शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

India Population : भारताची लोकसंख्या वाढली; चीन म्हणाला, “क्वांटिटी नाही, क्वालिटीही हवी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 12:29 IST

भारताने लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकल्याबद्दल त्यांना सवाल करण्यात आला. त्यावर चिनी परराष्ट्र मंत्रालयानं चिडल्यासारखं उत्तर दिलं.

भारतानं लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकलं. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणं चीनसाठी चिडचिडीचं कारण बनलं आहे. भारत आता चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, यावर चीनची प्रतिक्रिया काय आहे? असा सवाल चिनी परराष्ट्र मंत्रालयाला करण्यात आला. 

या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताचं नाव न घेता टीका केली. केवळ लोकसंख्या वाढवून फायदा मिळत नाही, तर त्यासाठी त्या लोकसंख्येमध्ये गुणवत्ता असली पाहिजे. सध्या आपल्याकडे ९० कोटी लोकांची वर्कफोर्स आहे, जी चीनच्या अर्थव्यवस्थेत तेजी आणण्यास सक्षम आहे, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.  

"मला तुम्हाला सांगायचं आहे की लोकसंख्येचा फायदा केवळ प्रमाणावर नाही तर गुणवत्तेवर देखील अवलंबून असतो. लोकसंख्या महत्त्वाची आहे परंतु त्यासोबत प्रतिभा असणं खूप महत्त्वाचं आहे. चीनची लोकसंख्या १.४ बिलियनपेक्षा अधिक आहे. कार्यरत असलेल्या वयाचं लोक सुमारे ९०० मिलियन आहेत. याशिवाय चीन आपल्या वृद्ध होत असलेल्या लोकसंख्येमुळे उद्भवणाऱ्या समस्येला तोंड देण्यासाठीही प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेंग वेनबिग यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिककित्येक दशकांपासून लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर असलेल्या चीनला मागे टाकून भारत आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली, तर  चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या दर्शकानुसार ही बाब स्पष्ट झाली.

१९५० पासून जागतिक स्तरावर लोकसंख्येची आकडेवारी गोळा केली जात आहे. पहिल्यांदाच भारताने सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या संयुक्त राष्ट्रांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. पुढील तीन दशकांपर्यंत देशाची लोकसंख्या वाढू शकते आणि त्यानंतर ती घटायला सुरुवात होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत