शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

S Jaishankar on China: “चीनने कराराचे उल्लंघन केलेय, भारतासोबतच्या संबंधांचा सर्वांत कठीण काळ”: एस. जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 10:44 IST

S Jaishankar on China: भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन सुरू असलेल्या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

म्यूनिक: भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन सुरू असलेल्या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. गेल्या सुमारे दीड वर्षांपासून भारत आणि चीन यांच्यात सीमा रेषेवरून तणाव आहे. यातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी म्यूनिक येथील सुरक्षा परिषदेत सहभागी होताना एक मोठे विधान केले आहे. भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील सीमेसंदर्भात झालेल्या कराराचे पालन चीनकडून केले जात नाही. भारताचे चीनसोबत असलेले द्विपक्षीय संबंध सर्वांत कठीण काळातून जातायत, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. 

भारत आणि चीनच्या सीमेवरील परिस्थिती दोन देशांतील संबंधांची स्थिती निश्चित करेल. सीमा कराराचे उल्लंघन केल्याने भारताचे चीनसोबतचे संबंध अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहेत. सन १९७५ पासून सुमारे ४५ वर्षे भारत आणि चीनच्या सीमेवर शांतता होती. सीमा व्यवस्थापन स्थिर होते. लष्करी जीवितहानी झाली नाही. मात्र, आता तसे घडताना दिसत नाही. भारताने चीनशी सीमेवर किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य तैनात न करण्याचे करार केले होते. परंतु, चीनने कराराचे उल्लंघन केले, असे जयशंकर म्हणाले. 

जून २०२० पूर्वी सीमेवर शांतता कायम होती

जून २०२० पूर्वीही भारताचे पाश्चात्य देशांसोबतचे संबंध चांगले होते. पूर्व लडाखमध्ये पॅंगॉंग लेक भागात हिंसक चकमकी झाल्यानंतर भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान सीमेवर संघर्ष सुरू झाला. दोन्ही देशांनी हळूहळू सैन्याची तैनाती वाढवली. जून २०२० रोजी गलवान व्हॅली येखे झालेल्या हिंसक संघर्षानंतर तणाव वाढला होता.

दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात सीमेवर शांतता कायम राहावी. या सीमावादावर काहीतरी तोडगा निघावा, यासाठी सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. चर्चा सकारात्मक झाली असली, तरी यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरindia china faceoffभारत-चीन तणाव