शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

श्रीलंकेत मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 21:20 IST

श्रीलंकेत मोठे राजकीय संकट ओढावले आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच रविवारी मोठी हिंसक घटना घडली. 

कोलंबो : श्रीलंकेत मोठे राजकीय संकट ओढावले आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच रविवारी मोठी हिंसक घटना घडली. 

माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांच्या सुरक्षा रक्षकाने जमावावर गोळीबार केला. यात एक जण ठार झाला तर दोन जखमी झाले. सुरक्षा रक्षकाने ज्यावेळी गोळीबार केला. तेव्हा अर्जुन रणतुंगा आपल्या कार्यालयात जात होते. अर्जुन रणतुंगा सुखरुप असून या घटनेनंतर या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. दरम्यान, सुरक्षा रक्षकाने हा गोळीबार कोणत्या उद्देशाने केला, याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळू शकली नाही.

शुक्रवारी राष्ट्रपती मैत्रीपाला श्रीसेना यांनी राजपक्षे यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली होती. मात्र संसदेच्या अध्यक्षांनी रानिल विक्रमसिंघे यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून मान्यता दिली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांची भेट घेत संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. आपल्याकडे बहुमत असल्याचाही दावाही विक्रमसिंघे यांनी केला होता. असे असूनही राष्ट्रपतींनी शनिवारी संसदेला १९ नोव्हेंबरपर्यंत संस्थगित ठेवले आहे. नवीन पंतप्रधान महिंद्रा राजपाक्षे यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, या उद्देशाने राष्ट्रपतींनी हा निर्णय घेतला. दुसरीकडे मी अजूनही देशाचा पंतप्रधान आहे, असा दावा विक्रमसिंघे यांनी केला होता.

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय