शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

कारगिल युद्धाबाबत पाकिस्तानचा मोठा खुलासा; लष्करप्रमुख म्हणाले, "अनेकांनी आपल्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 16:57 IST

पाकिस्तानच्या लष्कराने प्रथमच भारताविरुद्ध १९९९ च्या कारगिल युद्धात आपला सहभाग जाहीरपणे मान्य केला आहे.

Kargil War : कारगिल युद्धाच्या जवळपास २५ वर्षांनंतर पाकिस्तानी लष्कराने भारतासोबतच्या या संघर्षात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी शनिवारी अधिकृतपणे १९९९ च्या भारतासोबतच्या कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराच्या सहभागाची कबुली दिली. अशा प्रकारे खुलासा करत पाकिस्तानी लष्कराने कारगिल युद्धात आपली थेट भूमिका जाहीरपणे मान्य केल्याचे पहिल्यांदाच घडलं आहे. संरक्षण दिनाच्या भाषणादरम्यान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु झाल्या आहेत.

१९९९ च्या कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराने आपल्या थेट सहभागाची जाहीरपणे कबुली देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारगिल संघर्षादरम्यानही इस्लामाबादने थेट लष्करी सहभाग नाकारला होता आणि घुसखोरांना काश्मिरी स्वातंत्र्य सैनिक आणि मुजाहिदीन असे म्हटलं होते. पाकिस्तानने दावा केला होता की पाकिस्तानी सैन्य फक्त सक्रियपणे गस्त घालत होते तर आदिवासी नेत्यांनी कारगिलमध्ये उंचीवर जाऊन ताबा मिळवला होता.

आता संरक्षण दिनाच्या एका भाषणात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी युद्धात सामील असल्याची कबुली दिली. "१९४८, १९६५, १९७१ असो किंवा भारत-पाकिस्तानमधील कारगिल युद्ध असो किंवा सियाचीन असो अनेकांनी यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली आहे," असं लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर म्हणाले.

याआधी पाकिस्तानी लष्कराने सातत्याने कारगिल युद्धात थेट सहभाग नाकारला होता. मे ते जुलै १९९९ दरम्यान जम्मू-काश्मीरमधील कारगिलमध्ये ही लढाई झाली. आता जनरल मुनीर यांचा खुलासा हा पाकिस्तानच्या अधिकृत भूमिकेत मोठा आणण्याची शक्यता आहे. कारगिल जिल्ह्यातील मोक्याची जागा काबीज करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करून कारगिल युद्धाची सुरुवात केली होती. भारताच्या विजयाने आणि या भागातून पाकिस्तानी सैन्याने माघार घेतल्याने संघर्ष संपला. त्यावेळी अमेरिका आणि इतर प्रमुख देशांनी पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल टीका केली होती.

दरम्यान, कारगिल युद्धात ५२७ भारतीय जवान शहीद झाले. तर पाकिस्तानने अद्यापही अधिकृतपणे आपले किती सैनिक मारले हे सांगितलेले नाहीयय मात्र कारगिल युद्धात पाकिस्तानचे २७०० ते ४००० सैनिक मारले गेल्याचे म्हटलं जातं.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानIndiaभारत