शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
3
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
4
कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
5
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
6
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
7
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
9
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
10
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
11
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
12
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
13
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
14
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
15
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
16
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
17
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
18
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
19
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
20
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर

पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:47 IST

भारतापासून वेगळा होऊन पाकिस्तान जरा कुठे सांभाळत होता तितक्याच तिथल्या लोकशाहीचा गळा दाबला गेला. याला जबाबदार होते जनरल अयूब खान, ज्यांनी तख्तापालट करून सत्ता काबीज केली

कराची  - ऑपरेशन सिंदूरमधून भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आता लष्करी राजवटीकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत. अलीकडच्या काळात ज्या घटना पाकिस्तानात घडत आहेत त्या पाहता लवकरच पाकिस्तानात तख्तापालट होईल असं बोलले जाते. पाकिस्तानात सध्या लष्कर सरकारपेक्षा वरचढ होत असल्याचं दिसून येते. 

पाकिस्तान सरकारने त्यांच्या सध्याचे सैन्य प्रमुख जनरल आसीम मुनीर याला फिल्ड मार्शल पदवी दिली आहे. आता जनरल मुनीर पाकिस्तानी सैन्य इतिहासातील माजी सैन्य शासक जनरल मोहम्मद अयूब खाननंतर फिल्ड मार्शल बनणारे दुसरे सैन्य प्रमुख बनले आहेत. हे पद ज्याला दिले त्याने पाकिस्तानात लष्करी राजवट आणली होती. पाकिस्तानातील सध्याची स्थिती सैन्य वरचढ होऊन जनरल मुनीर यांची ताकद वाढवण्यासोबतच शहबाज शरीफ यांच्या पायाखालीच जमीन सरकताना दिसत आहे.

भारतापासून वेगळा होऊन पाकिस्तान जरा कुठे सांभाळत होता तितक्याच तिथल्या लोकशाहीचा गळा दाबला गेला. याला जबाबदार होते जनरल अयूब खान, ज्यांनी तख्तापालट करून सत्ता काबीज केली. तिथून पाकिस्तानच्या भवितव्याचे निर्णय सैन्याच्या देखरेखीत होऊ लागले. पाकिस्तानचा इतिहास पाहता तिथे केवळ लोकशाही नावाला राहिली आहे खरी ताकद कायम सैन्याच्या हाती आहे. सैन्याच्या सावलीखाली दहशतवाद फोफावला. धार्मिक कट्टरता, जिहाद वाढला. 

१९५८ साली पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा लोकशाहीची हत्या झाली. त्यावेळी देशात पहिले राष्ट्रपती मेजर जनरल इसकंदर मिर्जा यांनी संसद आणि तत्कालीन पंतप्रधान फिरोज खान नून यांचे सरकार भंग करून देशात मार्शल लॉ लागू केला. त्यासोबतच त्यांनी आर्मी चीफ जनरल अयूब खान यांना सत्तेची कमान सोपवली. मात्र अवघ्या १३ दिवसांत इसकंदर मिर्जा यांनाही सत्तेबाहेर काढत अयूब खान यांनी राष्ट्रपतींची गादी सांभाळली. त्यानंतर १९६९ पर्यंत अयूब खान पाकिस्तानचे राष्ट्रपती राहिले आणि संपूर्ण देशाची सत्ता राजेशाहीसारखी चालवली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान