शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

कारगिल युद्धाबाबत पाकिस्तानचा मोठा खुलासा; लष्करप्रमुख म्हणाले, "अनेकांनी आपल्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 16:57 IST

पाकिस्तानच्या लष्कराने प्रथमच भारताविरुद्ध १९९९ च्या कारगिल युद्धात आपला सहभाग जाहीरपणे मान्य केला आहे.

Kargil War : कारगिल युद्धाच्या जवळपास २५ वर्षांनंतर पाकिस्तानी लष्कराने भारतासोबतच्या या संघर्षात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी शनिवारी अधिकृतपणे १९९९ च्या भारतासोबतच्या कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराच्या सहभागाची कबुली दिली. अशा प्रकारे खुलासा करत पाकिस्तानी लष्कराने कारगिल युद्धात आपली थेट भूमिका जाहीरपणे मान्य केल्याचे पहिल्यांदाच घडलं आहे. संरक्षण दिनाच्या भाषणादरम्यान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु झाल्या आहेत.

१९९९ च्या कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराने आपल्या थेट सहभागाची जाहीरपणे कबुली देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारगिल संघर्षादरम्यानही इस्लामाबादने थेट लष्करी सहभाग नाकारला होता आणि घुसखोरांना काश्मिरी स्वातंत्र्य सैनिक आणि मुजाहिदीन असे म्हटलं होते. पाकिस्तानने दावा केला होता की पाकिस्तानी सैन्य फक्त सक्रियपणे गस्त घालत होते तर आदिवासी नेत्यांनी कारगिलमध्ये उंचीवर जाऊन ताबा मिळवला होता.

आता संरक्षण दिनाच्या एका भाषणात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी युद्धात सामील असल्याची कबुली दिली. "१९४८, १९६५, १९७१ असो किंवा भारत-पाकिस्तानमधील कारगिल युद्ध असो किंवा सियाचीन असो अनेकांनी यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली आहे," असं लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर म्हणाले.

याआधी पाकिस्तानी लष्कराने सातत्याने कारगिल युद्धात थेट सहभाग नाकारला होता. मे ते जुलै १९९९ दरम्यान जम्मू-काश्मीरमधील कारगिलमध्ये ही लढाई झाली. आता जनरल मुनीर यांचा खुलासा हा पाकिस्तानच्या अधिकृत भूमिकेत मोठा आणण्याची शक्यता आहे. कारगिल जिल्ह्यातील मोक्याची जागा काबीज करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करून कारगिल युद्धाची सुरुवात केली होती. भारताच्या विजयाने आणि या भागातून पाकिस्तानी सैन्याने माघार घेतल्याने संघर्ष संपला. त्यावेळी अमेरिका आणि इतर प्रमुख देशांनी पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल टीका केली होती.

दरम्यान, कारगिल युद्धात ५२७ भारतीय जवान शहीद झाले. तर पाकिस्तानने अद्यापही अधिकृतपणे आपले किती सैनिक मारले हे सांगितलेले नाहीयय मात्र कारगिल युद्धात पाकिस्तानचे २७०० ते ४००० सैनिक मारले गेल्याचे म्हटलं जातं.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानIndiaभारत