शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची पोलखोल! बलुच आर्मीने पाकच्या ५० सैनिकांचा खात्मा केला; सत्य आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 13:02 IST

बलुच आर्मीने पाकिस्तानच्या ५० सैनिकांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानच्या बलुच प्रांतात ११ मार्च रोजी जाफर एक्सप्रेस ट्रेन बलुच बंडखोरांनी हायजॅक केल्याची घटना समोर आली होती. बलुच लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.  यावेळी त्यांनी ट्रेनचे अपहरण केले आणि अनेक पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले, असं म्हटले होते. त्यांचा हा दावा पाकिस्तानने खोडून काढला होता. पाकिस्तानने ३० बलुच सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला. पाकिस्तानने त्यांच्या सैनिकांच्या मृत्युची संख्या जाहीर केलेली नाही. म्हणूनच बीएलएने पाकिस्तानी सैन्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला आहे.

VIDEO: २४ वर्षांनी भेटलेल्या बाप-लेकाची कडकडून मिठी; हा प्रसंग पाहून तुम्हीही व्हाल भावनिक

दरम्यान, आता सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये ट्रेनमधून वाचलेल्या लोकांनी अनेक पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा केला आहे. यामुळे आता पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. 

जाफर एक्सप्रेस ही क्वेट्टा आणि पेशावर दरम्यान धावणारी एक प्रमुख प्रवासी ट्रेन आहे. ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ते प्रवासाला निघाली. ट्रेनमध्ये सुमारे ५०० प्रवासी होते, यात नागरिकांसह पाकिस्तानी लष्कराचे कर्मचारी आणि सुरक्षा एजन्सीचे कर्मचारी होते. बोलान जिल्ह्यातील मशकाफ भागात बीएलएच्या दहशतवाद्यांनी बोगद्यात रेल्वे ट्रॅक उडवून दिल्यानंतर ट्रेन थांबली. त्यानंतर लगेचच हल्लेखोरांनी ट्रेन ताब्यात घेतली आणि प्रवाशांना ओलीस ठेवले. 

बीएलएचे प्रवक्ते झायेद बलोच यांनी दावा केला की, ही कारवाई त्यांच्या माजीद ब्रिगेड, फतेह स्क्वॉड आणि इतर विशेष युनिट्सनी संयुक्तपणे केली. हल्ल्यादरम्यान ट्रेन चालकाला गोळी लागली आणि अनेक प्रवाशांनी सांगितले की हल्लेखोर ट्रेनमध्ये घुसले, लोकांची ओळखपत्रे तपासली आणि लष्करी कर्मचाऱ्यांना वेगळे केले. बीएलएने महिला, मुले आणि बलुच नागरिकांना सोडण्यास सहमती दर्शविली पण लष्करी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले.

पाकिस्तानचा मोठा दावा

या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराने तातडीने बचाव कार्य सुरू केले. लष्कराने स्पेशल सर्व्हिस ग्रुप कमांडो, फ्रंटियर कॉर्प्स आणि हवाई दल तैनात केले. १२ मार्चच्या रात्री, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने दावा केला की, ही कारवाई यशस्वी झाली, यामध्ये ३३ BLA सैनिक मारले गेले आणि सर्व ओलिसांची सुखरूप सुटका करण्यात आली.  त्यांनी कबूल केले की या काळात २१ प्रवासी आणि ४ सैनिक मारले गेले. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी याला "घृणास्पद दहशतवादी हल्ला" असे वर्णन केले आणि लष्कराच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पण या दाव्यानंतर काही तासांतच परिस्थितीने एक नवीन वळण घेतले.

बीएलएने लष्कराचे दावे फेटाळून लावले.  'कारवाई पूर्णपणे अपयशी ठरली. संघटनेने दावा केला आहे की त्यांच्या लढाऊंनी आतापर्यंत ५० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे आणि १५० हून अधिक ओलिस अजूनही त्यांच्या ताब्यात आहेत. पाकिस्तान सरकारने त्यांच्या मागण्यांवर वाटाघाटी करण्याऐवजी लष्करी कारवाई सुरू केली, याच्या प्रत्युत्तरात त्यांनी अनेक सैनिकांना ठार मारले. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका कथित व्हिडिओमध्ये, बीएलएने ट्रेनच्या आतील फोटो दाखवल्याचा दावा केला आहे, यामध्ये सैनिकांना ओलीस ठेवल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान