शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: UNSCच्या बैठकीत युक्रेन-रशिया युद्धावर चर्चा; भारताने केले युद्ध थांबवण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 08:38 IST

Russia Ukraine War: संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले, 'भारत युद्ध थांबवण्याच्या बाजूने आहे, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा दोन्ही बाजूंच्या नेतृत्वांशी बोलून तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे.'

नवी दिल्ली: रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) मागील तेरा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा संपूर्ण जगावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या बैठकीत या युद्धावर चर्चा झाली. तसेच, भारताने दोन्ही देशांना युद्ध थांबवण्याचे आवाहनदेखील केले.

15 लाख+ नागरिकांचे पलायनसंयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती (TS Tirumurti) म्हणाले की, युक्रेनमधील परिस्थिती सतत बिघडत आहे. मानवतावादी संकट अधिक गडद होत आहे. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या अकरा दिवसांत 15 लाखांहून अधिक निर्वासितांनी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे. युक्रेनमधील बिघडत चाललेली परिस्थिती आणि आगामी मानवतावादी संकटाकडे आपण तातडीने लक्ष द्यायला हवे, जेणेकरून परिस्थिती आणखी बिघडण्याआधीच हाताळता येईल, असे ते म्हणाले.

PMने केले युद्ध थांबवण्याचे आवाहनतिरुमूर्ती पुढे म्हणाले, यूएनच्या अंदाजानुसार, या युद्धात आतापर्यंत 140 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा समावेश आहे. ठार झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल भारत शोक करत आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. या संघर्षात प्रत्येक नागरिकाच्या मृत्यूबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. आमचे पंतप्रधान पुन्हा एकदा दोन्ही बाजूंच्या नेतृत्वाशी बोलले आणि तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंनी पुन्हा संवादाच्या मार्गावर येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

20,000 हून अधिक भारतीय सुखरूप मायदेशी परतले

टीएस तिरुमूर्ती म्हणाले, आम्ही भारतीयांसह सर्व देशांतील नागरिकांसाठी सुरक्षित मार्गाच्या आमच्या तातडीच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. दोन्ही बाजूंकडून वारंवार आवाहन करुनही, सुमीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यात आलेला नाही. आम्ही इतर देशांतील नागरिकांनाही आपापल्या देशात परतण्यासाठी मदत केली आहे. एवढेच नाही तर आगामी काळातही असेच काम करण्याची आमची पूर्ण तयारी आहे.

भारताची युक्रेन आणि शेजारील देशांना मदत तिरुमूर्ती यांनी यावेळी सांगितले की, भारताने आधीच युक्रेन आणि त्याच्या शेजारी राष्ट्रांना मानवतावादी मदत पाठवली आहे. यामध्ये औषधे, तंबू, पाणी साठविण्याच्या टाक्या, इतर मदत साहित्याचा समावेश आहे. आम्ही इतर गरजा ओळखून पाठवण्याच्या प्रक्रियेत आहोत. भारतीयांना घरी आणण्यासाठी 80 हून अधिक उड्डाणे उडत आहेत. युक्रेन आणि त्याच्या शेजारी देशांच्या अधिकाऱ्यांनी आमच्या नागरिकांना परत आणण्यासाठी दिलेल्या मदतीची आम्ही प्रशंसा करतो.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतprime ministerपंतप्रधान