शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

व्यापारावरील अटी शिथिल केल्यास भारत-नेपाळ मतभेद कमी होतील; माजी उपपंतप्रधानांचा विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 09:44 IST

भारताने जर आंतरराष्ट्रीय व्यापार करारात लादलेल्या अटी व शर्ती आणखी शिथिल केल्या तर दाेन्ही देशांत रुंदावत चाललेली मतभेदाची दरी कमी होऊन संबंध पूर्ववत होतील, असा विश्वास नेपाळचे माजी उपपंतप्रधान विमलेेंद्र कुमार निधी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला

नारायण जाधव काठमांडू : एकेकाळी भारताचा सर्वात विश्वासू मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमधील जनतेच्या  मनात  केंद्र सरकारच्या काही निर्णयांमुळे मतभेदाची दरी रुंदावत चालली आहे. संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी भारताने केलेली सीमाबंदी आणि  नंतरच्या काळात दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय व्यापार करारात लादलेल्या अटी व शर्ती कारणीभूत आहेत, असे निरीक्षण नेपाळचे माजी उपपंतप्रधान विमलेेंद्र कुमार निधी यांनी नोंदविले. 

भारताने जर आंतरराष्ट्रीय व्यापार करारात लादलेल्या अटी व शर्ती आणखी शिथिल केल्या तर दाेन्ही देशांत रुंदावत चाललेली मतभेदाची दरी कमी होऊन संबंध पूर्ववत होतील, असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. नेपाळच्या मधेसी प्रांतात भारताला अधिक रुची आहे, ते हा नेपाळपासून प्रांत तोडून भारताला जोडतील, असा एक समज वाढत आहे. एकीकडे भारताने व्यापारात अटी व शर्ती लादल्या असताना दुसरीकडे  चीनने मात्र  त्या कमी केल्या  आहेत, यामुळे नेपाळी जनतेच्या मनात चीनविषयी सकारात्मक भावना वाढीस लागली आहे, याकडे विमलेंद्रकुमार निधी यांनी लक्ष वेधले. सध्या  त्यांच्याकडे नेपाळमधील सत्ताधारी नेपाळी नॅशनल  काँग्रेसचे  उपाध्यक्षपद असून नेपाळी सत्ताकेंद्रात त्यांचे मोठे राजकीय वजन आहे. नेपाळमध्ये  सध्या स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या निवडणुका सुरू असून त्यांनी मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला. 

भूकंपाच्या वेळेस भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे नाराजी नेपाळच्या माजी उपपंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार रामजी दहाल यांच्या मते कालापानी-विपुलेख सीमेवरून जेवढे राजकारण केले जात आहे, ते नेपाळी जनतेसाठी तेवढे महत्त्वाचे नाही. हा दोन्ही देशांतील राजकारण्यांनी तापवलेला मुद्दा आहे. चर्चा करून हा प्रश्न सोडविता येऊ शकतो. मात्र, भूकंपानंतर भारताने नेपाळला पाहिजे तशी मदत तर केली नाहीच, शिवाय वर त्याकाळी सीमाबंदी करून आमच्या जखमेवर मीठ चोळले, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.  आमच्या नव्या घटनेचे भारताने स्वागत करायला हवे होते, असे ते म्हणाले.

भारतासोबतची सीमा सुरक्षितभारतासोबत नेपाळची १८४० किमीची सीमा आहे, ती पूर्णत: सुरक्षित  आहे. इतर देशांसोबतच्या सीमेवर भारत दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करतो, पण नेपाळला  काय देतो, व्यापारात अटी व शर्ती लादतो, असे निरीक्षण नेपाळच्या पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार श्रीकृष्ण अनिरुद्ध गौतम यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :IndiaभारतNepalनेपाळ