शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ब्रिक्समध्ये भारताचा दबदबा पाहून आपल्याविरोधात कारवाई होईल या भीतीने पाकिस्तानची चीनकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 13:48 IST

दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आल्याने, एकीकडे भारताचा हा विजय झाला असताना पाकिस्तानच्या चिंता मात्र वाढल्या आहेत

बीजिंग, दि. 7 - दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आल्याने, एकीकडे भारताचा हा विजय झाला असताना पाकिस्तानच्या चिंता मात्र वाढल्या आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद आसिफ यासंबंधी चर्चा करण्यासाठी चीनचा दौरा करणार आहेत. गुरुवारी परराष्ट्रमंत्री  मोहम्मद आसिफ चीनला जाणार आहेत. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घोषणापत्रात उल्लेख करण्यात आलेल्या गोष्टींवर कशाप्रकारे अंमलबजावणी करु शकतो यासंबंधी चीन चर्चा करु इच्छित आहे. तसंच अंमलबजावणी करत असताना चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअरला धक्का लागू नये याकडे चीनचं लक्ष आहे. पाकिस्तानने ब्रिक्स घोषणापत्राचा विरोध केला असून यासंबंधी आपला मित्र चीनकडे तक्रार करणार आहे. 

आपल्या भूभागावर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण नसल्याचा दावा करीत पाकिस्तानने याआधीच चीनचा समावेश असलेल्या ब्रिक्स परिषदेचा दहशतवादविरोधी जाहीरनामा फेटाळला आहे. दहशतवादी गटांवर कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असतानाही पाकिस्तानने आपला हेका कायम ठेवला आहे.

चीनच्या शीयामेन शहरात सोमवारी ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांनी ब्रिक्स शिखर परिषदेत सर्व प्रकारच्या दहशतवादाची निंदा करणारा ४३ पानी जाहीरनामा जारी केला होता. पाकिस्तानसह अन्य देशांमधील दहशतवादी गटांपासून असलेल्या धोक्याबाबत चिंताही व्यक्त केली होती.

तालिबान, इस्लामिक स्टेट (इसिस), अल-कायदा, पूर्व तुर्किस्तान, उझबेकिस्तानमधील इस्लामी चळवळ तसेच हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए- तोयबा, जैश-ए- मोहम्मद, तेहरिक- तालिबान पाकिस्तान, हिज्ब-उत- तहरीर या अतिरेकी गटांनी चालविलेल्या हिंसाचारामुळे उपखंडातील सुरक्षेला निर्माण झालेल्या धोक्याचा उल्लेखही या जाहीरनाम्यात करण्यात आला होता.

अफगाणिस्तानकडे अंगुलीनिर्देश...अतिरेक्यांसाठी अफगाणिस्तानातील ४० टक्के भूभाग सुरक्षित असल्याचे सांगत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी उपखंडातील हिंसाचारासाठी अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटांना जबाबदार धरले होते. ब्रिक्स सदस्यांनी जारी केलेला जाहीरनामा आम्ही फेटाळत आहोत, असे त्यांनी संरक्षण स्थायी समितीच्या बैठकीत म्हटले होते. काही गट देश सोडून गेले त्यांचा अपवाद वगळता पाकिस्तानने आपल्या भूमीवरील सर्व दहशतवादी गटांवर कारवाया केल्या आहेत, असा दावा दस्तगीर यांनी केल्याचे वृत्त जीईओ टीव्हीने दिले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीन