळून आले आहे?

पाण्यात विष पसरू नये म्हणून कशा पद्धतीने रोखले गेले आहे?

आयोगाने म्हटले आहे की, तथ्यांच्या आधारावर आणि कायदेशीर पुराव्यांसह उत्तर सादर करावे. जेणेकरून आयोग या प्रकरणाची चौकशी करेल आणि पुढील कारवाई करेल. 

केजरीवालांना दिलेल्या नोटीसमध्ये आयोगाने म्हटले आहे की, अशा आरोपाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जसे की स्थानिक गटांमध्ये, दोन्ही राज्यातील नागरिकांमध्ये वैर निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थाही बिघडू शकते. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग