शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

S Jaishankar on China: “चीनने कराराचे उल्लंघन केलेय, भारतासोबतच्या संबंधांचा सर्वांत कठीण काळ”: एस. जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 10:44 IST

S Jaishankar on China: भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन सुरू असलेल्या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

म्यूनिक: भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन सुरू असलेल्या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. गेल्या सुमारे दीड वर्षांपासून भारत आणि चीन यांच्यात सीमा रेषेवरून तणाव आहे. यातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी म्यूनिक येथील सुरक्षा परिषदेत सहभागी होताना एक मोठे विधान केले आहे. भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील सीमेसंदर्भात झालेल्या कराराचे पालन चीनकडून केले जात नाही. भारताचे चीनसोबत असलेले द्विपक्षीय संबंध सर्वांत कठीण काळातून जातायत, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. 

भारत आणि चीनच्या सीमेवरील परिस्थिती दोन देशांतील संबंधांची स्थिती निश्चित करेल. सीमा कराराचे उल्लंघन केल्याने भारताचे चीनसोबतचे संबंध अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहेत. सन १९७५ पासून सुमारे ४५ वर्षे भारत आणि चीनच्या सीमेवर शांतता होती. सीमा व्यवस्थापन स्थिर होते. लष्करी जीवितहानी झाली नाही. मात्र, आता तसे घडताना दिसत नाही. भारताने चीनशी सीमेवर किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य तैनात न करण्याचे करार केले होते. परंतु, चीनने कराराचे उल्लंघन केले, असे जयशंकर म्हणाले. 

जून २०२० पूर्वी सीमेवर शांतता कायम होती

जून २०२० पूर्वीही भारताचे पाश्चात्य देशांसोबतचे संबंध चांगले होते. पूर्व लडाखमध्ये पॅंगॉंग लेक भागात हिंसक चकमकी झाल्यानंतर भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान सीमेवर संघर्ष सुरू झाला. दोन्ही देशांनी हळूहळू सैन्याची तैनाती वाढवली. जून २०२० रोजी गलवान व्हॅली येखे झालेल्या हिंसक संघर्षानंतर तणाव वाढला होता.

दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात सीमेवर शांतता कायम राहावी. या सीमावादावर काहीतरी तोडगा निघावा, यासाठी सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. चर्चा सकारात्मक झाली असली, तरी यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरindia china faceoffभारत-चीन तणाव