शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Prophet Row : ’तो’ आमच्यासाठी मोठा मुद्दा नाही, भारताचा अंतर्गत प्रश्न - बांगलादेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 19:55 IST

बांगलादेश सरकार या मुद्द्यावर तडजोड करत असल्याची टीकाही त्यांनी फेटाळून लावली. ढाका येथेही काही संघटनांनी १० जून रोजी या मुद्द्यावर निदर्शने केली होती.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेली टिप्पणी ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे बांगलादेशच्या वरिष्ठ मंत्र्यांनी म्हटले आहे. सौदी अरेबिया, इराणसह अनेक देशांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत भारत सरकारकडे कारवाईची मागणी केली होती. तर अशा परिस्थितीत दुसरीकडे बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री हसन महमूद यांनी ही टिप्पणी केली आहे. हा बांगलादेशसाठी कोणता मोठा मुद्दा नाही. यासोबतच बांगलादेश सरकार या मुद्द्यावर तडजोड करत असल्याची टीकाही त्यांनी फेटाळून लावली. ढाका येथेही काही संघटनांनी १० जून रोजी या मुद्द्यावर निदर्शने केली होती.

“भारत सरकारने या मुद्द्यावर केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेले कोणतेही वक्तव्य निषेधार्ह आहे. या प्रकरणी भारतात एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि त्या आधारावर कठोर कारवाई केली जाईल अशी आशा आहे,” असेही हसन महमूद म्हणाले. बांगलादेश सरकार पैगंबर मोहम्मद यांच्यावर करण्यात आलेल्या टिपण्णीवर कोणतीही तडजोड करत नाही आणि करणारही नाही. मी स्वतः याचा निषेध केला आहे आणि जाहीर सभेतही याबद्दल बोललो आहे, असं त्यांनी बांगलादेश सरकारकडून हलगर्जीपणा दाखवल्याच्या करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना स्पष्टीकरण दिलं.

दरम्यान, बांगलादेशनं सार्वजनिकरित्या निवेदन जारी न केल्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावरही बांगलादेशकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “हे बांगलादेशचं अंतर्गत प्रकरण नाही. बाहेरील प्रकरण आहे. जेव्हा केव्हा जगात असं काही घडतं तेव्हा काही इस्लामिक पक्ष या ठिकाणीही आंदोलन करतात. असं सातत्यानं होत असतं. जितका अरब देश, पाकिस्तान, मलेशियात होतो तितका हा मोठा मुद्दा या ठिकाणी नाही,” असंही महमूद यांनी स्पष्ट केलं. जर पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात जगात कुठेही काहीही झालं तर त्याचा निषेध केला गेलाच पाहिजे. भारत सरकारनं केलेल्या कारवाईचं आम्ही स्वागत करत असल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत