शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रपती पदक विजेता, INS विराटवर बजावले काम; मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले ८ अधिकारी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 13:04 IST

8 ex-Indian Navy officers: कतारमधील न्यायालयाने आठ माजी भारतीय नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

नवी दिल्ली: कतारमधील न्यायालयाने आठ माजी भारतीय नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. ते गेल्या एक वर्षापासून तुरुंगात कैद आहेत. ही शिक्षा अत्यंत धक्कादायक असून, त्यांची सुटका करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधले जात आहेत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

आठ भारतीयांवर नेमके काय आरोप आहेत, हे कतार सरकारने सार्वजनिक केलेले नाहीत. मात्र भारतीय नौदलाचे माजी अधिकारी इस्रायलसाठी त्यांच्या देशाची हेरगिरी करत असल्याचा दावा कतारच्या स्थानिक माध्यमांनी केला आहे. मात्र, यात किती तथ्य आहे हे अद्याप समोर आले नाही. कतारमधील न्यायालयाने आठ माजी भारतीय नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या अधिकाऱ्यांची भारतीय नौदलात असताना उत्कृष्ट सेवा राहिली आहे.

एका अधिकाऱ्याला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उच्च व्यावसायिक कार्यक्षमता, वेगवान काम आणि कुशाग्र मन यामुळे यापैकी एका अधिकाऱ्याला भारतीय लष्करातील सेवेदरम्यान राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने त्यांच्या सेवेदरम्यान तामिळनाडूमधील प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन येथे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. आणखी एका अधिकाऱ्याने त्यांच्या सेवेदरम्यान भारतीय युद्धनौका INS विराटवर फायटर कंट्रोलर आणि नेव्हिगेटिंग ऑफिसर म्हणून काम बजावल्याची माहिती समोर आली आहे. तर काही अधिकारी ऑपरेशनल कमांडर देखील राहिले आहेत.

कतारमध्ये कसे पोहचले?

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांनी २० वर्षे नौदलात काम केले असून महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. या अधिकाऱ्यांनी नौदलात निर्धारित वेळेत सेवा दिल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि चांगल्या संधींच्या शोधात नौदलाची सेवा सोडली. यानंतर हे अधिकारी कतारची खासगी सुरक्षा कंपनी अल दाहरासोबत काम करू लागले.

भारत सरकारचे म्हणणे काय?

कतारच्या कनिष्ठ कोर्टाने अल दाहरा कंपनीच्या आठ भारतीय कर्मचाऱ्यांशी संबंधित खटल्यात आपला हा निर्णय दिला आहे. आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहोत, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

सरकारला नव्हती अटकेची माहिती

कतारच्या गुप्तचर संस्थेच्या राज्य सुरक्षा ब्युरोने ३० ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना अटक केली. मात्र, सप्टेंबरच्या मध्यात भारतीय दूतावासाला अटकेची माहिती देण्यात आली होती. ३० सप्टेंबर रोजी त्यांना आपल्या कुटुंबांसोबत काही वेळ फोनवर बोलण्याची परवानगी दिली नव्हती.

टॅग्स :Qatarकतारindian navyभारतीय नौदलIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय