शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

"जिथे विष मिसळवलं गेलंय, ती जागा दाखवा"; अरविंद केजरीवालांना निवडणूक आयोगाचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:07 IST

ECI Arvind Kejriwal: यमुनेच्या पाण्यात विष मिसळवलं जात असल्याच्या आरोपामुळे आपचे नेते अरविंद केजरीवाल अडचणीत आले आहेत. त्यांना निवडणूक आयोगाकडून विचारणा करण्यात आली आहे. 

Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या दूषित पाण्याबद्दल केलेल्या विधानाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवालांकडे याचे पुरावे मागितले असून, ज्या ठिकाणी विष पाण्यात विष मिसळवलं जात आहे, ती जागा दाखवा असे आयोगाने म्हटले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना म्हटलं आहे की, पाण्यात अमोनियाचे प्रमाण जास्त होणे आणि पाण्यात विष मिसळवणे, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दोन्ही एकत्र करू नका. पाण्यात विष मिसळवलं गेलं, याबद्दलचे ठोस पुरावे शुक्रवारी (३१ जानेवारी) सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करावेत. जर उत्तर समाधानकारक नसेल, तर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयोगाने केजरीवालांना दिला आहे. 

निवडणूक आयोगाने केजरीवालांना कोणते प्रश्न विचारले?

यमुना नदीत विष कोणी मिसळवलं आहे?

यमुना नदीत कोणते विष कालवण्यात आले आहे?

यमुना नदीत विष असल्याचा शोध कोणत्या अभियंत्याने लावला आहे?

यमुना नदीत कोणत्या ठिकाणी विष आढळून आले आहे?

पाण्यात विष पसरू नये म्हणून कशा पद्धतीने रोखले गेले आहे?

आयोगाने म्हटले आहे की, तथ्यांच्या आधारावर आणि कायदेशीर पुराव्यांसह उत्तर सादर करावे. जेणेकरून आयोग या प्रकरणाची चौकशी करेल आणि पुढील कारवाई करेल. 

केजरीवालांना दिलेल्या नोटीसमध्ये आयोगाने म्हटले आहे की, अशा आरोपाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जसे की स्थानिक गटांमध्ये, दोन्ही राज्यातील नागरिकांमध्ये वैर निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थाही बिघडू शकते. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग