शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Russia Ukraine War : "...आणि तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं"; नवीनच्या मित्राने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 08:38 IST

Russia Ukraine War : नवीनचं मृत्यूआधी त्याचा जवळचा मित्र आणि रुममेट असलेल्या श्रीकांतसोबत फोनवर बोलणं झालं होतं. 

युक्रेनमधील खार्किव येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव आहे. तो 21 वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता. बचावादरम्यान झालेल्या हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. याच दरम्यान त्याच्या एका मित्राने मृत्यू नेमकं काय घडलं ते सांगत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. नवीनचं मृत्यूआधी त्याचा जवळचा मित्र आणि रुममेट असलेल्या श्रीकांतसोबत फोनवर बोलणं झालं होतं. 

नवीनने आपण सुपरमार्केटमध्ये खाण्यासाठी काहीतरी घ्यायला आलो असल्याची माहिती दिली होती असं श्रीकांतने सांगितलं. त्यानंतर दहा मिनिटांनी श्रीकांतने जेव्हा नवीनला पुन्हा फोन केला तेव्हा एका युक्रेनियन महिलेने फोन उचलला होता. ती जीवाच्या आकांताने रडत होती. त्यानंतर रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचं श्रीकांतने सांगितलं. एनडीटीव्हीला त्याने ही माहिती दिली आहे. जीवनावश्यक सामान आणि खाण्यासाठी अन्न पदार्थ संपल्याने नवीनला चिंता लागून राहिली होती. त्यामुळेच तो बाहेर पडला. जर तो यासाठी गेला नसता तर आज जिवंत असता असं श्रीकांतने म्हटलं आहे. 

"... आणि तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं"

"नवीन घराबाहेर पडला त्यावेळी आम्ही झोपलो होतो. खाण्यासाठी काहीतरी अन्नपदार्थ घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. आम्ही खरंतर खूप भूकेलो होतो. घटनेच्या आधीच्या रात्रीदेखील आम्ही उपाशीपोटी झोपलो होतो. आम्ही अन्नासाठी घराबाहेर पडलो असतो, पण संपूर्ण शहरात कर्फ्यू लावण्यात आलेला होता. घराबाहेर पडण्यास मनाई होती. तरीही आम्हाला काहीतरी अन्न मिळावं या आशेने नवीन घराबाहेर पडला होता. मी नवीनला सकाळी आठ वाजता फोन केला. त्यावेळी त्याने आपण खाण्यासाठी काहीतरी पदार्थ घेण्यासाठी सुपरमार्केटमध्ये आल्याचं सांगितलं. त्याने मला काही पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. त्यानंतर मी पैसे ट्रान्सफर केले आणि त्याला तातडीने लवकर घरी येण्यास सांगितलं. त्यानेही आपण लगेच येतो असं सांगितलं. तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं" असं श्रीकांतने म्हटलं आहे. 

"नवीन हा गेल्या चार वर्षांपासून माझा सर्वात जवळता मित्र"

"नवीन हा गेल्या चार वर्षांपासून माझा सर्वात जवळता मित्र होता. मी दहा मिनिटांनी पुन्हा नवीनला कॉल केला. पण तिकडून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याने फोन उचलला नाही. थोड्यावेळाने एका महिलेने फोन उचलला. ती जीवाच्या आकांताने रडत होती. मला काही कळेना. मला तिची भाषाही समजत नव्हती. मी तिथल्या एका स्थानिक व्यक्तीकडे फोन दिला जो त्या महिलेच्या भाषेला समजू शकेल. तेव्हा नवीनचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली" असं श्रीकांतने सांगितलं आहे. दोन दिवसांपूर्वीच नवीनचं आपल्या कुटुंबियांशी बोलणं झालं होतं, नवीनने व्हिडिओ कॉल करुन आपल्या कुटुंबाला युक्रेनमधल्या परिस्थितीची माहिती दिली होती. इथं भीषण परिस्थिती असून लवकरात लवकर मायदेशात परतायचं असल्याचं त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं. पण दुर्देवाने तो परतलाच नाही. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारत