शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

इस्लामाबादमध्ये आंदोलक आणि पोलिसांमधल्या संघर्षाला हिंसक वळण, 10 जणांचा मृत्यू तर 250 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 09:06 IST

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी आज पोलीस आणि निमलष्करी दलाने कारवाई सुरु केली होती

ठळक मुद्दे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी आज पोलीस आणि निमलष्करी दलाने कारवाई सुरु केली होती.आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी बळाचा वापर केला.

इस्लामाबाद- पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी आज पोलीस आणि निमलष्करी दलाने कारवाई सुरू केली होती. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी बळाचा वापर केला. या कारवाईत 25 जणांचा मृत्यू झाला असून, 250 जण जखमी झाले आहेत. 

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आंदोलकांना हटवून रस्ते मोकळे करण्याच्या सूचना सरकारला दिल्यानंतर आज पोलीस आणि निमलष्करी दलाने फैजाबादमधील आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी लाठीमार केला. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. आंदोनकर्त्यांनी या भागातील दुकानंसुद्धा बंद केली.

पाकिस्तानमधील तहरीक-ए-लब्बैक या रसूल अल्लाह या संघटनेकडून गेल्या २० दिवसांपासून इस्लामाबादमध्ये धरणं आंदोलनं सुरू आहेत. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्लामाबादला जाणारे महामार्ग अडवून धरले आहेत. यामुळे वाहतुकीची मोठा खोळंबा झाला असून पाकिस्तानच्या राजधानीची कोंडी झाली आहे. पाकिस्तान सरकारने फेसबुक, ट्विटर, युट्यूब या सोशल मीडिया साइट्सही ब्लॉक केल्या आहेत. पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्याचं प्रक्षेपण बंद करण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तान सरकारने सोशल मीडिया साइट्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर धरणं आंदोलन करुन वाहतूक रोखून धरणाऱ्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईचं प्रक्षेपण न करण्याच्या सूचना सरकारने सर्व वृत्तवाहिन्यांना दिल्या आहेत. मात्र जियोसह काही वृत्तवाहिन्यांनी या कारवाईचे प्रक्षेपण केलं.  

नेमकं प्रकरण काय ?

सप्टेंबर 2017 मध्ये संमत झालेल्या निवडणूक कायद्यामध्ये करण्यात आलेल्या बदलांच्या विरोधात तहरीक-ए-लब्बैक संघटना रस्त्यावर उतरली आहे. कायदा मंत्री जाहिद हमीद यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. निवडणूक कायद्यात करण्यात आलेल्या बदलांमुळे मोहम्मद पैगंबर यांच्या सर्वोच्चतेला आव्हान देण्यात आल्याचा, या संघटनेचा आक्षेप आहे. पण ही केवळ अनावधानाने झालेली चूक असल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. सरकारने एका कायद्याच्या मदतीने यामध्ये सुधारणा केली आहे. पण तरीही आंदोलक कायदा मंत्री जाहिद हमीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPoliceपोलिस