शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

इस्लामाबादमध्ये आंदोलक आणि पोलिसांमधल्या संघर्षाला हिंसक वळण, 10 जणांचा मृत्यू तर 250 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 09:06 IST

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी आज पोलीस आणि निमलष्करी दलाने कारवाई सुरु केली होती

ठळक मुद्दे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी आज पोलीस आणि निमलष्करी दलाने कारवाई सुरु केली होती.आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी बळाचा वापर केला.

इस्लामाबाद- पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी आज पोलीस आणि निमलष्करी दलाने कारवाई सुरू केली होती. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी बळाचा वापर केला. या कारवाईत 25 जणांचा मृत्यू झाला असून, 250 जण जखमी झाले आहेत. 

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आंदोलकांना हटवून रस्ते मोकळे करण्याच्या सूचना सरकारला दिल्यानंतर आज पोलीस आणि निमलष्करी दलाने फैजाबादमधील आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी लाठीमार केला. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. आंदोनकर्त्यांनी या भागातील दुकानंसुद्धा बंद केली.

पाकिस्तानमधील तहरीक-ए-लब्बैक या रसूल अल्लाह या संघटनेकडून गेल्या २० दिवसांपासून इस्लामाबादमध्ये धरणं आंदोलनं सुरू आहेत. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्लामाबादला जाणारे महामार्ग अडवून धरले आहेत. यामुळे वाहतुकीची मोठा खोळंबा झाला असून पाकिस्तानच्या राजधानीची कोंडी झाली आहे. पाकिस्तान सरकारने फेसबुक, ट्विटर, युट्यूब या सोशल मीडिया साइट्सही ब्लॉक केल्या आहेत. पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्याचं प्रक्षेपण बंद करण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तान सरकारने सोशल मीडिया साइट्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर धरणं आंदोलन करुन वाहतूक रोखून धरणाऱ्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईचं प्रक्षेपण न करण्याच्या सूचना सरकारने सर्व वृत्तवाहिन्यांना दिल्या आहेत. मात्र जियोसह काही वृत्तवाहिन्यांनी या कारवाईचे प्रक्षेपण केलं.  

नेमकं प्रकरण काय ?

सप्टेंबर 2017 मध्ये संमत झालेल्या निवडणूक कायद्यामध्ये करण्यात आलेल्या बदलांच्या विरोधात तहरीक-ए-लब्बैक संघटना रस्त्यावर उतरली आहे. कायदा मंत्री जाहिद हमीद यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. निवडणूक कायद्यात करण्यात आलेल्या बदलांमुळे मोहम्मद पैगंबर यांच्या सर्वोच्चतेला आव्हान देण्यात आल्याचा, या संघटनेचा आक्षेप आहे. पण ही केवळ अनावधानाने झालेली चूक असल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. सरकारने एका कायद्याच्या मदतीने यामध्ये सुधारणा केली आहे. पण तरीही आंदोलक कायदा मंत्री जाहिद हमीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPoliceपोलिस