शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

शेख हसीना युग संपले! बांगलादेशात तारिक रहमान यांचे नवे मंत्रिमंडळ; ५० पैकी ४१ चेहरे नवीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:43 IST

तब्बल २० वर्षांच्या वनवासानंतर बांगलादेश नॅशनल पार्टी पुन्हा एकदा सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झाली आहे.

बांगलादेशच्या राजकारणात मंगळवारी एका नव्या युगाची सुरुवात झाली. तब्बल २० वर्षांच्या वनवासानंतर बांगलादेश नॅशनल पार्टी पुन्हा एकदा सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्यासोबतच ५० सदस्यीय मंत्रिमंडळही अस्तित्वात आले असून, यामध्ये ४१ नवीन चेहऱ्यांना संधी देऊन रहमान यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

निवडणुकीत बीएनपीची लाट

१२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीने निर्भेळ यश संपादन केले. ३०० जागांपैकी एकट्या बीएनपीने २०९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले, तर त्यांच्या मित्रपक्षांना ३ जागा मिळाल्या. ढाका येथील राष्ट्रीय संसदेच्या साउथ प्लाझा येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात तारिक रहमान यांच्यासोबत २५ कॅबिनेट मंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळात तीन तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश करून कारभारात व्यावसायिकता आणण्याचा प्रयत्न रहमान यांनी केला आहे.

मंत्रिमंडळात 'फ्रेश' चेहऱ्यांचा भरणा

तारिक रहमान यांच्या या नवीन संघात जुन्या जाणत्या नेत्यांपेक्षा नवीन रक्ताला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. २५ कॅबिनेट मंत्र्यांपैकी १७ जण पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत, तर २४ ही राज्यमंत्री पूर्णपणे नवीन आहेत. स्वतः पंतप्रधान तारिक रहमान देखील पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा भाग बनले आहेत. एजेडएम जाहिद हुसेन, खलीलुर रहमान, अब्दुल अवल मिंटू आणि अफरोजा खानम रीता यांसारख्या नेत्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.

शपथ घेताच 'जुलै चार्टर' नाकारला

सत्ता हातात येताच तारिक रहमान यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. लोकशाही सुधारणांसाठी अंतरिम सरकारने आणलेला 'जुलै चार्टर' हा प्रस्ताव त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला. या चार्टरनुसार सर्व खासदारांना घटनात्मक सुधारणा परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घ्यायची होती, मात्र बीएनपीच्या खासदारांनी याला नकार दिला. "आम्ही या कामासाठी निवडून आलेलो नाही," असे म्हणत बीएनपीने जनमत संग्रहाचा कौल मानण्यास नकार दिला आहे. यामुळे बांगलादेशातील लोकशाही सुधारणांच्या भविष्यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

भारत-बांगलादेश संबंधांकडे लक्ष

शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारताशी असलेले संबंध अत्यंत घनिष्ठ होते. आता दोन दशकांनंतर बीएनपी सत्तेत आल्यामुळे आणि तारिक रहमान यांनी सूत्रे हाती घेतल्यामुळे भारतासोबतचे संबंध कोणत्या वळणावर जातात, याकडे संपूर्ण दक्षिण आशियाचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sheikh Hasina Era Ends! Tarique Rahman's New Cabinet in Bangladesh

Web Summary : Tarique Rahman became Bangladesh's PM after BNP's election victory. A 50-member cabinet includes 41 new faces. Rahman rejected the 'July Charter,' raising concerns about democratic reforms. All eyes are on future India-Bangladesh relations.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयBangladeshबांगलादेश