शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Russia Ukraine War: UNSCच्या बैठकीत युक्रेन-रशिया युद्धावर चर्चा; भारताने केले युद्ध थांबवण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 08:38 IST

Russia Ukraine War: संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले, 'भारत युद्ध थांबवण्याच्या बाजूने आहे, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा दोन्ही बाजूंच्या नेतृत्वांशी बोलून तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे.'

नवी दिल्ली: रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) मागील तेरा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा संपूर्ण जगावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या बैठकीत या युद्धावर चर्चा झाली. तसेच, भारताने दोन्ही देशांना युद्ध थांबवण्याचे आवाहनदेखील केले.

15 लाख+ नागरिकांचे पलायनसंयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती (TS Tirumurti) म्हणाले की, युक्रेनमधील परिस्थिती सतत बिघडत आहे. मानवतावादी संकट अधिक गडद होत आहे. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या अकरा दिवसांत 15 लाखांहून अधिक निर्वासितांनी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे. युक्रेनमधील बिघडत चाललेली परिस्थिती आणि आगामी मानवतावादी संकटाकडे आपण तातडीने लक्ष द्यायला हवे, जेणेकरून परिस्थिती आणखी बिघडण्याआधीच हाताळता येईल, असे ते म्हणाले.

PMने केले युद्ध थांबवण्याचे आवाहनतिरुमूर्ती पुढे म्हणाले, यूएनच्या अंदाजानुसार, या युद्धात आतापर्यंत 140 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा समावेश आहे. ठार झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल भारत शोक करत आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. या संघर्षात प्रत्येक नागरिकाच्या मृत्यूबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. आमचे पंतप्रधान पुन्हा एकदा दोन्ही बाजूंच्या नेतृत्वाशी बोलले आणि तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंनी पुन्हा संवादाच्या मार्गावर येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

20,000 हून अधिक भारतीय सुखरूप मायदेशी परतले

टीएस तिरुमूर्ती म्हणाले, आम्ही भारतीयांसह सर्व देशांतील नागरिकांसाठी सुरक्षित मार्गाच्या आमच्या तातडीच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. दोन्ही बाजूंकडून वारंवार आवाहन करुनही, सुमीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यात आलेला नाही. आम्ही इतर देशांतील नागरिकांनाही आपापल्या देशात परतण्यासाठी मदत केली आहे. एवढेच नाही तर आगामी काळातही असेच काम करण्याची आमची पूर्ण तयारी आहे.

भारताची युक्रेन आणि शेजारील देशांना मदत तिरुमूर्ती यांनी यावेळी सांगितले की, भारताने आधीच युक्रेन आणि त्याच्या शेजारी राष्ट्रांना मानवतावादी मदत पाठवली आहे. यामध्ये औषधे, तंबू, पाणी साठविण्याच्या टाक्या, इतर मदत साहित्याचा समावेश आहे. आम्ही इतर गरजा ओळखून पाठवण्याच्या प्रक्रियेत आहोत. भारतीयांना घरी आणण्यासाठी 80 हून अधिक उड्डाणे उडत आहेत. युक्रेन आणि त्याच्या शेजारी देशांच्या अधिकाऱ्यांनी आमच्या नागरिकांना परत आणण्यासाठी दिलेल्या मदतीची आम्ही प्रशंसा करतो.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतprime ministerपंतप्रधान