शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘ब्रेक्झिट’वर पुन्हा कौल घ्या

By admin | Updated: June 26, 2016 02:26 IST

ग्रेट ब्रिटनच्या १.७४ कोटी नागरिकांनी सुमारे ५२ टक्के बहुमताने ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला असला तरी जगभर ‘अर्थकंप’ घडविणाऱ्या ‘ब्रेक्झिट’चे कवित्व

लंडन : ग्रेट ब्रिटनच्या १.७४ कोटी नागरिकांनी सुमारे ५२ टक्के बहुमताने ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला असला तरी जगभर ‘अर्थकंप’ घडविणाऱ्या ‘ब्रेक्झिट’चे कवित्व अद्याप संपलेले नाही. ‘ब्रेक्झिट’च्या नियमानुसार ‘निर्णायक’ नसल्याने पुन्हा कौल घेण्यात यावा, अशी विनंती १० लाखांहून अधिक नागरिकांनी केली आहे. ‘फारकत’ घेण्याच्या बाजूने मतदान करणाऱ्यांचाही भ्रमनिरास झाला आहे. ‘ब्रेक्झिट’च्या विरोधात मतदान करणाऱ्या लंडनवासीयांची ब्रिटनमधून फुटून, युरोपीय संघात सामील होण्याची मागणी आहे.लोकांचे म्हणणे असे आहे की, ‘ब्रेक्झिट’साठीच्या नियमानुसार जनमतात ७५ टक्क्यांहून कमी मतदान झाले व त्यात ईयूमध्ये राहण्याच्या वा बाहेर पडण्याच्या बाजूने ६० टक्क्यांहून कमी लोकांनी मते दिली तर पुन्हा कौल घेण्यात येईल. जनमतात मतदान ७२.२ टक्के झाले होते व ५१.९ टक्के मतदारांनी ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने कौल दिला. १० हजारांहून जास्त स्वाक्षऱ्या असलेल्या ‘पीटिशन’ला सरकार प्रतिसाद देते. १ लाख स्वाक्षऱ्यांनी केल्या जाणाऱ्या ‘पीटिशन’वर ब्रिटिश संसदेच्या ‘हाउस आॅफ कॉमन्स’ या कनिष्ठ सभागृहात विचार केला जाऊ शकतो. समितीची बैठक आधी ठरल्यानुसार येत्या मंगळवारी व्हायची आहे. (वृत्तसंस्था)लंडनने वेगळी चूूल मांडावी : ६० टक्के लंडनवासीयांनी युरोपीय संघात राहण्याच्या बाजूने मतदान केले होते. परंतु अन्य भागाने वेगळा कौल दिल्याने त्यांची घोर निराशा झाली आहे. याला वाचा फोडण्यासाठी ४० हजारांहून अधिक लंडनवासीयांनी ‘चेंज आॅर्ग.कॉम’ या वेबसाईटवर ब्रिटनमधून फुटून निघण्याची मागणी करणारी एक ‘पीटिशन’ तयार केली आहे. अनेकांना होतोय पश्चात्तापसुरुवातीचा जल्लोष ओसरल्यानंतर अनेकांना निर्णयाचे किती खडतर परिणाम भोगावे लागणार आहेत याची जाणीव झाली असून, त्यांनी ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने मत दिल्याबद्दल आता पश्चात्ताप होत असल्याची भावना प्रसिद्धिमाध्यमांकडे व्यक्त केली आहे.या परिणामांची कल्पना नव्हती, दिशाभूल करून मत देण्यास भाग पाडले गेले, असे काहींचे म्हणणे आहे. पुन्हा कौल घेतल्यास आपण युरोपीय संघात राहण्याच्या बाजूने मतदान करू, युरोपीय संघ सोडला तर चांगले दिवस येतील, असा प्रचार केला गेला, असे काहींनी सांगितले. इसिस खूशईयूमधून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयामुळे इसिसला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. युरोपला दुबळे करण्याची ही योग्य वेळ असून, त्याच्या मुख्य भूमीवर हल्ला करावा, असे आवाहन संघटनेने जिहादींना केले आहे.