शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Ukraine News: रशियन भाषा बोलणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शोधात भारत सरकार, यामागचं कारण काय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 14:54 IST

रशियानं युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. युद्धावेळी वाजणाऱ्या सायरनचा आवाज आज टेलिव्हिजन वाहिन्यांच्या माध्यमातून भारतातील घरोघरी पाहायला मिळत आहे. युक्रेनच्या हवाई क्षेत्रात रशियन लढाऊ विमानांच्या घिरट्या घेणारे व्हिडिओ पाहून भारतीयांचीही चिंता वाढली आहे.

नवी दिल्ली-

रशियानं युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. युद्धावेळी वाजणाऱ्या सायरनचा आवाज आज टेलिव्हिजन वाहिन्यांच्या माध्यमातून भारतातील घरोघरी पाहायला मिळत आहे. युक्रेनच्या हवाई क्षेत्रात रशियन लढाऊ विमानांच्या घिरट्या घेणारे व्हिडिओ पाहून भारतीयांचीही चिंता वाढली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार १८ हजाराहून अधिक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. ७२ तासांपूर्वीच भारत सरकारनं युक्रेनमधून भारतीयांच्या घरवापसी मोहिमेला सुरुवात केली आहे. पण रशियानं हल्ल्याला सुरुवात केल्यामुळे आता भारतीय नागरिकांच्या सुटकेची मोहिम पूर्णपणे ठप्प पडली आहे. आज सकाळीच युक्रेनसाठी रवाना झालेलं एअर इंडियाचं विमान दिल्लीला माघारी परतलं. रशियानं युद्ध पुकारल्यामुळे युक्रेननं सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर देशाच्या हवाई क्षेत्रात प्रवासी विमानांना बंदी घातली आहे. रशिया-युक्रेन मुद्द्यावरुन दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होत आहे. यासोबतच रशियन भाषा बोलू शकणाऱ्या अधिकाऱ्यांचाही केंद्र सरकारकडून शोध घेतला जात असून त्यांना युक्रेन आणि आसपासच्या परिसरात पाठविण्यात येत आहे. 

कीवच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भारतीय नागरिकांना घेऊन निघालेलं एअर इंडियाचं विमान आज सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दिल्लीत पोहोचलं. विमानातून १८२ भारतीय नागरिकांना परत आणण्यात आलं. यात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक होत आहे. रशियानं युद्धाची घोषणा केल्यानंतर भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठीच्या सर्व पर्यायांवर चर्चा बैठकीत होणार आहे. युक्रेनकडून हवाई क्षेत्र बंद करण्यात आल्यानंतर इतर माध्यमांचा आणि पर्यायांचा विचार करण्यास सुरुवात झाली आहे. तसंच रशियन भाषा बोलू शकरणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांना युक्रेनमधील दूतावासात पाठविण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावास पूर्णपणे काम करत असून दूतावासाकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलींचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. युक्रेनमध्ये युद्धाची घोषणा झाल्यानंतर राजधानी कीवच्या दिशेनं येणाऱ्या भारतीय नागरिकांना त्यांच्या त्यांच्या राहत्या ठिकाणी परत जाण्याचं आवाहन दूतावासाकडून करण्यात आलं आहे. कारण रशियाकडून कीव शहरालाच मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे कीव शहराकडे न येण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 

याआधी मंगळवारी एअर इंडियाच्या फ्लाइट AI1947 मधून कीव येथून २५० हून अधिक नागरिकांना भारतात आणण्यात आलं होतं. या आठवड्यात आज आणि शनिवारी दोन आणखी विमानं युक्रेनला पाठविण्यात येणार होती. पण युद्धाची घोषणा झाल्यानं हवाई मार्ग बंद झाला आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध