शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

भारताचं मोठं यश! कतार न्यायालयाने अर्ज स्वीकारला; 'त्या' आठ भारतीयांना मिळणार दिलासा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 10:25 IST

कतारने भारताच्या ८ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे

Qatar India: कतारच्या न्यायालयाने भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांचे अपील मान्य केले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर 2023 रोजी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. आता या प्रकरणात एक मोठे अपडेट आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नौदलाच्या माजी जवानाचे अपील स्वीकारले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. हे अपील भारत सरकारने दाखल केले होते.

कतारमधील न्यायालयाने गुरुवारी (२३ नोव्हेंबर) अपीलाची कागदपत्रे स्वीकारली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालय अपीलाचा अभ्यास करत असून पुढील सुनावणी लवकरच अपेक्षित आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी त्यांच्या शेवटच्या साप्ताहिक ब्रीफिंगमध्ये सांगितले की भारताने या निर्णयाविरुद्ध आधीच अपील दाखल केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गेल्या वर्षी २५ ऑक्टोबर रोजी मीटू भार्गव नावाच्या महिलेने ट्विट केले होते की, भारतीय नौदलाचे आठ माजी अधिकारी कतारची राजधानी दोहा येथे ५७ दिवसांपासून बेकायदेशीर नजरकैदेत आहेत. मीतू भार्गव ही कमांडर पूर्णेंदू तिवारी यांची बहीण आहे. या अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. कतारच्या न्यूज वेबसाईट अल-जजीराच्या रिपोर्टनुसार, या अधिकाऱ्यांवर कतारच्या पाणबुडी प्रकल्पाशी संबंधित माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप आहे.

कतार सरकारने या माजी अधिकार्‍यांवर लावलेल्या आरोपांबाबत भारत सरकारकडून कोणतीही विशिष्ट माहिती सार्वजनिक केलेली नाही. नौदलातून निवृत्त झालेले हे सर्व अधिकारी दोहा येथील अल-दहरा कंपनीत काम करत होते. ही कंपनी तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा पुरवत असे. तसेच कतारच्या नौदलाला प्रशिक्षण आणि उपकरणे पुरवली. ही कंपनी ओमानच्या हवाई दलातील निवृत्त स्क्वाड्रन लीडर खामिस अल आझमी चालवत होते. गेल्या वर्षी या भारतीयांसोबत त्यालाही अटक करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये त्यांची सुटका झाली.

हे भारतीय कोण आहेत?

मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत- कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि राजेश.  या सर्व माजी अधिकाऱ्यांनी २० वर्षे भारतीय नौदलात सेवा बजावली होती. नौदलात असताना त्यांचा कार्यकाळ निर्दोष राहिला असून त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

टॅग्स :QatarकतारIndiaभारतindian navyभारतीय नौदल