शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाचा विळखा होणार गंभीर, पाकिस्तानातील शहरेही विषारी वायूने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:29 IST

उत्तर भारत आणि पाकिस्तानातील शहरांत धूरमिश्रित धुके पडत असून, आणखी काही महिने या शहरांना प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे.

वॉशिंग्टन : उत्तर भारत आणि पाकिस्तानातील शहरांत धूरमिश्रित धुके पडत असून, आणखी काही महिने या शहरांना प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे. यामुळे ही शहरे प्रदूषणाच्या गंभीर अवस्थेत पोहोचू शकतात, असा इशारा समुद्रीय आणि वातावरणाचा अभ्यास करणा-या संघटनेने (एनओएए) केला आहे.भारतात दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्ये गत आठवड्यापासून विषारी प्रदूषणाने त्रस्त आहेत. यामुळे बांधकाम आणि वीटभट्ट्या बंद करण्यासारखे उपाय करण्यात येत आहेत. एनओएएने सॅटेलाइट फोटो जारी करून उत्तर भारत आणि पाकिस्तानमधील प्रदूषणांच्या कारणांची मीमांसा केली आहे. इंधनामुळे होणारे प्रदूषण आणि शेतात जाळला जाणारा काडीकचरा हे प्रदूषणामागचे कारण सांगण्यात आले आहे.शेजारील देश पाकिस्तानातही खराब हवामानामुळे या महिन्यात किमान ६०० पेक्षा अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एनओएएने असेही म्हटले आहे की, पाकिस्तान आणि उत्तर भारतात थंडी आणि स्थिर हवा यामुळे प्रदूषण वाढण्याची शक्यता अधिक आहे. सध्याच या शहरात प्रदूषणामुळे घराबाहेर बाहेर पडणे अवघड झाले आहे.नवी दिल्ली स्थित अमेरिकी दूतावासाने ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या काळात केलेल्या हवेच्या गुणवत्तेचा सूचकांक (एक्यूआय) ५०० पेक्षा पुढे पोहोचला आहे. ८ नोव्हेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार, सायंकाळी ४ वाजता १०१० एवढा नोंदविला गेला आहे. (वृत्तसंस्था)कचरा जाळू नका -लखनौ : शहरी भागात कचरा जाळला जाऊ नये याची काळजी घ्या, असे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत, तर रस्त्यांवर वाहने आणि धूळ, माती यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकांच्या टँकरमधून पाणी फवारावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. प्रदूषणाच्या मुद्यावर त्यांनी येथे वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेतली.पार्किंगचे शुल्क पूर्ववत -दिल्लीतील पार्किंगचे वाढविलेले शुल्क आणि ट्रकच्या प्रवेशावर बंदी हटविण्यात आली आहे. ‘पर्यावरण प्रदूषण - प्रतिबंध आणि नियंत्रण’चे (ईपीसीए) अध्यक्ष भुरेलाल यांनी दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे आणि या उपाययोजना तात्काळ प्रभावाने हटविण्यात याव्यात, असे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :pollutionप्रदूषण