शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

S Jaishankar on China: “चीनने कराराचे उल्लंघन केलेय, भारतासोबतच्या संबंधांचा सर्वांत कठीण काळ”: एस. जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 10:44 IST

S Jaishankar on China: भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन सुरू असलेल्या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

म्यूनिक: भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन सुरू असलेल्या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. गेल्या सुमारे दीड वर्षांपासून भारत आणि चीन यांच्यात सीमा रेषेवरून तणाव आहे. यातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी म्यूनिक येथील सुरक्षा परिषदेत सहभागी होताना एक मोठे विधान केले आहे. भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील सीमेसंदर्भात झालेल्या कराराचे पालन चीनकडून केले जात नाही. भारताचे चीनसोबत असलेले द्विपक्षीय संबंध सर्वांत कठीण काळातून जातायत, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. 

भारत आणि चीनच्या सीमेवरील परिस्थिती दोन देशांतील संबंधांची स्थिती निश्चित करेल. सीमा कराराचे उल्लंघन केल्याने भारताचे चीनसोबतचे संबंध अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहेत. सन १९७५ पासून सुमारे ४५ वर्षे भारत आणि चीनच्या सीमेवर शांतता होती. सीमा व्यवस्थापन स्थिर होते. लष्करी जीवितहानी झाली नाही. मात्र, आता तसे घडताना दिसत नाही. भारताने चीनशी सीमेवर किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य तैनात न करण्याचे करार केले होते. परंतु, चीनने कराराचे उल्लंघन केले, असे जयशंकर म्हणाले. 

जून २०२० पूर्वी सीमेवर शांतता कायम होती

जून २०२० पूर्वीही भारताचे पाश्चात्य देशांसोबतचे संबंध चांगले होते. पूर्व लडाखमध्ये पॅंगॉंग लेक भागात हिंसक चकमकी झाल्यानंतर भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान सीमेवर संघर्ष सुरू झाला. दोन्ही देशांनी हळूहळू सैन्याची तैनाती वाढवली. जून २०२० रोजी गलवान व्हॅली येखे झालेल्या हिंसक संघर्षानंतर तणाव वाढला होता.

दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात सीमेवर शांतता कायम राहावी. या सीमावादावर काहीतरी तोडगा निघावा, यासाठी सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. चर्चा सकारात्मक झाली असली, तरी यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरindia china faceoffभारत-चीन तणाव