शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

आगडोंब उसळल्यानंतर घटवला आरक्षणाचा टक्का; बांगलादेशात ५६ टक्क्यांऐवजी आता ७% आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 07:21 IST

आरक्षणावरून देशभरात हिंसाचारादरम्यान पोलिस आणि लष्करावर दगडफेक करताना विद्यार्थी. इन्सेटमध्ये एका पोलिसाला घेरून काठ्यांनी मारहाण करताना विद्यार्थी दिसत आहेत. गुणवत्तेच्या आधारे ९३ टक्के नोकऱ्या दिल्या जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

ढाका: आरक्षणावरून देशभरात हिंसाचाराचा आगडोंब उसळल्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये ५६ टक्के आरक्षण देण्याचा ढाका उच्च न्यायालयाचा निर्णय बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने फिरविला. न्यायालयाने रविवारी आरक्षण ५६% वरून ७% पर्यंत कमी करण्याचा आदेश जारी केला आहे. यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना ५ टक्के आरक्षण मिळेल, जे यापूर्वी ३० टक्के होते. उर्वरित २% मध्ये जातीय अल्पसंख्याक, ट्रान्सजेंडर आणि अपंग यांचा समावेश असेल.

सरकारने २०१८ मध्ये ५६ टक्के आरक्षण रद्द केले होते, परंतु या वर्षी ५ जून रोजी तेथील उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्द केला आणि आरक्षण पुन्हा लागू केले. यानंतर बांगलादेशात हिंसाचार पुन्हा सुरू झाला. या हिंसाचारात आतापर्यंत ११५ लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने आंदोलकांवर दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

मागणी काय होती? नोकांची कमतरता आणि बेरोजगारांची वाढलेली संख्या आणि कमी झालेले उत्पन्न यामुळे हताश झालेले विद्यार्थी संतापले आहेत. मुक्तिसंग्रामात भाग घेतलेल्या कुटुंबांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३०% सरकारी नोकऱ्या राखून ठेवणारा कोटा संपवण्याची मागणी ते करत होते. यामुळे हिंसाचार पेटला. कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे.

भारत-बांगलादेश वाहतूक ठप्प; ७०० ट्रक अडकले बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमुळे मालवाहू ट्रकची वाहतूक थांबली असून, भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार ठप्प झाला आहे. पेट्रापोल बंदर बंद असल्याने व्यापार ठप्प आहे. दोन्ही देशांचा एक तृतीयांश व्यापार येथून होतो. 

मालदाच्या महादीपूर बंदरातून शनिवारी बांगलादेशात पोहोचलेले मालवाहू ट्रक परतले नसून ते सुरक्षित आहेत. शनिवारी बांगलादेशातून १२० ट्रक भारतात आले, तर ४८ ट्रक बांगलादेशात निर्यातीसाठी गेले. मालाने भरलेले सुमारे ७०० ट्रक पाकिंगमध्ये अडकले असून, ते बांगलादेशला जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेजारील देशातील संकटात सापडलेल्या लोकांसाठी आपल्या राज्याचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले असून, त्यांना आश्रय दिला जाईल.

९७८ भारतीय विद्यार्थी मायदेशी परतलेबांगलादेशातून आतापर्यंत ९७८ भारतीय विद्यार्थी परतले आहेत. सुमारे ८० विद्यार्थी मेघालयातील आहेत आणि उर्वरित इतर राज्यांतील आहेत. नेपाळ आणि भूतानमधील काही विद्यार्थी आणि पर्यटकांनाही बाहेर काढण्यात आले आहे. तेथील परिस्थिती पाहून विद्याथ्र्याचे पालक चिंतेत आहेत. बांगलादेशात एकूण भारतीय नागरिकांची संख्या सुमारे १५,००० असून, यात सुमारे ८,५०० विद्यार्थी आहेत.- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

टॅग्स :Bangladeshबांगलादेशreservationआरक्षण