शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Pakistan: आता अक्कल ठिकाणावर आली! पाकिस्तान म्हणे, पुढची १०० वर्षे भारताच्या वाकड्यात जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 10:14 IST

Pakistan to launch new security policy: गेली कित्येक दशके काश्मीर, काश्मीर असा जप करत दहशतवाद्यांवर अब्जावधी डॉलर्स उधळणाऱ्या पाकिस्तानला आता भिकेला लागल्य़ावर अक्कल आली आहे.

इस्लामाबाद : गेली कित्येक दशके काश्मीर, काश्मीर असा जप करत दहशतवाद्यांवर अब्जावधी डॉलर्स उधळणाऱ्या पाकिस्तानला आता भिकेला लागल्य़ावर अक्कल आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली आणि महागाईच्या विळख्यात पुरता कंगाल झालेल्या पाकिस्तानी नेत्यांनी आता परराष्ट्र नीती ठरविली आहे. यामध्ये पाकिस्तान शेजारी देशांशी शांतता आणि आर्थिक कूटनीतीला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे.

१०० पानांच्या या राष्ट्रीय सुरक्षा नीतीमध्ये भारतासोबत काश्मीरमुद्द्यावर अंतिम तोडगा काढत व्यापार आणि व्यवसायीक नात्याला पुढे नेले जाईल. दोन्ही देशांमध्ये दहशतवाद आणि काश्मीरवरून तणाव आहे. यामुळे व्यापारी आणि आर्थिक संबंध खराब झाले आहेत. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने एक्‍सप्रेस ट्रिब्‍यूनला मुलाखत देताना म्हटले की, आम्ही पुढील १०० वर्षे तरी भारतासोबर दुष्मनी करणार नाही. ही नवीन नीती शेजारी देशांशी शांतता राखण्यावर आहे. जर काश्मीर मुद्द्यावर चर्चा आणि प्रगती झाली तर भारतासोबत पूर्वीसारखे व्यापारी संबंध होण्याची शक्यता आहे. 

पाकिस्तानने आपल्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणात म्हटले आहे की ते आता भू-रणनीतीऐवजी भू-अर्थशास्त्रावर लक्ष केंद्रित करेल. पाकिस्तानच्या धोरणांमधील या बदलामुळे भारतासोबतच्या संबंधांमधील तणाव कमी होईल, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानला हे सांगणे सोपे पण करणे अवघड असल्याचे भारतीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणामध्ये आर्थिक सुरक्षा हा कळीचा मुद्दा असेल, असे पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, या बदलानंतरही, भारतासोबतचा काश्मीर वाद हा पाकिस्तानसाठी "महत्त्वाचे राष्ट्रीय धोरण" म्हणून ओळखला गेला आहे.

पण मोदींच्या काळात अशक्य...नवी दिल्लीत सध्याच्या मोदी सरकारच्या काळात भारतासोबत समेट होण्याची शक्यता नसल्याचेही पाकिस्तानी अधिकाऱ्याने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान शुक्रवारी नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा शुभारंभ करणार आहेत. पाकिस्तान आपल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा फक्त एक भाग सार्वजनिक करेल, बाकीचा भाग गोपनीय ठेवला जाईल. हे सुरक्षा धोरण बनवण्यात पाकिस्तानी लष्कराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान, नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणावर विरोधक गदारोळ माजवू शकतात, असे मानले जात आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीर