शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारताचं मोठं यश! कतार न्यायालयाने अर्ज स्वीकारला; 'त्या' आठ भारतीयांना मिळणार दिलासा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 10:25 IST

कतारने भारताच्या ८ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे

Qatar India: कतारच्या न्यायालयाने भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांचे अपील मान्य केले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर 2023 रोजी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. आता या प्रकरणात एक मोठे अपडेट आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नौदलाच्या माजी जवानाचे अपील स्वीकारले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. हे अपील भारत सरकारने दाखल केले होते.

कतारमधील न्यायालयाने गुरुवारी (२३ नोव्हेंबर) अपीलाची कागदपत्रे स्वीकारली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालय अपीलाचा अभ्यास करत असून पुढील सुनावणी लवकरच अपेक्षित आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी त्यांच्या शेवटच्या साप्ताहिक ब्रीफिंगमध्ये सांगितले की भारताने या निर्णयाविरुद्ध आधीच अपील दाखल केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गेल्या वर्षी २५ ऑक्टोबर रोजी मीटू भार्गव नावाच्या महिलेने ट्विट केले होते की, भारतीय नौदलाचे आठ माजी अधिकारी कतारची राजधानी दोहा येथे ५७ दिवसांपासून बेकायदेशीर नजरकैदेत आहेत. मीतू भार्गव ही कमांडर पूर्णेंदू तिवारी यांची बहीण आहे. या अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. कतारच्या न्यूज वेबसाईट अल-जजीराच्या रिपोर्टनुसार, या अधिकाऱ्यांवर कतारच्या पाणबुडी प्रकल्पाशी संबंधित माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप आहे.

कतार सरकारने या माजी अधिकार्‍यांवर लावलेल्या आरोपांबाबत भारत सरकारकडून कोणतीही विशिष्ट माहिती सार्वजनिक केलेली नाही. नौदलातून निवृत्त झालेले हे सर्व अधिकारी दोहा येथील अल-दहरा कंपनीत काम करत होते. ही कंपनी तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा पुरवत असे. तसेच कतारच्या नौदलाला प्रशिक्षण आणि उपकरणे पुरवली. ही कंपनी ओमानच्या हवाई दलातील निवृत्त स्क्वाड्रन लीडर खामिस अल आझमी चालवत होते. गेल्या वर्षी या भारतीयांसोबत त्यालाही अटक करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये त्यांची सुटका झाली.

हे भारतीय कोण आहेत?

मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत- कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि राजेश.  या सर्व माजी अधिकाऱ्यांनी २० वर्षे भारतीय नौदलात सेवा बजावली होती. नौदलात असताना त्यांचा कार्यकाळ निर्दोष राहिला असून त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

टॅग्स :QatarकतारIndiaभारतindian navyभारतीय नौदल