शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
3
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
4
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
5
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
6
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
7
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
8
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
9
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
10
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी
11
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
12
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
13
सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय?
14
चिंताजनक! ४० दिवसांत हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू; 'या' राज्यात खळबळ, रुग्णालयात प्रचंड गर्दी
15
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
16
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
17
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
18
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
19
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
20
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!

पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी ३० मेपर्यंत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 01:14 IST

पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी आता ३० मेपर्यंत बंद राहणार आहे. भारतातील लोकसभा निवडणुकांचा निकाल येण्याची पाकिस्तानला प्रतीक्षा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

लाहोर : पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी आता ३० मेपर्यंत बंद राहणार आहे. भारतातील लोकसभा निवडणुकांचा निकाल येण्याची पाकिस्तानला प्रतीक्षा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.भारताने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैशच्या अतिरेकी तळावर भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे हल्ला केल्यानंतर पाकने आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले होते. पाकने २७ मार्च रोजी एका निर्णयाद्वारे नवी दिल्ली, बँकॉक, क्वालालंपूर वगळता सर्व उड्डाणांसाठी हवाई हद्द खुली केली होती.एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितले की, संरक्षण व उड्डयन मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. भारतीय उड्डाणांसाठी आपली हवाई हद्द खुली करण्यावर फेरविचार करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ठरल्यानुसार, पाकिस्तानची हवाई हद्द आता ३० मेपर्यंत भारतासाठी बंद राहील. आता भारतासाठी हवाई हद्द खुली करण्यावर ३० मे रोजी पुन्हा विचार करण्यात येईल.पाकिस्तानचे विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री फवाद चौधरी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीस सांगितले होते की, भारतात निवडणुकांचे निकाल येईपर्यंत हवाई हद्द खोलण्याबाबतचा निर्णय ‘जैसे थे’ राहील. निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन होईपर्यंत भारत-पाक संबंधांमध्ये काही सुधारणा होईल, असे दिसत नाही. दोन्ही देशांतील एकमेकांच्या हवाई हद्दीतील बंदी भारतात नवे सरकार स्थापन होईपर्यंत कायम राहील, असे वाटते.भारताने पाकिस्तानला हवाई हद्दीची बंदी केल्यामुळे पाकने बँकॉक, क्वालालंपूरसाठीची उड्डाणे रद्द केली असून, त्यामुळे त्या देशाला दररोज लाखो रुपयांचा फटका बसत आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सकडून (पीआयए) क्वालालंपूरसाठी चार तसेच बँकॉक व दिल्लीसाठी दररोज प्रत्येकी दोन विमाने पाठवली जात होती. पीआयएच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, बँकॉक व क्वालालंपूरची उड्डाणे बंद झाल्यामुळे अब्जावधी रुपयांची झळ सोसावी लागत आहे. एवढेच नव्हे, तर पाकला इतर एअरलाइन्सचे प्रवासीही गमवावे लागत आहेत. भारत- पाकिस्तानदरम्यान रस्ते व रेल्वे वाहतूक सुरू आहे, तर मग हवाई हद्द खुली करण्यात काय गैर आहे, असा सवालही या अधिकाºयाने केला.प्रवाशांना आर्थिक फटकापाकिस्तानची हवाई हद्द अत्यंत महत्त्वाच्या उड्डयन कॉरिडॉरमध्ये येते. त्यामुळे भारतात येणारी बहुतांश विमाने पाकच्या हवाई हद्दीतून येतात. या प्रतिबंधामुळे भारत व पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या दोन्ही देशांबरोबरच युरोप व इतर देशांनाही आर्थिक फटका बसत आहे. कारण विमान उड्डाणांचाही कालावधी वाढला आहे. त्यामुळे तिकिटेही महागली आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत