शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कतारमध्ये राहाणाऱ्या भारतीयांसाठी महत्त्वाचे; नियमांमध्ये मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 11:34 IST

कतारमध्ये सध्या 16 लाख परदेशी कामगार काम करत आहेत. त्यामध्ये आशियाई कामगारांचा मोठा भरणा आहे. एखाद्या वेगळ्याच कामाचे प्रलोभन दाखवून मजुरीचे काम देणे, नोकरी सोडण्याची परवानगी न देणे, धोकादायक कामांना जुंपणे असे प्रकार कतारमध्ये सर्रास होत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.

दोहा- गेली अनेक वर्षे कठोर रहिवासी कायद्यांमुळे कतारवर जगभरातून टिका होत आहे. विकसनशील किंवा अविकसीत देशांमधील मजुरांना कामासाठी बोलवून त्यांचा छळ करणाका देश म्हणून कतारचे नाव घेतले जाते. आता परदेशातून येणाऱ्या कामगारांवा काम देणाऱ्या कंपनीच्या परवानगीविना कतारमधून बाहेर पडता येणार आहे. हा मोठा बदल केल्यामुळे भारतीय, नेपाळी, बांगलादेशींसारख्या अनेक कामगारांना मोठा फायदा होणार आहे.

2022 साली कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यासाठी तेथे बांधकामाची मोठी कामे सुरु आहेत. स्टेडियम, रस्ते, हॉटेल्स, इमारती अशी बांधकामे तेथे सुरु आहेत. त्यासाठी जगातील अनेक देशांचे मजूर तेथे बोलावले गेले. मात्र या मजूरांना साधे मानवी अधिकारही तेथे मिळत नाहीत असे मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. या मजूरांची सर्व कागदपत्रे, पासपोर्ट काम देणाऱ्या कंपनीकडे किंवा एजंटसकडे द्यावी लागत असत. त्यांच्या परवानगीविना कामगारांना कतार सोडताच येत नसे. आता मात्र कतारने कामगारांना देश सोडायचा झाल्यास अशी परवानगी घ्यायची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने याचे स्वागत केले असून एक्झीट व्हीसा प्रणालीमध्ये कतारने बदल केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

कफाला नियम काय आहे?कतारमध्ये कामगारांनी प्रवेश केल्यावर त्यांना नोकरी बदलण्यासाठी तसेच देश सोडण्यासाठी काम देणाऱ्या कंपनीची परवानगी घ्यावी लागे. त्याचप्रमाणे इतर अनेक बंधने त्यांच्यावर लादण्यात येत. या पद्धतीला कफाला पद्धती असे म्हणतात. कतारमध्ये सध्या 16 लाख परदेशी कामगार काम करत आहेत. त्यामध्ये आशियाई कामगारांचा मोठा भरणा आहे. एखाद्या वेगळ्याच कामाचे प्रलोभन दाखवून मजुरीचे काम देणे, नोकरी सोडण्याची परवानगी न देणे, धोकादायक कामांना जुंपणे असे प्रकार कतारमध्ये सर्रास होत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. तसेच हे कामगार अत्यंत घाणेरड्या व अस्वच्छ जागी राहातात, त्यांच्या आरोग्याची कोणतीच काळजी कतारकडून घेतली जात नाही. यामुळे जगभरातील कामगार कार्यकर्ते आणि संघटनांनी कतारवर वारंवार टीका केली जात होती.

600 भारतीय कामगारांचा कतारमध्ये छळ, पगाराविना ठेवले अडकवून

फुटबॉल स्पर्धेवर टीका, भ्रष्टाचार व लाचखोरीकतारचे वातावरण फुटबॉल खेळण्यासाठी योग्य नसल्याची टीका अनेक क्रीडातज्ज्ञांनी केली आहे. त्यामुळे कतारने खेळाची मैदाने पूर्ण वातानुकूलीत करण्याचा निर्णय घेतला. मोठमोठे दावेदार मागे टाकून कतारला फूटबॉल स्पर्धा भरवण्याची संधी मिळण्यामागे लाचखोरी आणि भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला जात आहे. जागतिक फुटबॉल संघटना व त्याचे तत्कालीन अध्यक्ष सेफ ब्लॅटर यांच्यावर यामुळे मोठी टीका झाली होती. ही मैदाने बांधून स्पर्धेनंतर कतार ती पुन्हा तोडणार आहे. त्यानंतर ती आफ्रिकेतील गरिब देशांना दान करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :QatarकतारIndiaभारत