शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणे भारताकडे ५.६ अब्ज रुपये थकीत

By admin | Updated: July 18, 2014 01:43 IST

फाळणीला ६७ वर्षे उलटल्यानंतर पाकिस्तानने भारताकडे आपली तब्बल ५.६ अब्ज रुपयांची रक्कम थकीत असल्याचा दावा केला

कराची : फाळणीला ६७ वर्षे उलटल्यानंतर पाकिस्तानने भारताकडे आपली तब्बल ५.६ अब्ज रुपयांची रक्कम थकीत असल्याचा दावा केला असून यावरून वादंग होण्याची चिन्हे आहेत. भारत आपला ५.६ अब्ज रुपयांचे देणे लागतो. भारतीय रिझर्व्ह बँकेकडील (आरबीआय) ही थकबाकी फाळणीदरम्यानची आहे. फाळणीच्या वेळी ही रक्कम ४९ कोटी रुपये होती. फाळणीच्या ६७ वर्षांनंतर महागाई, चलन विनीमय दर व रोखे दरातील बदलांमुळे वाढून ती ५.६ अब्ज झाली असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तान आणि भारतादरम्यान झालेल्या कोणत्याही चर्चेत पाकने थकीत रकमेचा कधीही उल्लेख केलेला नाही. मात्र, स्टेट बँक आॅफ पाकिस्तान दरवर्षी आपल्या वार्षिक अहवालामध्ये भारताकडील कथित थकीत रकमेचा उल्लेख करते. आतापर्यंत याबाबत फारशी चर्चा झाली नव्हती; मात्र पाक माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्याने त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे. (वृत्तसंस्था)स्वातंत्र्याच्या वेळी ४९ कोटी रुपयांची थकबाकी होती; मात्र महागाई, चलन विनिमय दर व समभाग दरातील बदलांमुळे यात वेगाने वाढ झाली, असे एक्स्प्रेस ट्रीब्यूनमध्ये प्रकाशित एका वृत्तात म्हटले आहे. स्टेट बँक आॅफ पाकिस्ताननुसार ४.१ अब्ज रुपयांची सोन्याची नाणी, ५० कोटींचे ब्रिटिशकालीन रोखे, भारत सरकारचे २४ कोटी रुपयांचे रोखे आणि ४९ लाख रुपयांची नाणी एवढी पाकची भारतावर थकबाकी आहे. १९४७ मध्ये झालेल्या एका करारावरून पाक हा दावा करतो. या करारानुसार फाळणीनंतरही दोन्ही देशांची एकच बँक भारतीय रिझर्व्ह बँक होती आणि ३० सप्टेंबर १९४८ पर्यंत पाकमध्ये भारतीय रुपया चालत होता.