शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पती-पत्नीसाठी संशोधकांनी दिली आनंदवार्ता; प्रेम करा, भांडा, पण एकत्र नांदा, शुगर राहील कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 08:07 IST

विवाहामुळे होणारे महिलांपेक्षा पुरुषांना अधिक मानसिक फायदे होतात असे एका पाहणीत आढळून आले आहे. जे पती-पत्नी एकत्र राहतात, त्यांना भेडसावणाऱ्या चिंतेचे प्रमाण एकटे राहणाऱ्यांपेक्षा कमी असते.

वॉशिंग्टन : पती-पत्नी एकमेकांशी कितीही भांडण करू दे किंवा एकमेकांवर जिवापाड प्रेम करू दे, मात्र ते दोघेही नेहमी एकत्र राहिल्यास त्यांच्या ब्लड शुगरची पातळी कमी होण्याची शक्यता वाढते, अशी आनंदवार्ता ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. घटस्फोट किंवा मतभेदांमुळे पती-पत्नी वेगवेगळे राहत असतील तर त्यांची ब्लड शुगर वाढण्याचा धोका असतो. इंग्लंडमध्ये ५० ते ८९ वर्षे या वयोगटातील ३३३५ लोकांच्या आरोग्याचा अभ्यास केला. त्या पाहणीचा निष्कर्ष ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. 

विवाहाचे महिलांपेक्षा पुरुषांना अधिक फायदे -विवाहामुळे होणारे महिलांपेक्षा पुरुषांना अधिक मानसिक फायदे होतात असे एका पाहणीत आढळून आले आहे. जे पती-पत्नी एकत्र राहतात, त्यांना भेडसावणाऱ्या चिंतेचे प्रमाण एकटे राहणाऱ्यांपेक्षा कमी असते.

लग्न झालेल्या पुरुषांचे सरासरी आयुष्यमान एकट्या राहाणाऱ्या पुरुषांपेक्षा १० वर्षे अधिक असते, असेही या पाहणीच्या निष्कर्षात आढळले.

संशोधकांचे म्हणणे काय?या पाहणीत सहभागी झालेल्या संशोधक कॅथरिन फोर्ड यांनी सांगितले की, एकटे राहणाऱ्या व्यक्तीला डायबेटिस टाइप-२ होण्याचा धोका असतो. 

एकत्र नांदणाऱ्या पती-पत्नीच्या ब्लड शुगरची पातळी कमी असल्याचे आढळले, तसेच त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही कमी होतो.  

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारdiabetesमधुमेह