शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 10:38 IST

उमराहबद्दल सौदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारतातील लाखो मुस्लिमांवर देखील याचा परिणाम होणार आहे.

हज आणि उमराह यात्रेसाठी भारतातून मोठ्या संख्येने लोक सौदी अरेबियाला जातात. हज यात्रा ही एका विशिष्ट  वेळेत होत असली तरी, उमराहसाठी वर्षभर लोक सौदीला प्रवास करत असतात. मात्र, आता उमराहबद्दल सौदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारतातील लाखो मुस्लिमांवर देखील याचा परिणाम होणार आहे. सौदी अरेबियाने उमराह प्रवेश व्हिसाची वैधता आता तीन महिन्यांवरून एका महिन्यावर आणली आहे. 

आता, उमराह व्हिसा जारी केल्याच्या तारखेपासून फक्त एक महिना वैध असेल. जर, तुम्ही व्हिसा जारी झाल्यापासून एका महिन्याच्या आत उमरा केला नाही, तर तुमचा व्हिसा वैध राहणार नाही. अल-अरेबियाने हज आणि उमरा मंत्रालयातील सूत्रांचा हवाला देत म्हटले की, प्रवेश व्हिसाचा कालावधी एक महिन्यापर्यंत कमी करण्यात आला आहे, परंतु सौदी अरेबियात आल्यानंतर यात्रेकरूंचा मुक्काम पूर्वीसारखाच, तीन महिन्यांचा राहील.

नवीन नियम कधी लागू होतील?

मंत्रालयाने उमराह व्हिसा नियमांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. सुधारित नियमांनुसार, जर एखाद्या यात्रेकरूने व्हिसा जारी झाल्यापासून ३० दिवसांच्या आत सौदी अरेबियात प्रवेशासाठी नोंदणी केली नाही तर हा व्हिसा रद्द केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन नियम पुढील आठवड्यात लागू होतील.

हा निर्णय का घेण्यात आला?

उमराह राष्ट्रीय समितीचे सल्लागार अहमद बझैफर म्हणाले की, हा निर्णय उमराह यात्रेकरूंच्या संख्येत अपेक्षित वाढ होण्यासाठी मंत्रालयाच्या तयारीचा एक भाग आहे. विशेषतः उन्हाळा संपत असताना आणि मक्का आणि मदीनामधील तापमान थंड होत असताना, या दोन शहरांमध्ये गर्दी होते. ही गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरेल.

जूनच्या सुरुवातीला नवीन उमराह हंगाम सुरू झाल्यापासून, परदेशी यात्रेकरूंना जारी केलेल्या उमराह व्हिसाची संख्या ४० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. यावर्षीचा उमराह हंगाम केवळ पाच महिन्यांत परदेशी यात्रेकरूंच्या संख्येचा विक्रम प्रस्थापित करत आहे.

किती भारतीय उमराहला जातात?

सौदी अरेबियाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०२३ मध्ये, भारतीयांनी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी उमराह यात्रा केली. एकूण १८ लाख भारतीय मुस्लिमांनी उमराह यात्रा केली. उमराह ही मक्का येथील इस्लामिक तीर्थयात्रा आहे आणि वर्षाच्या कोणत्याही वेळी केली जाऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Saudi Arabia's Umrah Visa Change Impacts Millions of Indian Muslims

Web Summary : Saudi Arabia reduces Umrah visa validity from three months to one, affecting millions of Indian Muslims. The new rule, effective next week, aims to manage growing pilgrim numbers, especially as temperatures cool. In 2023, 1.8 million Indians undertook the Umrah pilgrimage.
टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाMuslimमुस्लीमHaj yatraहज यात्रा