शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

India Population : भारताची लोकसंख्या वाढली; चीन म्हणाला, “क्वांटिटी नाही, क्वालिटीही हवी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 12:29 IST

भारताने लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकल्याबद्दल त्यांना सवाल करण्यात आला. त्यावर चिनी परराष्ट्र मंत्रालयानं चिडल्यासारखं उत्तर दिलं.

भारतानं लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकलं. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणं चीनसाठी चिडचिडीचं कारण बनलं आहे. भारत आता चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, यावर चीनची प्रतिक्रिया काय आहे? असा सवाल चिनी परराष्ट्र मंत्रालयाला करण्यात आला. 

या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताचं नाव न घेता टीका केली. केवळ लोकसंख्या वाढवून फायदा मिळत नाही, तर त्यासाठी त्या लोकसंख्येमध्ये गुणवत्ता असली पाहिजे. सध्या आपल्याकडे ९० कोटी लोकांची वर्कफोर्स आहे, जी चीनच्या अर्थव्यवस्थेत तेजी आणण्यास सक्षम आहे, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.  

"मला तुम्हाला सांगायचं आहे की लोकसंख्येचा फायदा केवळ प्रमाणावर नाही तर गुणवत्तेवर देखील अवलंबून असतो. लोकसंख्या महत्त्वाची आहे परंतु त्यासोबत प्रतिभा असणं खूप महत्त्वाचं आहे. चीनची लोकसंख्या १.४ बिलियनपेक्षा अधिक आहे. कार्यरत असलेल्या वयाचं लोक सुमारे ९०० मिलियन आहेत. याशिवाय चीन आपल्या वृद्ध होत असलेल्या लोकसंख्येमुळे उद्भवणाऱ्या समस्येला तोंड देण्यासाठीही प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेंग वेनबिग यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिककित्येक दशकांपासून लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर असलेल्या चीनला मागे टाकून भारत आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली, तर  चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या दर्शकानुसार ही बाब स्पष्ट झाली.

१९५० पासून जागतिक स्तरावर लोकसंख्येची आकडेवारी गोळा केली जात आहे. पहिल्यांदाच भारताने सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या संयुक्त राष्ट्रांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. पुढील तीन दशकांपर्यंत देशाची लोकसंख्या वाढू शकते आणि त्यानंतर ती घटायला सुरुवात होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत