शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

आगडोंब उसळल्यानंतर घटवला आरक्षणाचा टक्का; बांगलादेशात ५६ टक्क्यांऐवजी आता ७% आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 07:21 IST

आरक्षणावरून देशभरात हिंसाचारादरम्यान पोलिस आणि लष्करावर दगडफेक करताना विद्यार्थी. इन्सेटमध्ये एका पोलिसाला घेरून काठ्यांनी मारहाण करताना विद्यार्थी दिसत आहेत. गुणवत्तेच्या आधारे ९३ टक्के नोकऱ्या दिल्या जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

ढाका: आरक्षणावरून देशभरात हिंसाचाराचा आगडोंब उसळल्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये ५६ टक्के आरक्षण देण्याचा ढाका उच्च न्यायालयाचा निर्णय बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने फिरविला. न्यायालयाने रविवारी आरक्षण ५६% वरून ७% पर्यंत कमी करण्याचा आदेश जारी केला आहे. यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना ५ टक्के आरक्षण मिळेल, जे यापूर्वी ३० टक्के होते. उर्वरित २% मध्ये जातीय अल्पसंख्याक, ट्रान्सजेंडर आणि अपंग यांचा समावेश असेल.

सरकारने २०१८ मध्ये ५६ टक्के आरक्षण रद्द केले होते, परंतु या वर्षी ५ जून रोजी तेथील उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्द केला आणि आरक्षण पुन्हा लागू केले. यानंतर बांगलादेशात हिंसाचार पुन्हा सुरू झाला. या हिंसाचारात आतापर्यंत ११५ लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने आंदोलकांवर दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

मागणी काय होती? नोकांची कमतरता आणि बेरोजगारांची वाढलेली संख्या आणि कमी झालेले उत्पन्न यामुळे हताश झालेले विद्यार्थी संतापले आहेत. मुक्तिसंग्रामात भाग घेतलेल्या कुटुंबांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३०% सरकारी नोकऱ्या राखून ठेवणारा कोटा संपवण्याची मागणी ते करत होते. यामुळे हिंसाचार पेटला. कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे.

भारत-बांगलादेश वाहतूक ठप्प; ७०० ट्रक अडकले बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमुळे मालवाहू ट्रकची वाहतूक थांबली असून, भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार ठप्प झाला आहे. पेट्रापोल बंदर बंद असल्याने व्यापार ठप्प आहे. दोन्ही देशांचा एक तृतीयांश व्यापार येथून होतो. 

मालदाच्या महादीपूर बंदरातून शनिवारी बांगलादेशात पोहोचलेले मालवाहू ट्रक परतले नसून ते सुरक्षित आहेत. शनिवारी बांगलादेशातून १२० ट्रक भारतात आले, तर ४८ ट्रक बांगलादेशात निर्यातीसाठी गेले. मालाने भरलेले सुमारे ७०० ट्रक पाकिंगमध्ये अडकले असून, ते बांगलादेशला जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेजारील देशातील संकटात सापडलेल्या लोकांसाठी आपल्या राज्याचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले असून, त्यांना आश्रय दिला जाईल.

९७८ भारतीय विद्यार्थी मायदेशी परतलेबांगलादेशातून आतापर्यंत ९७८ भारतीय विद्यार्थी परतले आहेत. सुमारे ८० विद्यार्थी मेघालयातील आहेत आणि उर्वरित इतर राज्यांतील आहेत. नेपाळ आणि भूतानमधील काही विद्यार्थी आणि पर्यटकांनाही बाहेर काढण्यात आले आहे. तेथील परिस्थिती पाहून विद्याथ्र्याचे पालक चिंतेत आहेत. बांगलादेशात एकूण भारतीय नागरिकांची संख्या सुमारे १५,००० असून, यात सुमारे ८,५०० विद्यार्थी आहेत.- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

टॅग्स :Bangladeshबांगलादेशreservationआरक्षण