शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Russia Ukraine War: पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या राष्ट्रपतींना काय सल्ला दिला होता? खुद्द झेलेन्स्की यांनीच सांगितलं...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 20:58 IST

राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत झालेल्या फोनवरील चर्चेतही याच मुद्द्यावर भर देण्यात आला होता. मात्र अद्याप जमिनीवर संवादाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत नाही.

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या 13 दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. आता स्वतः झेलेन्स्की यांनी त्या वेळच्या संभाषणावर भाष्य केले आहे.

झेलेन्स्की म्हणाले, माझी पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली. काही प्रश्न चर्चेतून सुटत नाहीत. असेही काही पैलू असतात, ज्यांत आपली थेट सक्रियता नसते. मात्र, माणूसकीचा विजय होणे आवश्यक असते. प्रत्येक भीतीवर मात करणे आवश्यक आहे. तो दिवस पुन्हा येईल, जेव्हा युक्रेनचे आकाश सुरक्षित असेल आणि सर्व ठिकाणचे निर्बंध हटलेले असतील. तसेच, या पूर्वीही जेव्हा पंतप्रधान मोदींसोबत चर्चा झाली होती, तेव्हाही त्यांनी, कुटनितीक मार्गाने हा प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला होता, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत झालेल्या फोनवरील चर्चेतही याच मुद्द्यावर भर देण्यात आला होता. मात्र अद्याप जमिनीवर संवादाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत नाही. दोन्ही देश झुकायला तयार नाहीत आणि हल्ल्यांची मालिकाही सुरूच आहे. सुमीमध्ये रशियाने 500 किलोचा बॉम्ब टाकल्याचा दावाही झेलेन्स्की यांनी केला आहे. मारियुपोलमध्येही एका मुलाचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. अशा स्थितीत दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. 

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रशियन सैन्याच्या कारवाईत आतापर्यंत 38 मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 70 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय 13 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात एकूण 400 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय, या युद्धात 12,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचा दावाही राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध