शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

गेल्या तीस वर्षात जगाला हादरवणारे शक्तीशाली भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 16:11 IST

मेक्सिकोमध्ये समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या भूकंपामुळे तेथे मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये याप्रकारचे अनेक शक्तीशाली भूकंप झाले आहेत.

मुंबई, दि.8- मेक्सिकोमध्ये समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या भूकंपामुळे तेथे मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये याप्रकारचे अनेक शक्तीशाली भूकंप झाले आहेत. त्यापैकी 6 रिश्टर स्केलपेक्षा जास्त असणारे व सर्वाधीक हानी पोहोचवणारे भूकंप पुढीलप्रमाणे

20 ऑगस्ट 1988- नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात 721 लोकांचे प्राण गेले तसेच भारतातील बिहार राज्यात या भूकंपामुळे 277 लोक मृत्युमुखी पडले.

20 ऑक्टोबर 1991- उत्तर प्रदेशात 6.6 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात 768 लोक मृत्युमुखी पडले.

30 सप्टेंबर 1993- किल्लारी येथे 6.2 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने मोठी हानी. 9 हजारांहून अधिक लोकांचे प्राण गेले. पहाटे झालेल्या या भूकंपामुळे मोठे आर्थिक नुकसानही झाले.

26 जानेवारी 2001- गुजरातमध्ये झालेल्या 7.7 रिश्टर तीव्रतेच्या मोठ्या भूकंपामुळे 20 हजार लोकांचे प्राण गेले व दीड लाखांहून अधिक लोक जखमी झाले. भारताच्या अलिकडच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंप समजला जातो.

26 डिसेंबर 2003- इराणमधील बाम येथे झालेल्या 607 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात 31,884 लोक मृत्युमुखी पडले आणि 18 हजार लोक जखमी झाले.

26 डिसेंबर 2004- सुमात्रा येथे आलेल्या 9.3 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे हिंदी महासागरामध्ये त्सुनामी लाटा निर्माण झाल्या. यामुळे विविध देशांमधील 2,20,000 लोकांचे प्राण गेले त्यामध्ये 1 लाख 68 हजार लोक इंडोनेशियाचे होते.

28 मार्च 2005- इंडोनेशियातील नियास बेटेवरील भूकंपात 900 लोक मृत्युमुखी पडले.

8 ऑक्टोबर 2005- पाकिस्तानमध्ये 7.6 रिश्टर स्केल भूकंपामुळे 75 हजार लोकांचे प्राण गेले. या भूकंपामुळे 35 लाख लोकांना आपली घरेदारे सोडावी लागली.

27 मे 2006 - इंडोनेशियातील योगकार्ता येथे झालेल्या मोठ्या भूकंपामुळे 6 हजार लोकांचे प्राण गेले तर दीड लाख लोकांना आपली घरे गमवावी लागली.

12 मे 2008- चीनमधील सिचुआन प्रांतात 8 रिश्टर तीव्रतेच्या भूरंपामुळे 87 हजार लोकांचे प्राण गेले तर अनेक लोक बेपत्ता झाले.

14 एप्रिल 2010- चीनच्या वायव्येकडील क्वींन्घाई प्रांतात 6.9 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे 3 हजार लोकांचे प्राण गेले.

12 जानेवारी 2010- 7 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याने हैतीमधील जनजीवन विस्कळीत. अडिच ते तीन लाख लोक मृत्युमुखी पडले.

23 ऑक्टोबर 2011- तुर्कस्थानात 7.2 रिश्टर तीव्रतेचा भूकंप आल्यामुऴे 600 लोक मृत्युमुखी पडले तर 4150 लोक जखमी झाले.

11 मार्च 2011- जपानच्या किनाऱ्यावर आलेल्या 9 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी लाटा निर्माण झाल्या. यामध्ये 18,900 लोकांचे प्राण गेले तसेच दाईची येथील अणूप्रकल्पास धोका निर्माण झाला.

11 ऑगस्ट 2012- इराणमधील तेबरिझ येथे 6.3 आणि 6.4 अशा तीव्रतेचे सलग दोन भूकंप झाले. यामध्ये 306 लोक मृत्यू पावले तर 3000 लोक जखमी झाले.

25 एप्रिल 2015- नेपाळमध्ये 7.8 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे 8,900 लोक मृत्युमुखी पडले तसेच पाच लाख लोकांना आपल्या घरादारास मुकावे लागले.

26 ऑक्टोबर 2015- अफगाणिस्तानातील हिंदुकुश प्रांतामध्ये 7.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. याचे धक्के भारतीय उपखंडात दूरवर जाणवले.

फेब्रुवारी 2016- तैवानच्या तैनान येथे झालेल्या 6.4 तीव्रतेच्या भूकंपात 100 लोक मृत्युमुखी पडले.

16 एप्रिल 2016- इक्वेडोर येथे 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे 673 लोकांचे प्राण गेले तसेच इमारती कोसळून मोठे नुकसान झाले.

24 ऑगस्ट 2016- इटलीमध्ये 6.2 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे 300 लोक मृत्युमुखी पडले.

8 ऑगस्ट 2017-चीनच्या वायव्य प्रांतातील भूकंपामुळे 24 लोकांचे प्राण गेले.