शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

...म्हणे भारताकडे ५.६ अब्ज रुपये थकीत

By admin | Updated: July 18, 2014 01:43 IST

फाळणीला ६७ वर्षे उलटल्यानंतर पाकिस्तानने भारताकडे आपली तब्बल ५.६ अब्ज रुपयांची रक्कम थकीत असल्याचा दावा केला

कराची : फाळणीला ६७ वर्षे उलटल्यानंतर पाकिस्तानने भारताकडे आपली तब्बल ५.६ अब्ज रुपयांची रक्कम थकीत असल्याचा दावा केला असून यावरून वादंग होण्याची चिन्हे आहेत. भारत आपला ५.६ अब्ज रुपयांचे देणे लागतो. भारतीय रिझर्व्ह बँकेकडील (आरबीआय) ही थकबाकी फाळणीदरम्यानची आहे. फाळणीच्या वेळी ही रक्कम ४९ कोटी रुपये होती. फाळणीच्या ६७ वर्षांनंतर महागाई, चलन विनीमय दर व रोखे दरातील बदलांमुळे वाढून ती ५.६ अब्ज झाली असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तान आणि भारतादरम्यान झालेल्या कोणत्याही चर्चेत पाकने थकीत रकमेचा कधीही उल्लेख केलेला नाही. मात्र, स्टेट बँक आॅफ पाकिस्तान दरवर्षी आपल्या वार्षिक अहवालामध्ये भारताकडील कथित थकीत रकमेचा उल्लेख करते. आतापर्यंत याबाबत फारशी चर्चा झाली नव्हती; मात्र पाक माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्याने त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे. (वृत्तसंस्था)स्वातंत्र्याच्या वेळी ४९ कोटी रुपयांची थकबाकी होती; मात्र महागाई, चलन विनिमय दर व समभाग दरातील बदलांमुळे यात वेगाने वाढ झाली, असे एक्स्प्रेस ट्रीब्यूनमध्ये प्रकाशित एका वृत्तात म्हटले आहे. स्टेट बँक आॅफ पाकिस्ताननुसार ४.१ अब्ज रुपयांची सोन्याची नाणी, ५० कोटींचे ब्रिटिशकालीन रोखे, भारत सरकारचे २४ कोटी रुपयांचे रोखे आणि ४९ लाख रुपयांची नाणी एवढी पाकची भारतावर थकबाकी आहे. १९४७ मध्ये झालेल्या एका करारावरून पाक हा दावा करतो. या करारानुसार फाळणीनंतरही दोन्ही देशांची एकच बँक भारतीय रिझर्व्ह बँक होती आणि ३० सप्टेंबर १९४८ पर्यंत पाकमध्ये भारतीय रुपया चालत होता.