शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:36 IST

पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश उद्योगपती साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

देशात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. इंडिया आघाडी आणि भाजपाचे प्रचारसभा सुरू आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. दरम्यान,पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन उद्योगपती साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. 'नरेंद्र मोदी हे एक मजबूत नेते आहेत त्यांनी भारताला नवीन उंचीवर नेले आहे आणि ते नक्कीच देशाचे तिसरे पंतप्रधान असतील. पंतप्रधान मोदी हे केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी चांगले नेते आहेत. त्यांच्यासारखा नेता पाकिस्तानला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक चांगले पंतप्रधान तसेच भारतातील सर्वात शक्तिशाली नेते आहेत असं बाल्टिमोरमधील पाकिस्तानी वंशाचे व्यापारी साजिद तरार म्हणाले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचे भाकीतही त्यांनी केले. ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, “मोदी हे एक अद्भुत नेते आहेत. प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानला भेट देणारे आणि आपली राजकीय विश्वासार्हता पणाला लावणारे ते एकमेव पंतप्रधान आहेत. मला आशा आहे की मोदीजी पाकिस्तानशी चर्चा आणि व्यापार सुरू करतील, असंही साजिद तरार म्हणाले. 

Canada सरकारनं भारतीय कंपनीला ठोठावला लाखो डॉलर्सचा दंड, का अडकली Infosys?

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. पाकव्याप्त काश्मीरसह (पीओके) देशाच्या अनेक भागात अशांतता निर्माण झाली आहे. साजिद तरारम्हणाले, "पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. पेट्रोलच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. आयएमएफला कर वाढवायचे आहेत. विजेच्या किमती वाढल्या आहेत. आम्ही निर्यात करू शकत नाही. पीओकेमध्ये मुख्यत्वे आंदोलनामुळे वीज बिलात वाढ झाली आहे.

पीओकेमधील लोकांना आर्थिक मदत देण्याच्या पाकिस्तानी पंतप्रधानांच्या निर्णयावरही साजिद तरार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "पैसा कुठून आणणार? ते आयएमएफसोबत नवीन मदत पॅकेजवर चर्चा करत आहेत. पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. अशा वाईट काळात शाहबाज शरीफ यांचा हा निर्णय योग्य नाही, असंही साजिद तरार म्हणाले. 

साजिद तरार म्हणाले, "खेदाची गोष्ट आहे की, पाकिस्तानमध्ये तळागाळातील समस्या सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. निर्यात कशी वाढवायची? दहशतवादावर नियंत्रण कसे ठेवायचे आणि कायदा आणि सुव्यवस्था कशी सुधारायची, या मुद्द्यांवर चर्चा होऊन काम झाले पाहिजे. सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता आणि राजकीय अस्थिरता आहे. तरार म्हणाले, या सर्व समस्यांपासून दूर राहून पुढच्या स्तरावर नेणारे नेतृत्व मिळावे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४