शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातील दहशतवादामुळे यंदाही सार्क परिषद होण्याची शक्यता नाहीच ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 09:53 IST

पाकिस्तानने दहशतवादाला दिलेल्या उघड पाठिंब्यामुळे भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेशाने बैठकीस नकार दिल्यानंतर 2016 साली पाकिस्तानात होणारी सार्क बैठक रद्द करण्यात आली होती. मात्र यंदाही सार्क सदस्यांनी परिषदेसाठी कोणतीही उत्सुकता न दाखवल्यामुळे सार्क परिषद होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

न्यू यॉर्क, दि.23- पाकिस्तानने दहशतवादाला दिलेल्या उघड पाठिंब्यामुळे भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेशाने बैठकीस नकार दिल्यानंतर 2016 साली पाकिस्तानात होणारी सार्क बैठक रद्द करण्यात आली होती. मात्र यंदाही सार्क सदस्यांनी परिषदेसाठी कोणतीही उत्सुकता न दाखवल्यामुळे सार्क परिषद होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणारा उघड पाठिंबा भारतीय उपखंडातील देशांमध्ये नाराजीचे कारण बनला आहे. मागील वर्षी सार्कचे यजमानपद पाकिस्तानकडे होते तर यावेळेस ते नेपाळकडे आहे.

दरवर्षी सार्क परिषद नोव्हेंबर महिन्यात होते मात्र अद्याप सदस्य राष्ट्रांनी कोणताही उत्साह दाखवलेला नाही. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी जमलेले असताना सार्क देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. तेथेही दहशतवादाचा मुद्दा उचलण्यात आला. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शांतता आणि सुरक्षेचे वातावरण असल्याशिवाय प्रादेशिक सहकार्य व भरभराट साधता येणार नाहीळअसे विधान केले. त्यामुळे सार्क परिषद यंदा होणार की नाही यावर चर्चा सुरु झाली आहे. भारताने बिमस्टेक, इब्सा

 अशा अनेक सहकारी संघटनांमध्ये दहशतवादाचे उच्चाटन करण्याकडे वारंवार लक्ष वेधले आहे तर पाकिस्तानला वगळून बीबीआयएन म्हणजे भारत, भूटान, बांगलादेश व नेपाळ यांची पायाभूत सुविधांबाबत सहकार्य करणार्या संघटनेची मोट भारताने बांधली आहे. दहशतावादाचे अड्डे पोसणार्या पाकिस्तानला सर्वच स्तरांवर एकटे पाडण्याचे प्रयत्न भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेश करत आहेत. यूएनच्या आमसभेत या तिन्ही देशांनी दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी घालतो हे उघडपणे पुराव्यांसकट मांडले त्यामुळे सार्क परिषदेवर पाकपुरस्कृत दहशतवादाची छाया गडद होत चालली आहे. पुढील वर्ष पाकिस्तानात निवडणुका असल्याने तेव्हा तरी सार्क परिषद होईल की नाही याबद्दलही खात्रीने कोणालाच सांगता येणार नाही

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज