शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

"पंतप्रधान नरेद्र मोदींच्या आर्थिक धोरणांमुळे भारतावर मंदीचा परिणाम नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 10:06 IST

अश्विनी वैष्णव यांचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये वक्तव्य.

जगातील आर्थिक संकटाच्या काळात अनेक देश भारताच्या आर्थिक प्रगतीकडे पाहत आहेत. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) मध्येही भारताच्या कामगिरीचा डंका वाजला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये केंद्रीय रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताने गुंतवणुकीवर आधारित वाढीवर लक्ष केंद्रित केल्याचं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महासाथीच्या काळात पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

“यामुळेच भारत महासाथीतून योग्यरित्या बाहेर येऊ शकला आणि भारतानं ६ टक्क्यांची वाढ नोंदवली. जेव्हा कोरोनाची महासाथ आली तेव्हा यामुळे आर्थिक आणि मानवी संकट निर्माण झालं. तेव्हा मोठ्या देशांनी प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करण्यास सुरूवात केली. यामुळे महागाईचा दबाव वाढला,” असं अश्विनी वैष्णव म्हणाले. २०२२ मध्ये डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून १,२१७५३ अब्ज रुपयांची देवाणघेवाण झाली. हे अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्सच्या एकूण ट्रान्झॅक्शनच्या ४ टक्के असल्याचेही ते म्हणाले.

सेमीकंडक्टर क्षेत्रावरही भाष्य

केंद्रीय दूरसंचार मंत्री पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने आपण जगाने इंडिया स्टॅकचा अवलंब करावा असा संदेश आणला आहे. उद्योन्मुख देशांपासून ते उद्योन्मुख कंपन्यांसाठी हा एक उत्तम डिजिटल उपाय आहे. एवढेच नाही तर हे ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, याचा अर्थ कोणीही त्याचा फायदा घेऊ शकतो.”

अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचाही कार्यभार आहे. WEF मधील दुसर्‍या सत्रात, त्यांनी देशातील वेगाने विकसित होत असलेल्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमबद्दल देखील माहिती दिली.  “येत्या ३ वर्षांत भारत दूरसंचार उपकरणांचा मोठा निर्यातदार असेल. आज हा देशातील एक मोठा उद्योग आहे. सुमारे ८७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आली आहे. अगदी Apple iPhone 14 भारतात बनवला जात आहे आणि सप्लाय चेन बदलत आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSwitzerlandस्वित्झर्लंडcorona virusकोरोना वायरस बातम्या