शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

India Population : भारताची लोकसंख्या वाढली; चीन म्हणाला, “क्वांटिटी नाही, क्वालिटीही हवी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 12:29 IST

भारताने लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकल्याबद्दल त्यांना सवाल करण्यात आला. त्यावर चिनी परराष्ट्र मंत्रालयानं चिडल्यासारखं उत्तर दिलं.

भारतानं लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकलं. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणं चीनसाठी चिडचिडीचं कारण बनलं आहे. भारत आता चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, यावर चीनची प्रतिक्रिया काय आहे? असा सवाल चिनी परराष्ट्र मंत्रालयाला करण्यात आला. 

या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताचं नाव न घेता टीका केली. केवळ लोकसंख्या वाढवून फायदा मिळत नाही, तर त्यासाठी त्या लोकसंख्येमध्ये गुणवत्ता असली पाहिजे. सध्या आपल्याकडे ९० कोटी लोकांची वर्कफोर्स आहे, जी चीनच्या अर्थव्यवस्थेत तेजी आणण्यास सक्षम आहे, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.  

"मला तुम्हाला सांगायचं आहे की लोकसंख्येचा फायदा केवळ प्रमाणावर नाही तर गुणवत्तेवर देखील अवलंबून असतो. लोकसंख्या महत्त्वाची आहे परंतु त्यासोबत प्रतिभा असणं खूप महत्त्वाचं आहे. चीनची लोकसंख्या १.४ बिलियनपेक्षा अधिक आहे. कार्यरत असलेल्या वयाचं लोक सुमारे ९०० मिलियन आहेत. याशिवाय चीन आपल्या वृद्ध होत असलेल्या लोकसंख्येमुळे उद्भवणाऱ्या समस्येला तोंड देण्यासाठीही प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेंग वेनबिग यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिककित्येक दशकांपासून लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर असलेल्या चीनला मागे टाकून भारत आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली, तर  चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या दर्शकानुसार ही बाब स्पष्ट झाली.

१९५० पासून जागतिक स्तरावर लोकसंख्येची आकडेवारी गोळा केली जात आहे. पहिल्यांदाच भारताने सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या संयुक्त राष्ट्रांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. पुढील तीन दशकांपर्यंत देशाची लोकसंख्या वाढू शकते आणि त्यानंतर ती घटायला सुरुवात होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत