शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

१२६ कोटी नागरिकांची महिला भागवताहेत तहान; जलसंकटाचा सर्वाधिक फटका महिलांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 09:14 IST

राजस्थान, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश ही देशातील अशी राज्ये आहेत, जिथे महिलांना मुलगी जन्माला येऊ नये असे वाटते.

जिनिव्हा - जगभरातील तब्बल १२६ कोटी लोक पाण्यासाठी महिलांवर अवलंबून असल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटना-युनिसेफच्या अहवालातून समोर आले आहे. अहवालानुसार, आजही जगभरात १८० कोटी लोक अशा घरांमध्ये राहतात जिथे पाण्याची व्यवस्था नाही. अशा घरांमध्ये १५ आणि त्याहून अधिक वयाच्या मुलींवर प्रामुख्याने पाणी आणण्याची जबाबदारी असते.अशा पहिल्याच अभ्यासानुसार, जगभरातील पाणीपुरवठा होत नसलेली १० पैकी सात कुटुंबे पाणी आणण्याची जबाबदारी महिलांवर ढकलतात. केवळ ३० टक्के कुटुंबातील पुरुष पाणी आणण्यासाठी मदत करतात. अहवालानुसार, जगात जसजसे जलसंकट वाढत जाईल, तसतसा त्याचा सर्वाधिक फटका महिलांना बसणार आहे.

भारतात काय स्थिती? भारतातील २६ टक्के घरांमध्ये अजूनही पाणीपुरवठा होत नाही आणि २० टक्के घरांमध्ये महिलांना पाणी आणावे लागते.या कामात तिची दररोज सुमारे २० मिनिटे वाया जातात. देशातील सर्वाधिक पाणी आणण्याची जबाबदारी राजस्थानच्या महिलांवर आहे. महिलांना घरात योग्य तो सन्मानही दिला जात नाही. त्यांना अशा नोकऱ्या दिल्या जातात ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात पुढील चांगल्या संधींची शक्यता कमी होते.

कोणत्या राज्यात मुलगी नकोशी?राजस्थान, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश ही देशातील अशी राज्ये आहेत, जिथे महिलांना मुलगी जन्माला येऊ नये असे वाटते. या राज्यांतील पुरुषांमध्ये मात्र घरात मुलगी जन्माला यावी अशी इच्छा अधिक असते.

लैंगिक शोषणाची वाढती भीती१५ वर्षांखालील मुलींना पाणी आणण्यासाठी पाठवले जाते. त्यामुळे त्या शिक्षण, रोजगाराच्या संधींपासून वंचित राहतात. त्यांना दुखापत होण्याची आणि लैंगिक शोषणाची शक्यताही वाढते.

टॅग्स :Waterपाणी