शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

कारगिल युद्धाबाबत पाकिस्तानचा मोठा खुलासा; लष्करप्रमुख म्हणाले, "अनेकांनी आपल्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 16:57 IST

पाकिस्तानच्या लष्कराने प्रथमच भारताविरुद्ध १९९९ च्या कारगिल युद्धात आपला सहभाग जाहीरपणे मान्य केला आहे.

Kargil War : कारगिल युद्धाच्या जवळपास २५ वर्षांनंतर पाकिस्तानी लष्कराने भारतासोबतच्या या संघर्षात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी शनिवारी अधिकृतपणे १९९९ च्या भारतासोबतच्या कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराच्या सहभागाची कबुली दिली. अशा प्रकारे खुलासा करत पाकिस्तानी लष्कराने कारगिल युद्धात आपली थेट भूमिका जाहीरपणे मान्य केल्याचे पहिल्यांदाच घडलं आहे. संरक्षण दिनाच्या भाषणादरम्यान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु झाल्या आहेत.

१९९९ च्या कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराने आपल्या थेट सहभागाची जाहीरपणे कबुली देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारगिल संघर्षादरम्यानही इस्लामाबादने थेट लष्करी सहभाग नाकारला होता आणि घुसखोरांना काश्मिरी स्वातंत्र्य सैनिक आणि मुजाहिदीन असे म्हटलं होते. पाकिस्तानने दावा केला होता की पाकिस्तानी सैन्य फक्त सक्रियपणे गस्त घालत होते तर आदिवासी नेत्यांनी कारगिलमध्ये उंचीवर जाऊन ताबा मिळवला होता.

आता संरक्षण दिनाच्या एका भाषणात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी युद्धात सामील असल्याची कबुली दिली. "१९४८, १९६५, १९७१ असो किंवा भारत-पाकिस्तानमधील कारगिल युद्ध असो किंवा सियाचीन असो अनेकांनी यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली आहे," असं लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर म्हणाले.

याआधी पाकिस्तानी लष्कराने सातत्याने कारगिल युद्धात थेट सहभाग नाकारला होता. मे ते जुलै १९९९ दरम्यान जम्मू-काश्मीरमधील कारगिलमध्ये ही लढाई झाली. आता जनरल मुनीर यांचा खुलासा हा पाकिस्तानच्या अधिकृत भूमिकेत मोठा आणण्याची शक्यता आहे. कारगिल जिल्ह्यातील मोक्याची जागा काबीज करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करून कारगिल युद्धाची सुरुवात केली होती. भारताच्या विजयाने आणि या भागातून पाकिस्तानी सैन्याने माघार घेतल्याने संघर्ष संपला. त्यावेळी अमेरिका आणि इतर प्रमुख देशांनी पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल टीका केली होती.

दरम्यान, कारगिल युद्धात ५२७ भारतीय जवान शहीद झाले. तर पाकिस्तानने अद्यापही अधिकृतपणे आपले किती सैनिक मारले हे सांगितलेले नाहीयय मात्र कारगिल युद्धात पाकिस्तानचे २७०० ते ४००० सैनिक मारले गेल्याचे म्हटलं जातं.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानIndiaभारत